शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
2
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
3
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
4
काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
5
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
6
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
7
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
8
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
9
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
10
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
11
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
12
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
13
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता
14
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
15
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
16
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
17
Pahalgam Terror Attack : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
18
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला
19
Marriage Ritual: लग्नांनंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!
20
हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी

कोल्हापूर : पॉस मशीन बंदमुळे रेशन ग्राहकांना मनस्ताप, तब्बल अर्धा दिवस सर्व्हर डाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2018 11:47 IST

दिवाळीच्या आदल्या दिवशीच ई-पॉस बंद राहिल्याने रेशन ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागला. सर्व्हर डाऊनमुळे अर्धा दिवस ग्राहकांना रेशन दुकानांसमोर धान्य घेण्यासाठी ताटकळत उभे राहावे लागले. तांत्रिक बिघाडामुळे शहरासह गावा-गावांमधील ग्राहकांची ससेहोलपट झाली. याबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.

ठळक मुद्देपॉस मशीन बंदमुळे रेशन ग्राहकांना मनस्तापग्राहकांमधून तीव्र प्रतिक्रिया, तब्बल अर्धा दिवस सर्व्हर डाऊन

कोल्हापूर : दिवाळीच्या आदल्या दिवशीच ई-पॉस बंद राहिल्याने रेशन ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागला. सर्व्हर डाऊनमुळे अर्धा दिवस ग्राहकांना रेशन दुकानांसमोर धान्य घेण्यासाठी ताटकळत उभे राहावे लागले. तांत्रिक बिघाडामुळे शहरासह गावा-गावांमधील ग्राहकांची ससेहोलपट झाली. याबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.दिवाळी बुधवारी असल्याने घराघरांत फराळ करण्याचे काम सुरू आहे. रेशनवर गहू, तूरडाळ, तांदूळ व साखर मिळत असल्याने ते घेण्यासाठी गेल्या दोन-चार दिवसांपासून दुकानांसमोर रांगा लागल्या आहेत; परंतु सोमवारी सकाळपासून रेशन दुकानांमधील ई-पॉस मशीन बंद असल्याचे दुकानदारांच्या लक्षात आले. सर्वच व्यवहार या मशीनवर असल्याने ते सुरू झाल्याशिवाय धान्य वितरण करणे शक्य नाही. दुकानात धान्य आहे परंतु ते वाटप करता येत नाही, अशी स्थिती निर्माण झाली.

सर्व्हर डाऊनमुळे ई-पॉस मशीनवर अशाप्रकारे तांत्रिक अडथळ्यांचा संदेश येत होता. 

अधिक माहिती घेतल्यानंतर ई पॉस मशीनचा सर्व्हर डाऊन झाल्याचे समजले. काहीवेळांतच तो पूर्ववत होईल अशी अपेक्षा होती. त्यामुळे दुकानांसमोर ग्राहकांच्या रांगा कायम होत्या. दुपारपर्यंत ही मशीन बंद राहीली. ऐन दिवाळीत शासनाच्या या गलथानपणाबद्दल ग्राहकांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. आम्ही फराळ कधी करायचा, किती वेळ थांबायचे, अशा भावना महिला ग्राहकांनी व्यक्त केल्या. सरकारबरोबरच सर्व रोष दुकानदारांवर व्यक्त होत होता.

यावर आम्हाला धान्य द्यायला काहीच अडचण नाही, परंतु सर्व्हर डाऊनमुळे मशीन बंद असल्याने ते देता येत नसल्याचे दुकानदांकडून सांगण्यात येत होते. हे सांगत असताना त्यांची चांगलीच कसरत होत होती. अखेर दुपारनंतर ही मशीन पूर्ववत सुरू झाल्याने धान्य वितरणास सुरुवात झाली. धान्य घेण्यासाठी अर्धा दिवस ताटकळत थांबलेल्या ग्राहकांच्या रांगा सायंकाळपर्यंत कायम राहिल्या.

 

 

टॅग्स :Governmentसरकारkolhapurकोल्हापूर