शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

कोल्हापूर :‘आंबा’ सामान्यांच्या आवाक्यात, ओली मिरची, कोंथिबीर दर वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 14:34 IST

कर्नाटक, तमिळनाडू आणि आंध्रप्रदेश या राज्यातील आंबा कोल्हापुरातील बाजारात दाखल झाल्याने, आंबा दर कमी झाल्याने परराज्यातील आंबा १०० ते १५० डझन झाल्याने सामान्याच्या आवाक्यात आंबा आल्याने आठवडी बाजारात ही आंबे खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. मात्र, कोंथिंबिरीची पेंढी २५ ते ३० रुपये झाली आहे. दुसरीकडे कोबी, ओली भुईमूग शेंग, बीट यांची आवक मात्र वाढली आहे.

ठळक मुद्दे‘आंबा’ सामान्यांच्या आवाक्यात, ओली मिरची, कोंथिबीर दर वाढले कोबीची आवक वाढली

कोल्हापूर : कर्नाटक, तमिळनाडू आणि आंध्रप्रदेश या राज्यातील आंबा कोल्हापुरातील बाजारात दाखल झाल्याने, आंबा दर कमी झाल्याने परराज्यातील आंबा १०० ते १५० डझन झाल्याने सामान्याच्या आवाक्यात आंबा आल्याने आठवडी बाजारात ही आंबे खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. मात्र, कोंथिंबिरीची पेंढी २५ ते ३० रुपये झाली आहे. दुसरीकडे कोबी, ओली भुईमूग शेंग, बीट यांची आवक मात्र वाढली आहे.

 कोल्हापुरात आंब्यांची आवक वाढल्याने आठवडी बाजारात मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी झाली होती.(छाया : दीपक जाधव)

गेल्या आठवड्यात वळवाचा पाऊस आला असला तरी भाजीपाल्यावर त्याचा फारसा परिणाम झालेला दिसत नाही. काही प्रमाणात त्यांचे दर स्थिर होते. कोल्हापूरच्या बाजारपेठेत जिल्ह्यातून अन्य जिल्ह्यांबाहेरून सर्व पालेभाज्या, फळभाज्यांची आवक नियमित सुरू असून त्यामध्ये ओली भुईमूग शेंग, रताळी, मुळा, बीट, तोंदली यांची आवक आठवडी बाजारात वाढली आहे. हिरव्या वाटाण्याची आवक मात्र पूर्णपणे बंद झाली. कोथींबिरीची पेंढी २० ते २५ रुपये झाली आहे.विशेष म्हणजे या आठवड्यात कोबीची आवक भरपूर आल्याने दहा रुपयांना एक गड्डा मिळत होता. फ्लॉवरही जवळपास तितक्याच किमतीला मिळत होता तर मेथीची पेंढी १५ रुपये स्थिर आहे. पालक, पोकळा व शेपू पेंढी १२ रुपयांपर्यंत होती. कारली, दोडका, भेंडी, गवार २५ रुपये होती. गेल्या आठवड्यापेक्षा मोसंबीचा दर कमी झाला. द्राक्षे, अननस व कलिंगडचा दर या आठवड्यात स्थिर होता. पावसाच्या वातावरणामुळे लिंबू दहा रुपयांना चार होते. आल्याची आवक कमी असल्यामुळे आले मात्र १०० रुपये किलोच आहे.

डाळींचे दर स्थिरअधिक महिना सुरू झाल्याने लग्नसराई संपल्याने डाळींची मागणी जरी कमी असली तरी गेल्या आठवड्याप्रमाणेच डाळींचे दर स्थिर असल्याचे व्यापारी दत्ता साळवी यांनी सांगितले. त्यामध्ये तूरडाळ ७० रु., मूगडाळ ७५, उडीदडाळ ६५, हरभरा डाळ ५४ रु., मसूर डाळ ६० रु, चवळी ८० ते १०० रु. आहे.

फळांची आवक कमी; दर वाढले...सध्या बाजारपेठेत आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात झाली आहे. मात्र, अन्य फळांची आवक कमी झाल्याने दर वाढल्याचे फळ विक्रेते संजय कोळी यांनी सांगितले. त्यामध्ये मद्रास, कर्नाटक आंब्याचा दर १०० ते १२५ रुपये डझनाचा दर आहे. रत्नागिरी हापूस आंबा २५० पुढे आहे. सफरचंदचा दर २१० रु. किलो आहे. चिक्कूचा दर ८० रु. १०० किलो दर आहे. मोसंबीचा दर १२० ते १३० आहे. पेरूचा दर ६० ते १०० रु. आहे. डाळिंबांचा दर १२० किलो आहे. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMangoआंबाMarket Yardमार्केट यार्ड