शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाने भारताला SU-57 लढाऊ विमानांची ऑफर दिली, त्याचे फिचर अन् महत्त्व जाणून घ्या
2
Ladki Bahin Yojana: २६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप 
3
३५० सीसीवरील मोटरसायकलचा जीएसटी वाढला; KTM, Triumph अन् Aprilia ने मोठा निर्णय घेतला...
4
घराशेजारच्या किराणा दुकानांमध्ये ‘GST बचत उत्सवा’चा लाभ नाहीच; ग्राहकांचा झाला अपेक्षाभंग
5
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घ्या’ काँग्रेसची मागणी  
6
Ghaziabad Encounter: गाझियाबाद एन्काउंटरची इतिहासात नोंद, असं वेगळं काय घडलं? 
7
VIRAL : एका झटक्यात महिला झाली कोट्यधीश; ChatGPTने पालटलं नशीब! वाचून व्हाल हैराण
8
अर्जुन तेंडुलकर राहुल द्रविडच्या मुलाला भिडला; समित द्रविड पहिल्यांदाच खेळला, पण... 
9
मराठी माणसाचं दुकान हडपल्याचा गुन्हा; 'त्या' परप्रांतीयाला शिंदेसेनेकडून जबाबदारी, पक्षात नाराजी
10
"गरबा कार्यक्रमांच्या प्रवेशद्वारावर गोमूत्र ठेवावं, गैर-हिंदूंना..."; धीरेंद्र शास्त्रींचं मोठं विधान
11
मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी, राज ठाकरेंविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
12
दिल्लीतील रस्त्यावर मध्यरात्री चकमकीचा थरार, माया गँगच्या म्होरक्याविरोधात STF ची मोठी कारवाई
13
जीएसटीच्या पहिल्याच दिवशी मारुतीने २५,००० गाड्या विकल्या; ८० हजार लोकांची इन्क्वायरी...
14
वयाच्या २९व्या वर्षी वेगवान गोलंदाज निवृत्त; वकील बनण्यासाठी क्रिकेटशी तोडलं नातं!
15
Muhurat Trading 2025 Date and Time: वेळ लिहून ठेवा! या मुहूर्तावर शेअर बाजारात होणार धनवर्षा; १ तासासाठी उघडणार मार्केट
16
मुसळधार पावसाने कोलकात्याला झोडपले, अनेक भागात पाणी साचले, मेट्रो विस्कळीत, ५ जणांचा मृत्यू
17
निमिषा प्रियासारखंच प्रकरण; १९ वर्षांपासून सौदी अरेबियाच्या तुरुंगात असलेला अब्दुल रहीम सुटणार!
18
"मी तुमचा मोठा चाहता...", रितेश देशमुखने प्रसाद ओकचं केलं कौतुक; गंमतीत म्हणाला...
19
"बिग बॉसचं मला काही विचारू नका", भाऊ अमालबद्दल विचारताच अरमान मलिक भडकला, व्हिडीओ व्हायरल
20
महिला पोलीस अधिकाऱ्याने वर्दीवरील बॅज फेकून मारला; Video व्हायरल, घटनेची दुसरी बाजू आली समोर

कोल्हापूर हद्दवाढ: सक्ती कराल तर रस्त्यावर उतरू, हद्दवाढविरोधी कृती समितीचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2022 11:54 IST

जर हद्दवाढ कृती समितीच्या इशाऱ्यावर तुम्ही नाचणार असाल, त्यांच्या सांगण्यावरून आमच्या बससेवा बंद करणार असाल तर तुमची पाणी उपसा केंद्रे आमच्या हद्दीत आहेत, ती बंद केली जातील, असा इशाराही देण्यात आला.

कोल्हापूर : प्रस्तावित हद्दवाढीत समाविष्ट असलेल्या ग्रामपंचायती विकासाच्या बाबतीत सक्षम आहेत. त्यामुळे विकासाचे गाजर दाखवून जर शहरात येण्याची सक्ती कराल तर रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागले तरी मागे हटणार नाही, असा इशारा शुक्रवारी सायंकाळी ग्रामपंचायत सरपंच, सदस्य व ग्रामस्थांच्या बैठकीत देण्यात आला. एकतर्फी निर्णय घेतला तर न्यायालयात जाण्याचाही इशारा यावेळी देण्यात आला.

