शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान: क्वेट्टा येथे लष्करी मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला; १० ठार, ३२ हून अधिक जखमी
2
गेमचेंजर! भारतात सापडला 'व्हाइट गोल्ड'चा खजिना; चीनवरील निर्भरता संपणार, नवी क्रांती घडणार
3
"मी आजपर्यंत एकाही कंत्राटदाराकडून कधी..."; भ्रष्टाचार, इथेनॉलच्या आरोपांवर गडकरींनी सोडलं मौन
4
Asia Cup 2025: मोहसिन नक्वींच्या हकालपट्टीची मागणी; पाकिस्तानातच जोर धरू लागली...
5
TCS Layoffs: 'स्वतःहून राजीनामा द्या किंवा टर्मिनेट व्हा'; टीसीएसमध्ये ३० हजार कर्मचाऱ्यांची कपात? TATA समूहाच्या आयटी कंपनीत भीतीचं वातावारण
6
सूत जुळलं! १२वीच्या विद्यार्थिनीचं शिक्षकावर प्रेम जडलं, लग्न केलं अन् आता पतीसाठी मागतेय सुरक्षा
7
दीपिकाला अनफॉलो केलं? चर्चांवर अखेर फराह खानने सोडलं मौन, म्हणाली, "आम्ही दोघींनी..."
8
टाटाच्या शेअरनं घेतलाय रॉकेट स्पीड, आता होणार स्प्लीट; १०००% हून अधिक परतावा देत लोकांना केलंय मालामाल!
9
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही! कंपन्या फसवणूक करत असल्याच्या ३००० हून अधिक तक्रारी दाखल
10
Video: भारताविरोधातील पराभव सहन झाला नाही; पाकिस्तानी खेळाडूने रडत रडत बनवला व्हिडिओ अन्...
11
इंजिनियरचं धक्कादायक कृत्य, आधी पत्नीची हत्या केली, त्यानंतर मित्राला केला व्हिडीओ कॉल आणि ...
12
IndiGo Bomb Threat: इंडिगोच्या विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, दिल्ली विमानतळावर 'इमर्जन्सी'!
13
जेव्हा पाकिस्तान सरकारनं आपल्याच क्रिकेटर्सना चुना लावला; दिलेले चेकच बाऊन्स झाले; किती होती रक्कम? 
14
१ ऑक्टोबरपासून बदलणार इंट्राडे ट्रेडिंगचे नियम, गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?
15
जीएसटी: २.२९ लाख रुपयांना लाँच झालेली ही बाईक, आता मिळतेय १.५५ लाख रुपयांना...
16
प्रेम विवाह: लग्नानंतर तुमची जोडी यशस्वी ठरेल की नाही? कुंडलीतील 'या' योगावरून मिळते उत्तर!
17
"आम्ही १५ वर्षांपासून वेगळे राहतोय...", गोविंदाच्या पत्नीचा मोठा खुलासा, सुनिता अहुजा म्हणाली...
18
संरक्षण, इन्फ्रा ते फायनान्स! 'हे' ५ शेअर्स करणार श्रीमंत! तुमच्या पोर्टफोलिओसाठी उत्तम पर्याय, टार्गेट प्राईस जाहीर
19
टीम इंडियाविरुद्ध लढवय्या वृत्ती दाखवली; पण एक धाव वाचवण्याच्या नादात करिअर संपलं हे एक अर्ध सत्य
20
नेपाळनंतर आता 'या' देशात Gen Z आंदोलनाचा झंझावात; सरकार कोसळले, राष्ट्रपतींची घोषणा...

कोल्हापूर ‘सर्किट बेंच’साठी आता थांबायचं नाही, लढायचं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 13:03 IST

कोल्हापुरात सर्किट बेंच स्थापनेबाबत राज्य शासनाने ठरावाचे पत्र दिल्याने उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सकारात्मक निर्णय घेतील, असा आशावाद आम्हाला होता; परंतु त्यांनी याप्रश्नी असमर्थता दर्शवल्याने वकिलांच्या संतापाची भावना आणि नाराजी पसरली आहे. सर्किट बेंच कोल्हापुरात स्थापन केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. हा प्रश्न जोपर्यंत मार्गी लागत नाही, तोपर्यंत थांबायचं नाही, लढायचं असा निर्णय आम्ही घेतला आहे. येत्या चार दिवसांत आम्ही याबाबत खंडपीठ कृती समितीची बैठक घेऊन निर्णय घेणार आहे, अशी माहिती निमंत्रक अ‍ॅड. प्रशांत चिटणीस यांनी दिली.

ठळक मुद्देसहा जिल्ह्यांतील वकिलांची लवकरच बैठक अ‍ॅड. प्रशांत चिटणीस यांची माहिती

कोल्हापूर : कोल्हापुरात सर्किट बेंच स्थापनेबाबत राज्य शासनाने ठरावाचे पत्र दिल्याने उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सकारात्मक निर्णय घेतील, असा आशावाद आम्हाला होता; परंतु त्यांनी याप्रश्नी असमर्थता दर्शवल्याने वकिलांच्या संतापाची भावना आणि नाराजी पसरली आहे. सर्किट बेंच कोल्हापुरात स्थापन केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. हा प्रश्न जोपर्यंत मार्गी लागत नाही, तोपर्यंत थांबायचं नाही, लढायचं असा निर्णय आम्ही घेतला आहे. येत्या चार दिवसांत आम्ही याबाबत खंडपीठ कृती समितीची बैठक घेऊन निर्णय घेणार आहे, अशी माहिती निमंत्रक अ‍ॅड. प्रशांत चिटणीस यांनी दिली.गेली ३४ वर्षे कोल्हापूरसह सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व सोलापूर या सहा जिल्ह्यांतील वकिलांच्या संघटना मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात स्थापन होण्यासाठी लढत आहेत. राज्य सरकारने कोल्हापुरात सर्किट बेंच स्थापनेबाबत ठरावाचे पत्र उच्च न्यायालयास दिले आहे; त्यामुळे सर्वस्वी निर्णय मुख्य न्यायाधीशांचा असल्याने खंडपीठ कृती समितीने मुख्य न्यायाधीश नरेश पाटील यांची भेट घेतली. त्यांनी सर्किट बेंचबाबत निर्णय घ्यायला वेळ लागेल, असे सांगून असमर्थता दर्शवली.दरम्यान ‘सर्किट बेंच’चे पुढे काय? या प्रश्नावर बोलताना खंडपीठ कृती समितीचे निमंत्रक अ‍ॅड. चिटणीस म्हणाले, मुख्य न्यायाधीश सकारात्मक निर्णय घेतील, असा आशावाद सर्वांना होता; परंतु त्यांनी ठोस निर्णय दिला नसल्याने वकिलांच्या भावना तीव्र झाल्या आहेत. न्यायाधीश पाटील हे ७ एप्रिल २०१९ रोजी सेवानिवृत्त होणार आहेत.

दीड महिन्याचा कालावधी आमच्यासाठी आहे. ४ मार्चला सहा जिल्ह्यांतील वकिलांची बैठक घेऊन ठोस निर्णय घेतला जाईल. जोपर्यंत हा प्रश्न मार्गी लागत नाही, तोपर्यंत थांबायचं नाही, लढायचं असा निर्णय आमचा आहे. कशाप्रकारे लढायचं हा निर्णय बैठकीत घेतला जाईल. 

 

टॅग्स :Courtन्यायालयkolhapurकोल्हापूर