शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

कोल्हापूर : पाल खुर्द येथे गव्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2018 17:43 IST

पाल खुर्द ( ता. राधानगरी ) येथील श्री केरबा म्हादू जाधव ( वय ५३ ) हे ऊसाला पाणी पाजण्यासाठी गेले असता दबा धरून बसलेल्या दोन गव्यापैकी एका गव्याने त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. त्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्या मांडी व बागडीला जोरदार मार बसला आहे. गव्याने जोराची धडक दिल्याने त्यांच्या कामातून रक्तस्त्राव होत होता . त्यांना पुढील उपचारासाठी सिपीआर कोल्हापूर येथे हलवले आहे.

ठळक मुद्देपाल खुर्द येथे गव्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी परिसरात पाहिलीच घटना; शेतकरी वर्गात कमालीची भिती

धामोड/कोल्हापूर : पाल खुर्द ( ता. राधानगरी ) येथील श्री केरबा म्हादू जाधव ( वय ५३ ) हे ऊसाला पाणी पाजण्यासाठी गेले असता दबा धरून बसलेल्या दोन गव्यापैकी एका गव्याने त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. त्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्या मांडी व बागडीला जोरदार मार बसला आहे. गव्याने जोराची धडक दिल्याने त्यांच्या कामातून रक्तस्त्राव होत होता . त्यांना पुढील उपचारासाठी सिपीआर कोल्हापूर येथे हलवले आहे.

या घटनेबद्दलची अधिक माहिती अशी केरबा म्हादू पाटील हे आपल्या 'पलंगीचा माळ ' नावाचा शेतामध्ये ऊसाला पाणी देण्यासाठी गेले होते . गावाला लागूनच शेत व शेताला लागूनच जंगल असल्याने लोकांना गव्याचा उपद्रव नेहमीच सहन करावा लागत असतो.

पण असे असले तरी दिवसाच्या वेळी आजअखेर गव्यांनी कधीच दर्शन दाखवले नव्हते. आज मात्र केरबा पाटील हे सकाळी ११ वाजता ऊसाला पाणी पाजण्यासाठी गेले असता. ऊसामध्ये दबा धरून बसलेल्या दोन गव्यापैकी एका गव्याने त्यांचावर अचानक हल्ला चढवला . त्यांना काहीच कळण्याच्या आत पुन्हा -पुन्हा गव्याने धडक मारल्याने ते त्यात गंभीर जखमी झाले .त्यात त्यांचा मांडीवर तसेच छातीवर गव्याने जोरदार धडक दिल्याने बरगडीला गंभीर जखम झाली . ते गव्याचा धडकेने लांबवर फेकले गेल्याने डोक्यालाही गंभीर जखम झाली. त्यामुळे घटनास्थळीच त्यांच्या कानातून रक्तस्त्राव होत होता. गावकऱ्यांनी त्यांना तात्काळ पूढील उपचारासाठी सीपीआर कोल्हापूर येथे हलवले असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे . दरम्यान दुपारी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळावर जाऊन पंचनामा केला. सरदार पाटीलमुळेच केरबा जाधवांना जीवनदानसरदार बाबू पाटील हा तरुण याच दरम्यान आपल्या शेताकडे ऊसाला पाणी देण्यासाठी चालला होता . तेंव्हा त्याला बांधाच्या कडेला कोणाच्या तरी कणण्याच्या( विव्हळणे )आवाज आला . त्याने त्या दिशेने तात्काळ धाव घेतली व घडला प्रकार त्याने पाहीला. हातातील पाणी जाधव यांच्या तोंडात घातले व क्षणाचाही विलंब न लावता गावाकडे धाव घेत गावकऱ्यांना ही घटना सांगितल्यांनेच केरबा जाधवांना प्राण वाचले, अन्यथा अनर्थ घडला असता.

टॅग्स :wildlifeवन्यजीवkolhapurकोल्हापूर