शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
“रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
3
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हण्याल्या...
4
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
5
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
6
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
7
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
8
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
9
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
10
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
11
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
12
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
13
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
14
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
15
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
16
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
17
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
18
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
19
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
20
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : कचऱ्याच्या एका चुकीमुळे पर्यावरणाची हानी, मनपातर्फे घनकचरा व्यवस्थापन कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 15:58 IST

दैनंदिन जीवनात मनुष्य कचऱ्याच्या बाबतीत एक चुक करतो. परंतु त्या हजार पटीने वाढतात. याच चुका पशु - पक्षी आणि संपूर्ण मानव जातीवर विपरीत परिणाम करतात. पर्यावरणाची अपरिमित हानी तर होतेच शिवाय जीवसृष्टीची सुध्दा हानी होते. त्यामुळे कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे हे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन घनकचरा व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ज्ञ श्रीनिवासन यांनी बुधवारी येथे केले.

ठळक मुद्देकचऱ्याच्या एका चुकीमुळे पर्यावरणाची हानीमनपातर्फे घनकचरा व्यवस्थापन कार्यशाळानागरीकांनी कचऱ्याचे विलगीकरण घरातूनच करुन दिले पाहिजेशहर स्वच्छ ठेवण्याची तसेच पर्यावरणाची हानी होणार नाही याची जबाबदारी प्रत्येक नागरीकांची

कोल्हापूर : दैनंदिन जीवनात मनुष्य कचऱ्याच्या बाबतीत एक चुक करतो. परंतु त्या हजार पटीने वाढतात. याच चुका पशु - पक्षी आणि संपूर्ण मानव जातीवर विपरीत परिणाम करतात. पर्यावरणाची अपरिमित हानी तर होतेच शिवाय जीवसृष्टीची सुध्दा हानी होते. त्यामुळे कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे हे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन घनकचरा व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ज्ञ श्रीनिवासन यांनी बुधवारी येथे केले.घनकचरा व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ज्ञ इंडियन तसेच ग्रीन सर्व्हिसेसचे (वेल्लोर, तमिळनाडू)या संस्थेचे श्रीनिवास यांची दोन दिवसीय मोफत कार्यशाळा येथील केशवराव भोसले नाट्यगृहात आयोजित करण्यात आली असून या कार्यशाळेत ते मार्गदर्शन करीत होते.

महापौर स्वाती यवलुजे यांच्या हस्ते महात्मा गांधींच्या प्रतिमेचे पूजन करुन कार्यशाळेचे उद्घाटन झाले. गुरुवारीही कार्यशाळेत मार्गदर्शन होणार आहे.

माणसाकडून निर्माण होणारा कचरा हा पशु - पक्षी यांच्यासह शेवटी माणसांच्या जगण्यावरच कसा परिणाम करीत आहे याचे गांभीर्य श्रीनिवास यांनी चित्रफितीच्या माध्यमातून उपस्थितांना दाखवून दिले. घनकचऱ्याचे योग्यरित्या विघटन झाले नाही तर कचऱ्याच्या ढीगातून निर्माण होणारा मिथेन वायू माणसाला खायला उठतो.

उघड्यावर, मोकळ्या विहिरीत कचरा टाकल्यामुळे पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत खराब होतात. त्या परिसरातील केवळ मातीच नाही तर हवा, पाणी सुध्दा प्रदुषित होते. त्याचा परिणाम थेट मानुष्य जीवनावर हातो, असे श्रीनिवास यांनी सांगितले.कचऱ्यातून आलेल्या प्लॅस्टीकच्या पिशव्या जनावरांच्या जीवनावर कशा उठतात हेदेखिल चित्रफितीच्या माध्यमातून त्यांनी दाखवून दिले. जनावरे कचऱ्यासह प्लॅस्टीक खातात आणि त्यातच त्यांचा मृत्यू होतो.

जयपूरमध्ये मृत झालेल्या अनेक गायींचे शवविश्चेदन करण्यात आले त्यावेळी त्याच्या पोटात १० किलोपासून ५० किलोपर्यंत प्लॅस्टीकच्या पिशव्या आढळून आल्या. माणसाची एक चुक अशा किती मुक्या जनावरांचा जीव घेत असतील याचा विचार नागरीकांनी केला पाहिजे, असे श्रीनिवास म्हणाले.घरातील कचरा थेट रस्त्यावर न टाकता नागरीकांनी कचऱ्याचे विलगीकरण घरातूनच करुन दिले पाहिजे, अन्यथा हाच कचरा एक दिवस आपल्याच जीवावर उठणार आहे. त्यामुळे नागरीकांनी या विषयाकडे गांभीर्यान पाहण्याची आवश्यकता आह, असेही ते म्हणाले.उद्घाटक या नात्याने मार्गदर्शन करताना महापौर यवलुजे यांनी आपले शहर स्वच्छ ठेवण्याची तसेच पर्यावरणाची हानी होणार नाही याची जबाबदारी ही प्रत्येक नागरीकांची आहे. नागरीकांनी सरकारी योजनांची माहिती करुन घेऊन त्याच्या अंमलबजावणीत योगदान दिले पाहिजे असे सांगितले.उद्घाटन समारंभास उपमहापौर सुनिल पाटील, स्थायी सभापती संदीप नेजदार, स्वच्छ शहरचे ब्रॅँड अम्बेसिडर डॉ. मधुकर बाचुळकर, प्रभारी उपायुक्त मंगेश शिंदे, नगरसेविका उमा इंगळे, रुपाराणी निकम, सूरमंजरी लाटकर, भाग्यश्री शेटके, नगरसेवक भुपाल शेटे, सुचन पाटील, अफजल पिरजादे यांच्यासह समाजातील विविध क्षेत्रातील नागरीक, मनपा कर्मचारी उपस्थित होते.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMuncipal Corporationनगर पालिका