शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

कोल्हापूर : बालकांच्या आरोग्य बांधीलकीबद्दल सरकारवरील संशयास वाव : पी. चिदंबरम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 18:40 IST

राज्य आणि केंद्र सरकारच्या बालकांच्या आरोग्यविषयक बांधीलकीबद्दल संशय घेण्यास वाव आहे. मनुष्यबळ विकास, आरोग्य व कुटुंबकल्याण, महिला व बालविकास यांच्याकरिता लागणाऱ्या निधी वाटपाच्या टक्केवारीत एकूण खर्चाच्या प्रमाणात दिवसेंदिवस घट होत असल्याचे माजी केंद्रीय वित्त व गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी शनिवारी येथे सांगितले.

ठळक मुद्देलोकसंख्येला सुविधा देण्यास कमी पडल्यास गंभीर संकटडी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या सहाव्या दीक्षान्त समारंभात प्रतिपादन अन्नसुरक्षा कायदा लागू करूनही अभिवचनाची पूर्तता होत नाही

कोल्हापूर : राज्य आणि केंद्र सरकारच्या बालकांच्या आरोग्यविषयक बांधीलकीबद्दल संशय घेण्यास वाव आहे. मनुष्यबळ विकास, आरोग्य व कुटुंबकल्याण, महिला व बालविकास यांच्याकरिता लागणाऱ्या निधी वाटपाच्या टक्केवारीत एकूण खर्चाच्या प्रमाणात दिवसेंदिवस घट होत असल्याचे माजी केंद्रीय वित्त व गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी शनिवारी येथे सांगितले.डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या सहाव्या दीक्षान्त समारंभात ते बोलत होते. माजी केंद्रीय वित्त व गृहमंत्री पी. चिदंबरम म्हणाले, मनुष्यबळ हे चांगल्या प्रतीचे नाही, या कारणास्तव याकडे दुर्लक्ष केले जात आहे. आर्थिक सुधारणांतून राष्ट्रीय सुरक्षा, तंत्रज्ञानातील प्रगती व इतर बाबी तसेच सामाजिक ऐक्य टिकविण्यासाठी चांगल्या प्रतीच्या मनुष्यबळावरच सर्व काही विसंबून आहे.

अधिक लोकसंख्या जरी लाभदायक, अभिमानाची बाब असली तरी अशा प्रचंड लोकसंख्येला आपण सुविधा देण्यात कमी पडल्यास आपणास गंभीर संकटांना तोंड द्यावे लागणार आहे. डॉक्टर आणि प्रशासन यांनी सार्वजनिक आरोग्यव्यवस्थेवर लक्ष केंद्रित करावे. जेणेकरून सार्वजनिक रुग्णालयात उपचार घेण्यासाठी रुग्ण परतले पाहिजेत.

मला दु:ख होतंयसंसदेकडून अन्नसुरक्षा कायदा २०१३ हा जाणीवपूर्वक आपल्याला लागू करण्यात आला असून, निश्चित काही प्रमाणात प्रतिव्यक्ती, प्रतिमहिना अन्नधान्य पुरविण्याची वचनपूर्ती करण्यात आली. यामध्ये गर्भवती महिला, स्तनपान करणाऱ्या मुलांसाठी विशेष प्राधान्य देणारी तरतूद केलेली आहे.

वेगवेगळ्या प्रवर्गांसाठी आधुनिक आहार मानके निर्दिष्ट करण्यात आली. मला दु: ख होतंय की, कायद्यानुसार दिलेल्या अभिवचनाची आज पूर्तता होत नाही, असे माजी केंद्रीय वित्त व गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी सांगितले. 

 

टॅग्स :d y patil universityडी. वाय. पाटील विद्यापीठkolhapurकोल्हापूर