शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

कोल्हापूर : पॉस मशीन बंदमुळे रेशन ग्राहकांना मनस्ताप, तब्बल अर्धा दिवस सर्व्हर डाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2018 11:47 IST

दिवाळीच्या आदल्या दिवशीच ई-पॉस बंद राहिल्याने रेशन ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागला. सर्व्हर डाऊनमुळे अर्धा दिवस ग्राहकांना रेशन दुकानांसमोर धान्य घेण्यासाठी ताटकळत उभे राहावे लागले. तांत्रिक बिघाडामुळे शहरासह गावा-गावांमधील ग्राहकांची ससेहोलपट झाली. याबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.

ठळक मुद्देपॉस मशीन बंदमुळे रेशन ग्राहकांना मनस्तापग्राहकांमधून तीव्र प्रतिक्रिया, तब्बल अर्धा दिवस सर्व्हर डाऊन

कोल्हापूर : दिवाळीच्या आदल्या दिवशीच ई-पॉस बंद राहिल्याने रेशन ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागला. सर्व्हर डाऊनमुळे अर्धा दिवस ग्राहकांना रेशन दुकानांसमोर धान्य घेण्यासाठी ताटकळत उभे राहावे लागले. तांत्रिक बिघाडामुळे शहरासह गावा-गावांमधील ग्राहकांची ससेहोलपट झाली. याबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.दिवाळी बुधवारी असल्याने घराघरांत फराळ करण्याचे काम सुरू आहे. रेशनवर गहू, तूरडाळ, तांदूळ व साखर मिळत असल्याने ते घेण्यासाठी गेल्या दोन-चार दिवसांपासून दुकानांसमोर रांगा लागल्या आहेत; परंतु सोमवारी सकाळपासून रेशन दुकानांमधील ई-पॉस मशीन बंद असल्याचे दुकानदारांच्या लक्षात आले. सर्वच व्यवहार या मशीनवर असल्याने ते सुरू झाल्याशिवाय धान्य वितरण करणे शक्य नाही. दुकानात धान्य आहे परंतु ते वाटप करता येत नाही, अशी स्थिती निर्माण झाली.

सर्व्हर डाऊनमुळे ई-पॉस मशीनवर अशाप्रकारे तांत्रिक अडथळ्यांचा संदेश येत होता. 

अधिक माहिती घेतल्यानंतर ई पॉस मशीनचा सर्व्हर डाऊन झाल्याचे समजले. काहीवेळांतच तो पूर्ववत होईल अशी अपेक्षा होती. त्यामुळे दुकानांसमोर ग्राहकांच्या रांगा कायम होत्या. दुपारपर्यंत ही मशीन बंद राहीली. ऐन दिवाळीत शासनाच्या या गलथानपणाबद्दल ग्राहकांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. आम्ही फराळ कधी करायचा, किती वेळ थांबायचे, अशा भावना महिला ग्राहकांनी व्यक्त केल्या. सरकारबरोबरच सर्व रोष दुकानदारांवर व्यक्त होत होता.

यावर आम्हाला धान्य द्यायला काहीच अडचण नाही, परंतु सर्व्हर डाऊनमुळे मशीन बंद असल्याने ते देता येत नसल्याचे दुकानदांकडून सांगण्यात येत होते. हे सांगत असताना त्यांची चांगलीच कसरत होत होती. अखेर दुपारनंतर ही मशीन पूर्ववत सुरू झाल्याने धान्य वितरणास सुरुवात झाली. धान्य घेण्यासाठी अर्धा दिवस ताटकळत थांबलेल्या ग्राहकांच्या रांगा सायंकाळपर्यंत कायम राहिल्या.

 

 

टॅग्स :Governmentसरकारkolhapurकोल्हापूर