शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

कोल्हापूर : अकरावी प्रवेशाची चिंता नको, विज्ञान, वाणिज्यचा प्रश्न मार्गी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 17:43 IST

यावर्षी अकरावीच्या विज्ञान आणि वाणिज्य इंग्रजी माध्यमासाठी क्षमतेपेक्षा जादा अर्ज दाखल झाले आहेत. त्यानुषंगाने वाढीव प्रवेशाचे नियोजन केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीने केले आहे; त्यामुळे विद्यार्थी, पालकांना अकरावी प्रवेशाची चिंता करण्याची गरज नाही.

ठळक मुद्देअकरावी प्रवेशाची चिंता नको, विज्ञान, वाणिज्यचा प्रश्न मार्गीवाढीव प्रवेशाचे नियोजन

कोल्हापूर : यावर्षी अकरावीच्या विज्ञान आणि वाणिज्य इंग्रजी माध्यमासाठी क्षमतेपेक्षा जादा अर्ज दाखल झाले आहेत. त्यानुषंगाने वाढीव प्रवेशाचे नियोजन केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीने केले आहे; त्यामुळे विद्यार्थी, पालकांना अकरावी प्रवेशाची चिंता करण्याची गरज नाही.शहरातील विविध ३३ महाविद्यालयांतील अकरावीच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेची एकूण प्रवेश क्षमता १३५०० आहे. यावर्षी तिन्ही शाखांसाठी एकूण १४६२३ अर्जांची विक्री झाली. त्यातील १२७०१ अर्ज प्रवेश समितीकडे दाखल झाले आहेत. त्यात विज्ञान शाखेसाठी ६०९४, वाणिज्य मराठी माध्यमासाठी २९३३, इंग्रजी माध्यमासाठी १८२५, कला मराठी माध्यमासाठी १७८९, इंग्रजी माध्यमासाठी ५२ अर्ज दाखल झाले आहेत.

विज्ञान शाखेसाठी ६५४ आणि वाणिज्य शाखेकरिता ३६२ अर्ज हे प्रवेश क्षमतेपेक्षा जादा दाखल झाले आहेत. त्यासाठी वाढीव प्रवेशाचे नियोजन समितीने केले आहे. प्रवेश अर्जांची छाननीची प्रक्रिया येत्या दोन दिवसांत पूर्ण होणार असून सोमवारी (दि. ९) निवड यादी प्रसिद्ध होणार आहे.

पसंतीक्रमानुसार प्रवेशयावर्षी विज्ञान, वाणिज्य इंग्रजी माध्यमाच्या प्रवेशासाठी क्षमतेपेक्षा अधिक अर्ज समितीकडे आले आहेत. शहरात विज्ञान शाखेच्या अनुदानित तुकड्या २५, तर विनाअनुदानित तुकड्या ३६ आहेत. वाढीव प्रवेशाचे नियोजन केले आहे. महाविद्यालयांना प्रत्येकी दहा विद्यार्थी वाढवून घेण्याची सूचना केली असल्याचे प्रभारी शिक्षण उपसंचालक किरण लोहार यांनी सांगितले. ते म्हणाले, एकही विद्यार्थी अकरावी प्रवेशापासून वंचित राहणार नाही. विद्यार्थ्यांनी अर्जात नोंदविलेल्या पसंतीक्रमानुसार त्यांना प्रवेश मिळेल.

 

 

टॅग्स :educationशैक्षणिकkolhapurकोल्हापूर