शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

कोल्हापूर : डिझेल दरवाढीमुळे जिल्ह्यातील ५० टक्के आयात-निर्यात थांबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 10:50 IST

डिझेलच्या किमती झपाट्याने वाढल्याने वाहतूक खर्चातही वाढ होत आहे. त्यामुळे आयात व निर्यात मालवाहतुकीवर ५० टक्के परिणाम झाला आहे. परिणामी डिझेल दरवाढीचा झटका बसल्याने महागाईची शक्यता बाजारपेठेतून व्यक्त होत आहे. त्यातच टोल टॅक्स, वाहन विमा हप्त्यांमध्येही कमालीची वाढ केल्याने ट्रक व्यवसाय मेटाकुटीला आला आहे.

ठळक मुद्देडिझेल दरवाढीमुळे जिल्ह्यातील ५० टक्के आयात-निर्यात थांबलीमहागाईची शक्यता : मालट्रकची चाके थांबली

कोल्हापूर : डिझेलच्या किमती झपाट्याने वाढल्याने वाहतूक खर्चातही वाढ होत आहे. त्यामुळे आयात व निर्यात मालवाहतुकीवर ५० टक्के परिणाम झाला आहे. परिणामी डिझेल दरवाढीचा झटका बसल्याने महागाईची शक्यता बाजारपेठेतून व्यक्त होत आहे. त्यातच टोल टॅक्स, वाहन विमा हप्त्यांमध्येही कमालीची वाढ केल्याने ट्रक व्यवसाय मेटाकुटीला आला आहे.डिझेलच्या किमती प्रतिलिटर ७० रुपयांवर गेल्यामुळे ट्रक व्यवसाय अडचणीत आहे. गेल्या महिन्याभरात डिझेलमध्ये प्रतिलिटर ७ रुपयांनी वाढ झाली. महाराष्ट्र  सरकारने पेट्रोल-डिझेलसाठी दुष्काळ निवारणचा अधिभार लावल्याने पेट्रोल-डिझेलच्या किमती इतर राज्यांपेक्षा सर्वांत जास्त महाराष्ट्रात आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यातून अहमदाबाद (गुजरात), राजस्थान, केरळ, बंगलोर, नागपूर, मुंबई तसेच कर्नाटक, तमिळनाडू, आंध्रप्रदेश येथेही मालवाहतुक ट्रकद्वारे साखर, गूळ, धान्य, कडधान्य, किराणा भुसारी, सिमेंट, बांधकाम व्यवसायातील स्टील आदी साहित्य पाठविले जाते तर विदर्भ-मराठवाडा तून कडधान्य, ज्वारी, तसेच पंजाबमधून गहू, तांदूळ तसेच मोर्वी (राजस्थान) येथून टाईल्स, मार्बल व विविध फरशा आयात होतात.डिझेलच्या दरवाढीमुळे मालवाहतूक खर्चात किमान २ ते ३ रुपये प्रतिकिमी वाढ अपेक्षित आहे; पण व्यापारी मालवाहतुकीला वाढीव परवडणारे दर द्यायला तयार नाहीत. परिणामी, आयात-निर्यातीच्या वाहतुकीवर मोठा परिणाम होत आहे.

मालट्रक थांबूनव्यापारी मालवाहतुकीला परवडणारे दर द्यायला तयार नसल्याने सध्या वाहतूक परवडत नसल्याने ५० टक्के ट्रक मालवाहतूक आज ठप्प झाली. परिणामी शिरोली जकात नाका, मार्केट यार्ड परिसरात ट्रक थांबून आहेत.

टोल टॅक्स, विमामध्येही वाढपेट्रोल-डिझेल दरापाठोपाठ टोल टॅक्समध्येही १ एप्रिलपासून १० टक्के तर वाहनांच्या थर्ड पार्टी विमा रकमेमध्येही ‘आयआरडीए’ने २६ टक्के वाढ केल्याने मालवाहतूकदार अडचणीत आहे.

....तर चक्का जाम..थर्ड पार्टी विमामधील दरवाढ कमी करावी, या मागणीसाठी आॅल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्यावतीने दिल्लीत २६ आणि २८ एप्रिलला बैठक बोलावली आहे. निर्णय न झाल्यास राज्यभर ‘चक्का जाम’चा इशाराही असोसिएशनने दिला.

बँकांनीही पाठ फिरविलीमालवाहतूक अडचणीत आल्याने ट्रकमालकांना बँकांचे काढलेले कर्ज परतावा करतानाही अवघड बनले. अशा परिस्थितीत नवीन कर्ज देण्यास बँका अथवा फायनान्स कंपन्यांनी पाठ फिरविली.

कोल्हापूर जिल्ह्यातील ट्रक वाहतूक- ऊस वाहतूक ट्रक : ४५००- बॉक्साईट वाहतूक : ११ हजार- लोकल मालवाहतूक : एक हजार ट्रक- उर्वरित मालवाहतूक : ६ हजार ट्रक

 

डिझेलच्या वाढत्या दरामुळे ट्रक व्यवसाय अडचणीत आहे. त्यामुळे मालवाहतुकीच्या दरात वाढ करावी लागणार आहे; पण व्यापारी परवडणारे दर देण्यास तयार नसल्याने ट्रक एका जागेवर थांबून आहेत. परिणामी आवक-जावकवर ५० टक्के परिणाम झाला आहे.- सुभाष जाधव,अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा लॉरी आॅपरेटर्स असोसिएशन 

 

टॅग्स :Petrolपेट्रोलkolhapurकोल्हापूर