शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
5
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
6
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
7
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
8
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
9
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
10
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
11
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
12
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
13
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
15
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
16
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
17
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
18
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
19
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!
20
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड

कोल्हापूर : गणेशमूर्तींचे इराणी खणीत विसर्जन,निर्माल्याचे खत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 11:44 IST

कोल्हापुरकरांनी पर्यावरणपुरकरित्या कुंडात विसर्जन केलेल्या गणेशमूर्तींचे इराणी खणीत पून्हा विसर्जन करण्यात आले. तर निर्माल्य एकटी संस्थेच्या वाशी येथील प्लॅन्टवर पाठवण्यात आले. या निर्माल्याचे संस्थेच्यावतीने खत बनवले जाते.

ठळक मुद्दे गणेशमूर्तींचे इराणी खणीत विसर्जनशंभर टक्के निर्माल्य दान, निर्माल्याचे खत

कोल्हापूर : कोल्हापुरकरांनी पर्यावरणपुरकरित्या कुंडात विसर्जन केलेल्या गणेशमूर्तींचे इराणी खणीत पून्हा विसर्जन करण्यात आले. तर निर्माल्य एकटी संस्थेच्या वाशी येथील प्लॅन्टवर पाठवण्यात आले. या निर्माल्याचे संस्थेच्यावतीने खत बनवले जाते.भक्तांच्या घरी राहून पाच दिवस पाहूणचार घेतलेल्या गणपती बाप्पांना सोमवारी जडअंतकरणाने निरोप देण्यात आला. उत्सव जल्लोषात साजरा करताना कोल्हापुरकरांनी मात्र पर्यावरणप्रेमी, सुजाण आणि जागरुक नागरिकाचे कर्तव्य पार पाडले. पंचगंगा नदी घाट, रंकाळा, कोटीतीर्थ, राजाराम तलाव, राजाराम बंधारा, कळंबा अशा जलाशयांच्या ठिकाणी जावूनही प्रत्यक्ष नदी पात्रात किंवा तलावात मूर्ती विसर्जित करण्याचा मोह नागरिकांनी टाळला. तेथेच स्वयंसेवी संस्था व महापालिकेने तयार केलेल्या विसर्जन कुंडात गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. तर शंभर टक्के निर्माल्य दान झाले.

कोल्हापूर शहरच नव्हे तर जिल्ह्यातही पर्यावरणपुरक गणेशोत्सव साजरा करण्यात आला. कोल्हापूर शहरातही राजारामपूरी, सासणे ग्राऊंड, उपनगरे, पाचगाव परिसर, विविध कॉलन्यांमध्ये गणेशमूर्ती विसर्जनासाठी काहिलीेची सोय करण्यात आली होती.भागाभागातील नागरिक तेथे येवून गणेशमूर्ती विसर्जित करत होते. सोमवारी मध्यरात्रीपर्यंत गणेश विसर्जनाचा सोहळा सुरू होता. मंगळवारी सकाळी सहा वाजल्यापासूनच महापालिकेच्या सफाई कामगारांनी पंचगंगा नदी घाटाच्या स्वच्छतेला सुरवात केली.

 

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८kolhapurकोल्हापूर