शहरं
Join us  
Trending Stories
1
'बिल्डर लॉबी भाजपसाठी काम करते, पुण्यात येऊन फडणवीसांचा दिखावा'; रवींद्र धंगेकरांचा आरोप
2
ज्या आजोबांनी बाळाची हमी दिली, त्यांचे छोटा राजनशी कनेक्शन; भावाशी संपत्तीवरून वाद, मित्रावर गोळीबार
3
'१२ वर्षांनी त्यांना जाग आली, माझ्यामुळे त्यांचे अनेक मंत्री घरी गेले'; अण्णा हजारेंचे शरद पवारांना प्रत्युत्तर
4
उपचारासाठी भारतात आलेले बांग्लादेशचे खासदार बेपत्ता; अखेरचं लोकेशन बिहारमध्ये, शोध सुरू
5
“त्यांनी चीन सीमेवर जावे अन् पाहून यावे”; हेमंत बिस्वा सरमा यांचा नाना पटोलेंवर पलटवार
6
Indigo Flight: ऐकावं ते नवल! विमानातही ट्रेनसारखा किस्सा; कन्फर्म सीटवर बसवला 'स्टँडबाय' प्रवासी, प्रकरण काय?
7
अनिर्बंध मुजोरीचा निबंध! मस्तवाल बाळ आणि संवेदनशून्य अधिकाऱ्यांना अद्दल घडवल्याशिवाय असले प्रकार थांबणार नाहीत
8
राजस्थान रॉयल्स ११ दिवस खेळला नाही; RCB च्या आजच्या सामन्यावर सुनिल गावस्करांची भविष्यवाणी
9
Buddha Purnima 2024: भगवान बुद्धांची प्रिय तिथी अर्थात बुद्ध पौर्णिमा कशी साजरी करायला हवी ते जाणून घ्या!
10
मोदी, सहानुभूती अन् जातीचे गणित; विविध मुद्द्यांभोवती फिरली निवडणूक, नेत्यांची अहोरात्र मेहनत तरीही धाकधूक कायम
11
उजनी धरण बॅकवॉटर बोट दुर्घटना; बुडालेल्या सहा जणांची नावे आली समोर; शोध कार्य पुन्हा केले सुरु
12
Paytm Q4 Results: रिझर्व्ह बँकेच्या निर्णयाचा 'पेटीएम'ला मोठा फटका, निव्वळ तोटा ५५० कोटींवर; महसुलातही मोठी घट
13
त्रिस्तरीय सुरक्षा भेदली, एक इसम थेट EVM ठेवलेल्या ठिकाणी पोहोचला; निलेश लंकेंचा आरोप काय?
14
नातवाला सोडविण्यासाठी आजोबांनी दिली हमी; बाल न्यायालयात १५ तासांत जामीन कसा मंजूर झाला?
15
ऑनलाइन क्रशला भेटायला २४०० किमी दूर पोहचली युवती; त्यानंतर जे घडलं तिने डोक्याला हात लावला
16
पीपीएफ आणि दर महिन्याची ५ तारीख, अचूक टायमिंग लक्षात ठेवा; 1 कोटीचा फंड जमा करू शकाल
17
पेट्रोल, डिझेल GST मध्ये? राज्यांवर बंधने? कसे असेल मोदी ३.० सरकार; प्रशांत किशोर यांनी केले ४ जूननंतरचे भाकीत
18
विशेष मुलाखत : देशाची राज्यघटना वाचविण्यासाठी यंदाची निवडणूक अतिशय महत्त्वाची - अखिलेश यादव 
19
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची जबरदस्त सुरुवात; अल्ट्राटेकमध्ये तेजी, एसबीआय घसरला
20
काँग्रेस अन् भाजपने उद्योगपतींच्या फायद्याची धोरणे आखली; बसप अध्यक्षा मायावती यांचा आरोप

तरुणांनो, तुम्ही कर्ज घ्या, महामंडळ व्याज देईल, व्याज परतावा मिळविण्यात कोल्हापूर राज्यात प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2021 11:18 AM

ज्या प्रवर्गात वित्तीय साहाय्य करण्यासाठी इतर कोणतेही महामंडळ नाही, अशा प्रवर्गासाठी हे महामंडळ कार्यरत आहे. गेल्या तीन वर्षात या महामंडळाच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यातील ३५३० युवक-युवतींनी व्यवसाय उभारुन रोजगार निर्मितीचे नवे पाऊल टाकले आहे.

