शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

कोल्हापूर : कचऱ्याच्या एका चुकीमुळे पर्यावरणाची हानी, मनपातर्फे घनकचरा व्यवस्थापन कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 15:58 IST

दैनंदिन जीवनात मनुष्य कचऱ्याच्या बाबतीत एक चुक करतो. परंतु त्या हजार पटीने वाढतात. याच चुका पशु - पक्षी आणि संपूर्ण मानव जातीवर विपरीत परिणाम करतात. पर्यावरणाची अपरिमित हानी तर होतेच शिवाय जीवसृष्टीची सुध्दा हानी होते. त्यामुळे कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे हे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन घनकचरा व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ज्ञ श्रीनिवासन यांनी बुधवारी येथे केले.

ठळक मुद्देकचऱ्याच्या एका चुकीमुळे पर्यावरणाची हानीमनपातर्फे घनकचरा व्यवस्थापन कार्यशाळानागरीकांनी कचऱ्याचे विलगीकरण घरातूनच करुन दिले पाहिजेशहर स्वच्छ ठेवण्याची तसेच पर्यावरणाची हानी होणार नाही याची जबाबदारी प्रत्येक नागरीकांची

कोल्हापूर : दैनंदिन जीवनात मनुष्य कचऱ्याच्या बाबतीत एक चुक करतो. परंतु त्या हजार पटीने वाढतात. याच चुका पशु - पक्षी आणि संपूर्ण मानव जातीवर विपरीत परिणाम करतात. पर्यावरणाची अपरिमित हानी तर होतेच शिवाय जीवसृष्टीची सुध्दा हानी होते. त्यामुळे कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे हे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन घनकचरा व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ज्ञ श्रीनिवासन यांनी बुधवारी येथे केले.घनकचरा व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ज्ञ इंडियन तसेच ग्रीन सर्व्हिसेसचे (वेल्लोर, तमिळनाडू)या संस्थेचे श्रीनिवास यांची दोन दिवसीय मोफत कार्यशाळा येथील केशवराव भोसले नाट्यगृहात आयोजित करण्यात आली असून या कार्यशाळेत ते मार्गदर्शन करीत होते.

महापौर स्वाती यवलुजे यांच्या हस्ते महात्मा गांधींच्या प्रतिमेचे पूजन करुन कार्यशाळेचे उद्घाटन झाले. गुरुवारीही कार्यशाळेत मार्गदर्शन होणार आहे.

माणसाकडून निर्माण होणारा कचरा हा पशु - पक्षी यांच्यासह शेवटी माणसांच्या जगण्यावरच कसा परिणाम करीत आहे याचे गांभीर्य श्रीनिवास यांनी चित्रफितीच्या माध्यमातून उपस्थितांना दाखवून दिले. घनकचऱ्याचे योग्यरित्या विघटन झाले नाही तर कचऱ्याच्या ढीगातून निर्माण होणारा मिथेन वायू माणसाला खायला उठतो.

उघड्यावर, मोकळ्या विहिरीत कचरा टाकल्यामुळे पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत खराब होतात. त्या परिसरातील केवळ मातीच नाही तर हवा, पाणी सुध्दा प्रदुषित होते. त्याचा परिणाम थेट मानुष्य जीवनावर हातो, असे श्रीनिवास यांनी सांगितले.कचऱ्यातून आलेल्या प्लॅस्टीकच्या पिशव्या जनावरांच्या जीवनावर कशा उठतात हेदेखिल चित्रफितीच्या माध्यमातून त्यांनी दाखवून दिले. जनावरे कचऱ्यासह प्लॅस्टीक खातात आणि त्यातच त्यांचा मृत्यू होतो.

जयपूरमध्ये मृत झालेल्या अनेक गायींचे शवविश्चेदन करण्यात आले त्यावेळी त्याच्या पोटात १० किलोपासून ५० किलोपर्यंत प्लॅस्टीकच्या पिशव्या आढळून आल्या. माणसाची एक चुक अशा किती मुक्या जनावरांचा जीव घेत असतील याचा विचार नागरीकांनी केला पाहिजे, असे श्रीनिवास म्हणाले.घरातील कचरा थेट रस्त्यावर न टाकता नागरीकांनी कचऱ्याचे विलगीकरण घरातूनच करुन दिले पाहिजे, अन्यथा हाच कचरा एक दिवस आपल्याच जीवावर उठणार आहे. त्यामुळे नागरीकांनी या विषयाकडे गांभीर्यान पाहण्याची आवश्यकता आह, असेही ते म्हणाले.उद्घाटक या नात्याने मार्गदर्शन करताना महापौर यवलुजे यांनी आपले शहर स्वच्छ ठेवण्याची तसेच पर्यावरणाची हानी होणार नाही याची जबाबदारी ही प्रत्येक नागरीकांची आहे. नागरीकांनी सरकारी योजनांची माहिती करुन घेऊन त्याच्या अंमलबजावणीत योगदान दिले पाहिजे असे सांगितले.उद्घाटन समारंभास उपमहापौर सुनिल पाटील, स्थायी सभापती संदीप नेजदार, स्वच्छ शहरचे ब्रॅँड अम्बेसिडर डॉ. मधुकर बाचुळकर, प्रभारी उपायुक्त मंगेश शिंदे, नगरसेविका उमा इंगळे, रुपाराणी निकम, सूरमंजरी लाटकर, भाग्यश्री शेटके, नगरसेवक भुपाल शेटे, सुचन पाटील, अफजल पिरजादे यांच्यासह समाजातील विविध क्षेत्रातील नागरीक, मनपा कर्मचारी उपस्थित होते.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMuncipal Corporationनगर पालिका