हद्दवाढविरोधी कृती समितीच्या विनंतीवरून महानगरपालिका प्रशासनाने शुक्रवारी कळंबा येथे हद्दवाढीच्या प्रस्तावात समावेश असलेल्या गावातील सरपंच, सदस्य यांची बैठक आयोजित करून संवाद साधण्याचा प्रयत्न केला. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, नगररचना सहायक संचालक रामचंद्र महाजन, जल अभियंता हर्षजित घाटगे यांनी हद्दवाढीचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला. जमिनीवर आरक्षणे पडणार नाहीत, पहिली पाच वर्षे घरफाळा वाढणार नाही, शहरात आल्यानंतर संबंधित गावांना विशेष निधी मिळेल, पुरेसा पाणीपुरवठा, केएमटी, रुग्णालयांच्या सुविधा मिळतील, असे सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केला. यावेळी उपायुक्त रविकांत आडसुळ उपस्थित होते.

तुम्ही आमच्या गावात आलात तुमचे स्वागत आहे. प्रत्येक गावात स्वागत करू, पण जर हद्दवाढ कृती समितीच्या इशाऱ्यावर तुम्ही नाचणार असाल, त्यांच्या सांगण्यावरून आमच्या बससेवा बंद करणार असाल तर तुमची पाणी उपसा केंद्रे आमच्या हद्दीत आहेत, ती बंद केली जातील, असा इशाराही देण्यात आला.

लोकसंख्येच्या आधारावर विकास निधी मिळतोय म्हणून हद्दवाढ करा, अशी मागणी होत आहे. परंतु, ही फसवणूक आहे. आम्ही चांगल्या सुविधा ग्रामस्थांना देत आहोत. मग तुम्हाला आमच्या विकासाची घाई का लागलीय? अशी विचारणा वडणगेचे सरपंच सचिन चौगले यांनी केली. यावेळी प्रकाश रोटे, प्रकाश टोपकर, अमर मोरे, विष्णू गवळी यांनीही आपली मते मांडली.

स्फोटक परिस्थितीला कृती समिती जबाबदार

दबाव टाकून बससेवा बंद केली तर सहन केले जाणार नाही, आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा राजू माने यांनी दिला. कळंबा सरपंच सागर भोगम यांनी हद्दवाढीला आपला तीव्र विरोध असल्याचे सांगितले. तुमचा प्रश्न शासनदरबारी मांडा, उगाच ग्रामस्थांना वेठीस धरू नका. त्यातून स्फोटक वातावरण निर्माण झाले तर हद्दवाढ कृती समिती जबाबदार राहील, असा गर्भित इशारा भोगम यांनी दिला.

ग्रामीण भागात के.एम.टी फायद्यातकाही गावांत केएमटी बंद केल्याने ग्रामस्थांचे हाल होत आहे. आम्ही हाल सहन करू, फक्त आठ दिवस सर्वच गावांतील केएमटी बंद करा. किती तोटा होतो बघा. तुमची बससेवा ही शहरात नुकसानात आहे. पण ग्रामीण भागात फायद्यात आहे, असा दावा यावेळी करण्यात आला. आमची बस बंद करणारे कितीजण केएमटीतून प्रवास करतात, असा उपरोधिक सवाल यावेळी विचारला गेला.

सकाळी अर्ज, संध्याकाळी परवाना

ग्रामीण भागात एखाद्याने बांधकाम परवान्यासाठी अर्ज केला तर त्याला संध्याकाळपर्यंत परवाना दिला जातो. कधी-कधी आम्ही गाडीवर बसूनही सह्या करतो. तुमच्या शहरात वेगळे अनुभव आहेत. सहा-सहा महिने प्रतीक्षा करावी लागते, याचा अनुभव आम्ही घेतला असल्याचे काहींनी सांगितले.

पाण्याच्या कनेक्शनसाठी कर्ज

ग्रामीण भागात एक हजारात कनेक्शन आणि पाण्याचे बिल दीडशे रुपयांपासून अडीचशे रुपयांपर्यंत घेतले जाते. शहरात कनेक्शन घेण्यासाठी साठ ते सत्तर हजार रुपये खर्च येतो. म्हणजे कर्जच काढावे लागेल, अशी भीती सचिन चौगले यांनी व्यक्त केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर