शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळीत एसटीने केली ३०१ कोटी रुपयांची कमाई, २७ ऑक्टोबरला केला एका दिवसात सर्वाधिक कमाईचा विक्रम 
2
मुलगा शिवसेनेचा आमदार! नारायण राणे म्हणतात, बाळासाहेब होते तोपर्यंतच शिवसेना होती, आजची...
3
लवकरच 'ट्रू कॉलर'ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय; बनावट कॉल, फसवणुकीला लगाम लागणार 
4
"श्रेयस अय्यरची सर्जरी झालीच नाही," BCCIनी दिली वेगळीच माहिती, ताज्या अपडेटमध्ये नेमकं काय?
5
'त्या' भारतीय नागरिकाला आता होऊ शकते १० वर्षांची कैद अन् २.५ लाख डॉलर्सचा दंड! नेमकं प्रकरण काय?
6
निवडणुकांचा पत्ता नाही अन् शरद पवार गटाचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर; जयंत पाटील मैदानात
7
विवाह मुहूर्त: २०२५-२६ मध्ये फक्त ४९ दिवसच विवाह मुहूर्त; खरोखरंच करावी लागणार लगीन 'घाई'
8
Lenskart IPO: 'व्हॅल्युएशन'चा आकडा एवढा मोठा की वाचायला 'लेन्स'ची गरजच नाही; पण गुंतवणूकदारांना ते झेपेल का?
9
कॅनडात भारतीय वंशाच्या उद्योगपतीची गोळ्या झाडून हत्या; लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली जबाबदारी
10
निवडणूक बिहारमध्ये, चर्चा महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदेंची; एनडीएला डिवचण्यासाठी विरोधकांकडून 'शिंदे मॉडेल'चा उल्लेख
11
आधी सिनेमातून काढलं अन् आता...; 'कल्कि'च्या मेकर्सची दीपिकाविरोधात पुन्हा खेळी; चाहते संतापले
12
जगातील सर्वात मोठे स्टेडियम ते स्टॅच्यू ऑफ युनिटी... बांधणारी L&T चे खरे मालक कोण? कुठे झाली स्थापना?
13
सगळं संपलं असं वाटतंय? हातातून सर्व निसटून जातंय? स्वामींचे ‘हे’ शब्द नक्कीच प्रेरणा देतील!
14
प्रकट दिन २०२५: स्वामी अन् शंकर महाराजांची भेट कशी झाली? ब्रह्मांडनायक गुरुचा अद्भूत शिष्य
15
प्रकट दिन: कैलास का रहनेवाला, स्वामींचे दैवी परमशिष्य; विलक्षण अवलिया असलेले शंकर महाराज
16
ट्रम्प यांनी केलेला युद्धविराम हमासने तोडला की इस्रायलने? हवाई हल्ले, रणगाड्यांच्या तोफांनी गाझा हादरला, १८ ठार
17
क्रूरतेची सीमा ओलांडली! श्वास थांबेपर्यंत चिमुकल्याचा गळा दाबला; मृतदेह घाटावर फेकला! मन सुन्न करणारी घटना!
18
सोने-चांदीचे दर कोसळले! विक्रमी उच्चांकावरून सोने १३,०००, तर चांदी २९,००० रुपयांपर्यंत स्वस्त
19
१३८ दिवसांनी शनि मार्गी: ७ राशींची चंगळ, वरदानाचा काळ; यश-पैसा, सुख लाभेल, साडेसाती संपेल?
20
एक नंबर! वडील IAS, लेक झाली अरुणाचल प्रदेशची पहिली महिला IPS; रचला इतिहास

कोल्हापूर :‘आंबा’ सामान्यांच्या आवाक्यात, ओली मिरची, कोंथिबीर दर वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 14:34 IST

कर्नाटक, तमिळनाडू आणि आंध्रप्रदेश या राज्यातील आंबा कोल्हापुरातील बाजारात दाखल झाल्याने, आंबा दर कमी झाल्याने परराज्यातील आंबा १०० ते १५० डझन झाल्याने सामान्याच्या आवाक्यात आंबा आल्याने आठवडी बाजारात ही आंबे खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. मात्र, कोंथिंबिरीची पेंढी २५ ते ३० रुपये झाली आहे. दुसरीकडे कोबी, ओली भुईमूग शेंग, बीट यांची आवक मात्र वाढली आहे.

