शहरं
Join us  
Trending Stories
1
'संशयित आरोपी जरांगेंचे कार्यकर्ते'; या प्रकरणी सीबीआय चौकशी करण्याची धनंजय मुंडेंची मागणी
2
भारतात दर दिवसाला १ लाख गाड्या विकल्या जात होत्या...! तो 'काळ' पाहून म्हणाल... अद्भूत!
3
सर्वात व्यस्त दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’! ३०० हून अधिक विमानांना विलंब; पार्किंगलाही जागा नाही!
4
ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
5
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट; नेमके काय बोलणे झाले? चर्चांना उधाण
6
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
7
बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषेतच बोलावं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन का म्हणाल्या असं?
8
'चांगल्यापैकी पोटगी मिळतेय'; मासिक १० लाख मिळवण्यासाठी हसीन जहाँ सुप्रीम कोर्टात, मोहम्मद शमीला नोटीस
9
'तुमच्या मुलाचा दोष नाही', एअर इंडिया विमान अपघातातील पायलटच्या वडिलांची सर्वोच्च न्यायालयात धाव
10
Supreme Court: भटक्या कुत्र्यांवरील निर्णय ऐकून महिला वकील कोर्टातच ढसाढसा रडली, म्हणाली...
11
‘काँग्रेसम्हणजेच मुस्लिम आणि मुस्लिम म्हणजेच काँग्रेस’, रेवंत रेड्डीच्या विधानावरून वाद 
12
घर नावावर कर म्हणत युट्यूबरने आईला मारहाण केली; व्हिडीओही झाला व्हायरल! कोण आहे वंशिका हापूर?
13
Lenskart IPO: लिस्टिगपूर्वी लेन्सकार्टचा GMP तोडावर आपटला; १०८ रुपयांवरुन आला १० वर, IPO चे 'बुरे दिन' येणार?
14
Samudra Shastra: दातात फट असणारे श्रीमंत असतात? दाताच्या ठेवणीवरून वाचा भाकीत!
15
नवरदेवाने फोटोग्राफरला मारली कानाखाली; नवरीचा लग्नास नकार, २ वर्षांच्या लव्हस्टोरीचा शेवट
16
धक्कादायक! "तो जवळ यायचा अन्...." बांगलादेशी महिला क्रिकेटरचा निवडकर्त्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप
17
Manoj Jarange Patil: हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
18
रिलायन्स पॉवरला मोठा झटका! बनावट बँक गॅरंटी प्रकरणी ED कडून तिसरी अटक; माजी CFO चाही समावेश
19
ट्रम्प यांच्या भाषणादरम्यान व्हाईट हाऊसमध्ये खळबळ! फार्मा कंपनीचा अधिकारी बेशुद्ध पडला
20
ऐतिहासिक! १८० च्या स्पीडने धावली वंदे भारत स्लीपर ट्रेन; नवा रेकॉर्ड, ट्रायलचा Video व्हायरल

कोल्हापूर : पाल खुर्द येथे गव्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2018 17:43 IST

पाल खुर्द ( ता. राधानगरी ) येथील श्री केरबा म्हादू जाधव ( वय ५३ ) हे ऊसाला पाणी पाजण्यासाठी गेले असता दबा धरून बसलेल्या दोन गव्यापैकी एका गव्याने त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. त्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्या मांडी व बागडीला जोरदार मार बसला आहे. गव्याने जोराची धडक दिल्याने त्यांच्या कामातून रक्तस्त्राव होत होता . त्यांना पुढील उपचारासाठी सिपीआर कोल्हापूर येथे हलवले आहे.

ठळक मुद्देपाल खुर्द येथे गव्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी परिसरात पाहिलीच घटना; शेतकरी वर्गात कमालीची भिती

धामोड/कोल्हापूर : पाल खुर्द ( ता. राधानगरी ) येथील श्री केरबा म्हादू जाधव ( वय ५३ ) हे ऊसाला पाणी पाजण्यासाठी गेले असता दबा धरून बसलेल्या दोन गव्यापैकी एका गव्याने त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. त्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्या मांडी व बागडीला जोरदार मार बसला आहे. गव्याने जोराची धडक दिल्याने त्यांच्या कामातून रक्तस्त्राव होत होता . त्यांना पुढील उपचारासाठी सिपीआर कोल्हापूर येथे हलवले आहे.

या घटनेबद्दलची अधिक माहिती अशी केरबा म्हादू पाटील हे आपल्या 'पलंगीचा माळ ' नावाचा शेतामध्ये ऊसाला पाणी देण्यासाठी गेले होते . गावाला लागूनच शेत व शेताला लागूनच जंगल असल्याने लोकांना गव्याचा उपद्रव नेहमीच सहन करावा लागत असतो.

पण असे असले तरी दिवसाच्या वेळी आजअखेर गव्यांनी कधीच दर्शन दाखवले नव्हते. आज मात्र केरबा पाटील हे सकाळी ११ वाजता ऊसाला पाणी पाजण्यासाठी गेले असता. ऊसामध्ये दबा धरून बसलेल्या दोन गव्यापैकी एका गव्याने त्यांचावर अचानक हल्ला चढवला . त्यांना काहीच कळण्याच्या आत पुन्हा -पुन्हा गव्याने धडक मारल्याने ते त्यात गंभीर जखमी झाले .त्यात त्यांचा मांडीवर तसेच छातीवर गव्याने जोरदार धडक दिल्याने बरगडीला गंभीर जखम झाली . ते गव्याचा धडकेने लांबवर फेकले गेल्याने डोक्यालाही गंभीर जखम झाली. त्यामुळे घटनास्थळीच त्यांच्या कानातून रक्तस्त्राव होत होता. गावकऱ्यांनी त्यांना तात्काळ पूढील उपचारासाठी सीपीआर कोल्हापूर येथे हलवले असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे . दरम्यान दुपारी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळावर जाऊन पंचनामा केला. सरदार पाटीलमुळेच केरबा जाधवांना जीवनदानसरदार बाबू पाटील हा तरुण याच दरम्यान आपल्या शेताकडे ऊसाला पाणी देण्यासाठी चालला होता . तेंव्हा त्याला बांधाच्या कडेला कोणाच्या तरी कणण्याच्या( विव्हळणे )आवाज आला . त्याने त्या दिशेने तात्काळ धाव घेतली व घडला प्रकार त्याने पाहीला. हातातील पाणी जाधव यांच्या तोंडात घातले व क्षणाचाही विलंब न लावता गावाकडे धाव घेत गावकऱ्यांना ही घटना सांगितल्यांनेच केरबा जाधवांना प्राण वाचले, अन्यथा अनर्थ घडला असता.

टॅग्स :wildlifeवन्यजीवkolhapurकोल्हापूर