संतोष मिठारी

कोल्हापूर : राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या विकासासाठी शासनाने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची स्थापना केली. ज्या प्रवर्गात वित्तीय साहाय्य करण्यासाठी इतर कोणतेही महामंडळ नाही, अशा प्रवर्गासाठी हे महामंडळ कार्यरत आहे. गेल्या तीन वर्षात या महामंडळाच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यातील ३५३० युवक-युवतींनी व्यवसाय उभारुन रोजगार निर्मितीचे नवे पाऊल टाकले आहे. व्याज परतावा मिळविण्यात कोल्हापूर हे राज्यात प्रथम क्रमाकांवर आहे.

३५३० युवकांना २७८ कोटींचे वाटप

जिल्ह्यात फेब्रुवारी २०१८ पासून अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे काम सुरू झाले. या महामंडळाकडे आतापर्यंत जिल्ह्यातील ९४९३ जणांनी अर्ज केले. त्यापैकी ३५३० जणांची प्रकरणे मंजूर झाली. त्यांना २७८ कोटी १७ लाख २२ हजार १६९ रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले. १९ कोटी ७६ लाख रुपये इतका व्याज परतावा महामंडळाने दिला आहे.

कर्जासाठी येथे करा अर्ज

या महामंडळाच्या माध्यमातून कर्ज घेण्यासाठी मराठा अथवा खुल्या प्रवर्गातील युवकांनी (www.udyog.mahaswayam.gov.in) या संकेतस्थळावर नोंदणी करावी.

कुटुंबाचे उत्पन्न आठ लाखांच्या आत असावे

कर्ज घेण्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे अर्ज करणाऱ्या युवक अथवा युवतीच्या कुटुंबाचे उत्पन्न आठ लाख रूपयांच्या आत असणे आवश्यक आहे. कर्जासाठी अर्ज करताना संबंधितांनी या उत्पन्नाबाबतचा तहसीलदारांचा दाखला अथवा कर भरलेले विवरणपत्र सादर करायचे आहे. कर्ज मिळाल्यानंतर संबंधितांनी दरमहिन्याला कर्जाचा हप्ता आणि व्याज भरायचे. त्यांनी याबाबतचे ऑनलाईन स्टेटमेंट महामंडळाला सादर केल्यानंतर त्यांच्या बचत खात्यात व्याज परतावा जमा केला जातो.

काय काय कागदपत्रे लागणार?

ऑनलाईन अर्ज (नोंदणी) करताना आधारकार्ड, रेशनकार्ड, पॅनकार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, उत्पन्नाचा दाखला अथवा कर भरलेले विवरणपत्र अशी, तर कर्ज मंजुरीनंतर बँकेचे कर्जमंजुरी पत्र, कर्ज खाते उतारा, ईएमआय चार्ट, प्रकल्प अहवाल, उद्योग आधार, बचत खात्याचा धनादेश, व्यवसायाचे छायाचित्र ही कागदपत्रे लागतात.

आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या घटकापर्यंत विशेष करून बेरोजगार तरुणांपर्यंत पोहचून त्यांना सक्षम बनविण्याच्या उद्देशाने महामंडळ कार्यरत आहे. महामंडळाच्या माध्यमातून गेल्या तीन वर्षांत कोल्हापूर जिल्ह्यातील ३५३० जणांनी व्यवसाय उभारले आहेत. कर्ज वाटपात कोल्हापूर जिल्हा राज्यात चौथ्या, तर व्याज परतावा मिळविण्यात पहिल्या क्रमांकावर आहे. दरमहा किमान शंभर प्रकरणे मंजूर होतात. अधिक माहितीसाठी इच्छुकांनी मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील आमच्या महामंडळाच्या कार्यालयाला भेट द्यावी. - सतीश माने, जिल्हा समन्वयक, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAnnasaheb Patil Mahamandalअण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