ठळक मुद्दे‘आंबा’ सामान्यांच्या आवाक्यात, ओली मिरची, कोंथिबीर दर वाढले कोबीची आवक वाढली

कोल्हापूर : कर्नाटक, तमिळनाडू आणि आंध्रप्रदेश या राज्यातील आंबा कोल्हापुरातील बाजारात दाखल झाल्याने, आंबा दर कमी झाल्याने परराज्यातील आंबा १०० ते १५० डझन झाल्याने सामान्याच्या आवाक्यात आंबा आल्याने आठवडी बाजारात ही आंबे खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. मात्र, कोंथिंबिरीची पेंढी २५ ते ३० रुपये झाली आहे. दुसरीकडे कोबी, ओली भुईमूग शेंग, बीट यांची आवक मात्र वाढली आहे.

 कोल्हापुरात आंब्यांची आवक वाढल्याने आठवडी बाजारात मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी झाली होती.(छाया : दीपक जाधव)

गेल्या आठवड्यात वळवाचा पाऊस आला असला तरी भाजीपाल्यावर त्याचा फारसा परिणाम झालेला दिसत नाही. काही प्रमाणात त्यांचे दर स्थिर होते. कोल्हापूरच्या बाजारपेठेत जिल्ह्यातून अन्य जिल्ह्यांबाहेरून सर्व पालेभाज्या, फळभाज्यांची आवक नियमित सुरू असून त्यामध्ये ओली भुईमूग शेंग, रताळी, मुळा, बीट, तोंदली यांची आवक आठवडी बाजारात वाढली आहे. हिरव्या वाटाण्याची आवक मात्र पूर्णपणे बंद झाली. कोथींबिरीची पेंढी २० ते २५ रुपये झाली आहे.विशेष म्हणजे या आठवड्यात कोबीची आवक भरपूर आल्याने दहा रुपयांना एक गड्डा मिळत होता. फ्लॉवरही जवळपास तितक्याच किमतीला मिळत होता तर मेथीची पेंढी १५ रुपये स्थिर आहे. पालक, पोकळा व शेपू पेंढी १२ रुपयांपर्यंत होती. कारली, दोडका, भेंडी, गवार २५ रुपये होती. गेल्या आठवड्यापेक्षा मोसंबीचा दर कमी झाला. द्राक्षे, अननस व कलिंगडचा दर या आठवड्यात स्थिर होता. पावसाच्या वातावरणामुळे लिंबू दहा रुपयांना चार होते. आल्याची आवक कमी असल्यामुळे आले मात्र १०० रुपये किलोच आहे.

डाळींचे दर स्थिरअधिक महिना सुरू झाल्याने लग्नसराई संपल्याने डाळींची मागणी जरी कमी असली तरी गेल्या आठवड्याप्रमाणेच डाळींचे दर स्थिर असल्याचे व्यापारी दत्ता साळवी यांनी सांगितले. त्यामध्ये तूरडाळ ७० रु., मूगडाळ ७५, उडीदडाळ ६५, हरभरा डाळ ५४ रु., मसूर डाळ ६० रु, चवळी ८० ते १०० रु. आहे.

फळांची आवक कमी; दर वाढले...सध्या बाजारपेठेत आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात झाली आहे. मात्र, अन्य फळांची आवक कमी झाल्याने दर वाढल्याचे फळ विक्रेते संजय कोळी यांनी सांगितले. त्यामध्ये मद्रास, कर्नाटक आंब्याचा दर १०० ते १२५ रुपये डझनाचा दर आहे. रत्नागिरी हापूस आंबा २५० पुढे आहे. सफरचंदचा दर २१० रु. किलो आहे. चिक्कूचा दर ८० रु. १०० किलो दर आहे. मोसंबीचा दर १२० ते १३० आहे. पेरूचा दर ६० ते १०० रु. आहे. डाळिंबांचा दर १२० किलो आहे. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMangoआंबाMarket Yardमार्केट यार्ड