शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : राजू शेट्टींच्या निष्क्रियतेमुळेच पाणीसंघर्ष - धैर्यशील माने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 17:55 IST

पंचगंगा प्रदूषण निर्मूलनासाठी खासदार राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारच्या पातळीवर जे प्रयत्न करणे अपेक्षित होते, ते न केल्यानेच ‘वारणा’, ‘पंचगंगा’ नद्यांतील पाण्याचा संघर्ष पेटल्याची टीका जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धैर्यशील माने यांनी पत्रकातून केली आहे.

ठळक मुद्देराजू शेट्टींच्या निष्क्रियतेमुळेच पाणीसंघर्ष - धैर्यशील मानेताकदीने प्रयत्न शेट्टी यांनी केलेच नाहीत

कोल्हापूर : पंचगंगा प्रदूषण निर्मूलनासाठी खासदार राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारच्या पातळीवर जे प्रयत्न करणे अपेक्षित होते, ते न केल्यानेच ‘वारणा’, ‘पंचगंगा’ नद्यांतील पाण्याचा संघर्ष पेटल्याची टीका जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धैर्यशील माने यांनी केली आहे.पंचगंगेतील दूषित पाण्याने हातकणंगले, शिरोळ तालुक्यांतील अनेकांचे जीव घेतले आहेत. दूषित पाण्यात मिसळणाऱ्या रसायनांमुळे त्वचारोग, कॅन्सर आजाराने ग्रासले आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळ व शासकीय यंत्रणेने वेळीच उपाययोजना केली असती तर लोकांच्या जिवाशी खेळ झाला नसता.

जिल्हा परिषदेने २४ फेबु्रवारी २०१४ रोजी ३० गावांचा सांडपाणी व सहा गावांचा घनकचरा व्यवस्थापनाचा १०८ कोटींचा प्रकल्प अहवाल राज्य सरकारकडे पाठविला होता. पर्यावरण विभागाने शिफारशीसह नोव्हेंबर २०१४ मध्ये राष्ट्रीय नदी संवर्धन संचालनालय वने व पर्यावरण विभाग, नवी दिल्ली यांच्याकडे पाठविला.

तो वेगवेगळी कारणे दाखवून नाकारण्यात आला. पंचगंगा प्रदूषण व उपाययोजनेबाबत केंद्र सरकारच्या पातळीवर खासदार म्हणून ताकदीने प्रयत्न होणे गरजेचे होते, ते राजू शेट्टी यांनी केलेच नाहीत. जिल्हा परिषदेने पाठविलेला प्रस्ताव मंजूर करून निधी आणला असता तर आज पाण्यासाठी ‘ग्रामीण विरुद्ध शहरी’ असा संघर्ष झाला नसता, असेही धैर्यशील माने यांनी म्हटले आहे. 

 

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीkolhapurकोल्हापूर