शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
2
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
3
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
4
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
5
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...
6
भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप
7
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
8
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!
9
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
10
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...
12
Rohini Khadse-Khewalkar : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
13
Nag Panchami 2025: नागपंचमीला तळणे, चिरणे, कापणे निषिद्ध; वाचा शास्त्रीय आणि धार्मिक कारण!
14
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!
15
"...तर मी त्यांना १०० रुपये देतो", सचिन पिळगावकर आजही आवर्जुन करतात 'ही' गोष्ट, म्हणाले- "ते पैसे लोक फ्रेम करून..."
16
१३ हजारांत १०८ MP कॅमेरा, ६५००mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; नोकियाच्या नव्या फोनची चर्चा!
17
सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर...
18
श्रीमंत बनण्याचा फॅार्म्युला, फक्त बदला या ५ सवयी; महिन्याला वाचवा १० हजार, लोकंही विचारतील कशी झाली 'ही' जादू
19
Barabanki Awshaneshwar Temple Stampede : माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?

गुड न्यूज: देवदेवतांचे फोटो, ई-कचरा गोळा करण्याचे व्रत; ‘कोल्हापूर अर्थ वॉरियर्स’चा उपक्रम 

By भीमगोंड देसाई | Updated: January 1, 2025 15:14 IST

२० कार्यकर्ते राबतात आपल्या शहरासाठी

भीमगोंडा देसाईकोल्हापूर : ‘कोल्हापूर अर्थ वॉरियर्स’तर्फे गेल्या तीन वर्षांपासून ई-कचरा संकलन आणि स्वच्छता मोहीम राबवून आदर्श निर्माण केला आहे. सध्या ते दर महिन्याच्या २३ तारखेला शहरातील एका भागात सकाळी एक तास स्वच्छता करतात. रंकाळा टॉवरजवळील महापालिकेच्या दुकान गाळ्यात प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी ९ ते १२ पर्यंत ई-कचरा, टाकाऊ देव, देवतांचे फोटो, पुस्तके प्लास्टिक संकलित केले जाते. संकलित होणारा कचरा पुनर्निर्मितीसाठी सांगली येथील संस्थेकडे पाठवला जातो. संस्थेच्या या उपक्रमामुळे शहराच्या स्वच्छतेला हातभार लागत आहे.

कोल्हापूर अर्थ वॉरियर्सतर्फे पर्यावरण संरक्षण, रक्षणासाठी काम करते. यामध्ये २० कार्यकर्ते सक्रियपणे काम करतात. चार वर्षांपासून पर्यावरणाच्या रक्षणासाठी ही संस्था विविध उपक्रम राबवते. पहिल्या टप्प्यात तीन महिन्यांतून एक दिवस बिंदू चौक, गंगावेस, राजारामपुरी आईचा पुतळा, क्रशर चौक येथे ई-कचरा, खराब झालेले देवदेवतांचे फोटो, मूर्ती, पुस्तकांचे संकलन करण्यात येत होते. यातून सुमारे एक हजार किलो ई-कचरा गोळा होत होता. याला प्रतिसाद मिळत राहिल्याने प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी महापालिकेने दिलेल्या दुकान गाळ्यात कचरा संकलन केले जाते. एक वर्षापासून हा उपक्रम निरंतरपणे सुरू आहे. याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. एका दिवसात ५०० किलोपर्यंत कचरा एकत्र होतो. यामध्ये प्रामुख्याने खराब झालेले टीव्ही, संगणक, असा ई-कचरा मोठ्या प्रमाणात असतो. हा कचरा उघड्यावर टाकल्यानंतर त्याचे गंभीर परिणाम पर्यावरणावर होतात. म्हणून हा सर्व कचरा वॉरियर्सतर्फे काटेकोरपणे संकलित केला जातो. यांनी सुरू केलेल्या केंद्रामुळे ई-कचरा देऊ इच्छिणाऱ्यांची चांगली सोय झाली आहे. अर्थ वॉरियर्सचे आशिष कोंगळेकर, अभिजित कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली विविध उपक्रम राबवले जात आहेत.

शाळा, महाविद्यालयांत प्रबोधनपर्यावरणपूरक उपक्रम, उघड्यावर प्लास्टिक, ई-कचरा टाकल्यानंतर पर्यावरणावर, मानवी वस्तीवर कोणते परिणाम होतात, याचे प्रबोधन अर्थ वॉरियर्सतर्फे केले जात आहे. यावेळी शाळा, कॉलेज, महाविद्यालयांनाही प्लास्टिक, ई-कचरा संकलन केंद्र सुरू करावे, असे आवाहनही केले जाते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर