शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
2
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
3
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
4
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
5
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
6
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
7
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
8
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
9
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
10
फेल, फेल, सपशेल...! होंडाने Activa ईव्ही जानेवारीत आणली, आता उत्पादन बंद केले; गिऱ्हाईकच मिळेना...
11
दीपिकाच्या ८ तासांची शिफ्ट अटीवर रेणुका शहाणेची प्रतिक्रिया; म्हणाली, "अमान्य असेल तर..."
12
Uddhav Thackeray : "भाजपा कपट कारस्थान करणारा पक्ष, भाषिक प्रांतावादाचं विष...", उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
13
‘प्रत्येक विधानसभेत ५०,००० मतं कापण्याचा कट’, अखिलेश यादवांचे भाजपा, निवडणूक आयोगावर गंभीर आरोप  
14
हेडचे टी-२० स्टाईल शतक, पहिल्या ॲशेस कसोटीत ऑस्ट्रेलियाचा सनसनाटी विजय
15
मुझम्मिलने ५ लाख रुपयांना AK-47 खरेदी केली, डीप फ्रीजरमध्ये ठेवली स्फोटके; धक्कादायक खुलासे
16
मुक्ता बर्वे ४६ व्या वर्षीही अविवाहित; म्हणाली, "आधी स्थळं यायची अन् आताही येतात पण..."
17
Video - मेलेलं झुरळ, वर कीटकांची पावडर... कॉकरोच कॉफी तुफान व्हायरल, जाणून घ्या किंमत
18
जिथं सगळ्यांनी नांगी टाकली, तिथं ट्रॅविस हेडची ‘तोडफोड’ सेंच्युरी! असा पराक्रम करणारा ठरला जगतातील पहिला फलंदाज
19
टीव्हीवर तुफान गाजलेली विनोदी मालिका, 'भाभीजी घर पर है' आता मोठ्या पडद्यावर करणार धमाल
20
'लोकशाही अशीच असावी; भारतात...', ट्रम्प-ममदानी भेटीवर थरुर यांची पोस्ट; काँग्रेसला टोला?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर हद्दवाढ: सक्ती कराल तर रस्त्यावर उतरू, हद्दवाढविरोधी कृती समितीचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2022 11:54 IST

जर हद्दवाढ कृती समितीच्या इशाऱ्यावर तुम्ही नाचणार असाल, त्यांच्या सांगण्यावरून आमच्या बससेवा बंद करणार असाल तर तुमची पाणी उपसा केंद्रे आमच्या हद्दीत आहेत, ती बंद केली जातील, असा इशाराही देण्यात आला.

कोल्हापूर : प्रस्तावित हद्दवाढीत समाविष्ट असलेल्या ग्रामपंचायती विकासाच्या बाबतीत सक्षम आहेत. त्यामुळे विकासाचे गाजर दाखवून जर शहरात येण्याची सक्ती कराल तर रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागले तरी मागे हटणार नाही, असा इशारा शुक्रवारी सायंकाळी ग्रामपंचायत सरपंच, सदस्य व ग्रामस्थांच्या बैठकीत देण्यात आला. एकतर्फी निर्णय घेतला तर न्यायालयात जाण्याचाही इशारा यावेळी देण्यात आला.

हद्दवाढविरोधी कृती समितीच्या विनंतीवरून महानगरपालिका प्रशासनाने शुक्रवारी कळंबा येथे हद्दवाढीच्या प्रस्तावात समावेश असलेल्या गावातील सरपंच, सदस्य यांची बैठक आयोजित करून संवाद साधण्याचा प्रयत्न केला. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, नगररचना सहायक संचालक रामचंद्र महाजन, जल अभियंता हर्षजित घाटगे यांनी हद्दवाढीचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला. जमिनीवर आरक्षणे पडणार नाहीत, पहिली पाच वर्षे घरफाळा वाढणार नाही, शहरात आल्यानंतर संबंधित गावांना विशेष निधी मिळेल, पुरेसा पाणीपुरवठा, केएमटी, रुग्णालयांच्या सुविधा मिळतील, असे सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केला. यावेळी उपायुक्त रविकांत आडसुळ उपस्थित होते.

तुम्ही आमच्या गावात आलात तुमचे स्वागत आहे. प्रत्येक गावात स्वागत करू, पण जर हद्दवाढ कृती समितीच्या इशाऱ्यावर तुम्ही नाचणार असाल, त्यांच्या सांगण्यावरून आमच्या बससेवा बंद करणार असाल तर तुमची पाणी उपसा केंद्रे आमच्या हद्दीत आहेत, ती बंद केली जातील, असा इशाराही देण्यात आला.

लोकसंख्येच्या आधारावर विकास निधी मिळतोय म्हणून हद्दवाढ करा, अशी मागणी होत आहे. परंतु, ही फसवणूक आहे. आम्ही चांगल्या सुविधा ग्रामस्थांना देत आहोत. मग तुम्हाला आमच्या विकासाची घाई का लागलीय? अशी विचारणा वडणगेचे सरपंच सचिन चौगले यांनी केली. यावेळी प्रकाश रोटे, प्रकाश टोपकर, अमर मोरे, विष्णू गवळी यांनीही आपली मते मांडली.

स्फोटक परिस्थितीला कृती समिती जबाबदार

दबाव टाकून बससेवा बंद केली तर सहन केले जाणार नाही, आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा राजू माने यांनी दिला. कळंबा सरपंच सागर भोगम यांनी हद्दवाढीला आपला तीव्र विरोध असल्याचे सांगितले. तुमचा प्रश्न शासनदरबारी मांडा, उगाच ग्रामस्थांना वेठीस धरू नका. त्यातून स्फोटक वातावरण निर्माण झाले तर हद्दवाढ कृती समिती जबाबदार राहील, असा गर्भित इशारा भोगम यांनी दिला.

ग्रामीण भागात के.एम.टी फायद्यातकाही गावांत केएमटी बंद केल्याने ग्रामस्थांचे हाल होत आहे. आम्ही हाल सहन करू, फक्त आठ दिवस सर्वच गावांतील केएमटी बंद करा. किती तोटा होतो बघा. तुमची बससेवा ही शहरात नुकसानात आहे. पण ग्रामीण भागात फायद्यात आहे, असा दावा यावेळी करण्यात आला. आमची बस बंद करणारे कितीजण केएमटीतून प्रवास करतात, असा उपरोधिक सवाल यावेळी विचारला गेला.

सकाळी अर्ज, संध्याकाळी परवाना

ग्रामीण भागात एखाद्याने बांधकाम परवान्यासाठी अर्ज केला तर त्याला संध्याकाळपर्यंत परवाना दिला जातो. कधी-कधी आम्ही गाडीवर बसूनही सह्या करतो. तुमच्या शहरात वेगळे अनुभव आहेत. सहा-सहा महिने प्रतीक्षा करावी लागते, याचा अनुभव आम्ही घेतला असल्याचे काहींनी सांगितले.

पाण्याच्या कनेक्शनसाठी कर्ज

ग्रामीण भागात एक हजारात कनेक्शन आणि पाण्याचे बिल दीडशे रुपयांपासून अडीचशे रुपयांपर्यंत घेतले जाते. शहरात कनेक्शन घेण्यासाठी साठ ते सत्तर हजार रुपये खर्च येतो. म्हणजे कर्जच काढावे लागेल, अशी भीती सचिन चौगले यांनी व्यक्त केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर