शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
3
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
5
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
6
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
7
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
9
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
10
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
11
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
12
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
13
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
14
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
15
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
16
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
17
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
18
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
19
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
20
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : पाल खुर्द येथे गव्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2018 17:43 IST

पाल खुर्द ( ता. राधानगरी ) येथील श्री केरबा म्हादू जाधव ( वय ५३ ) हे ऊसाला पाणी पाजण्यासाठी गेले असता दबा धरून बसलेल्या दोन गव्यापैकी एका गव्याने त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. त्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्या मांडी व बागडीला जोरदार मार बसला आहे. गव्याने जोराची धडक दिल्याने त्यांच्या कामातून रक्तस्त्राव होत होता . त्यांना पुढील उपचारासाठी सिपीआर कोल्हापूर येथे हलवले आहे.

ठळक मुद्देपाल खुर्द येथे गव्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी परिसरात पाहिलीच घटना; शेतकरी वर्गात कमालीची भिती

धामोड/कोल्हापूर : पाल खुर्द ( ता. राधानगरी ) येथील श्री केरबा म्हादू जाधव ( वय ५३ ) हे ऊसाला पाणी पाजण्यासाठी गेले असता दबा धरून बसलेल्या दोन गव्यापैकी एका गव्याने त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. त्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्या मांडी व बागडीला जोरदार मार बसला आहे. गव्याने जोराची धडक दिल्याने त्यांच्या कामातून रक्तस्त्राव होत होता . त्यांना पुढील उपचारासाठी सिपीआर कोल्हापूर येथे हलवले आहे.

या घटनेबद्दलची अधिक माहिती अशी केरबा म्हादू पाटील हे आपल्या 'पलंगीचा माळ ' नावाचा शेतामध्ये ऊसाला पाणी देण्यासाठी गेले होते . गावाला लागूनच शेत व शेताला लागूनच जंगल असल्याने लोकांना गव्याचा उपद्रव नेहमीच सहन करावा लागत असतो.

पण असे असले तरी दिवसाच्या वेळी आजअखेर गव्यांनी कधीच दर्शन दाखवले नव्हते. आज मात्र केरबा पाटील हे सकाळी ११ वाजता ऊसाला पाणी पाजण्यासाठी गेले असता. ऊसामध्ये दबा धरून बसलेल्या दोन गव्यापैकी एका गव्याने त्यांचावर अचानक हल्ला चढवला . त्यांना काहीच कळण्याच्या आत पुन्हा -पुन्हा गव्याने धडक मारल्याने ते त्यात गंभीर जखमी झाले .त्यात त्यांचा मांडीवर तसेच छातीवर गव्याने जोरदार धडक दिल्याने बरगडीला गंभीर जखम झाली . ते गव्याचा धडकेने लांबवर फेकले गेल्याने डोक्यालाही गंभीर जखम झाली. त्यामुळे घटनास्थळीच त्यांच्या कानातून रक्तस्त्राव होत होता. गावकऱ्यांनी त्यांना तात्काळ पूढील उपचारासाठी सीपीआर कोल्हापूर येथे हलवले असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे . दरम्यान दुपारी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळावर जाऊन पंचनामा केला. सरदार पाटीलमुळेच केरबा जाधवांना जीवनदानसरदार बाबू पाटील हा तरुण याच दरम्यान आपल्या शेताकडे ऊसाला पाणी देण्यासाठी चालला होता . तेंव्हा त्याला बांधाच्या कडेला कोणाच्या तरी कणण्याच्या( विव्हळणे )आवाज आला . त्याने त्या दिशेने तात्काळ धाव घेतली व घडला प्रकार त्याने पाहीला. हातातील पाणी जाधव यांच्या तोंडात घातले व क्षणाचाही विलंब न लावता गावाकडे धाव घेत गावकऱ्यांना ही घटना सांगितल्यांनेच केरबा जाधवांना प्राण वाचले, अन्यथा अनर्थ घडला असता.

टॅग्स :wildlifeवन्यजीवkolhapurकोल्हापूर