शहरं
Join us  
Trending Stories
1
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
2
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
3
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
4
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
5
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी
6
Manisha Kayande: एकनाथ शिंदे केवळ भाषणच...; कार्यकर्त्यांसमोर मनीषा कायंदेंनी मनातलं बोलून दाखवलं!
7
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
8
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
9
बँक FD आणि शेअर बाजाराला पर्याय! पोस्ट ऑफिसच्या 'या' ४ योजनांतून मिळवा बंपर रिटर्न
10
केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं
11
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
12
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
13
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
14
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
15
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
16
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
17
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
18
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
19
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
20
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक

HSC Exam Result 2025: कोल्हापूर विभागाने राज्यात दुसरा क्रमांक पटकाविला, ९३.६४ टक्के निकाल लागला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 13:16 IST

क्रमांक वाढला, टक्का घसरला

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेत कोल्हापूर विभागाचा निकाल ९३.६४ टक्के लागला असून, विभागाने राज्यात दुसरा क्रमांक पटकाविला आहे. कोल्हापूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत या निकालाची माहिती दिली. गतवर्षी चौथ्या क्रमांकावर असलेल्या कोल्हापूर विभागाने यंदा थेट दुसरे स्थान पटकावले असले, तरी ०.६० टक्क्याने निकाल घटला आहे. गतवर्षी कोल्हापूर विभागाचा निकाल ९४.२४ टक्के लागला होता.११ ते १८ फेब्रुवारी या कालावधीत झालेल्या बारावीच्या परीक्षेत १०१२ कनिष्ठ महाविद्यालयांतील १ लाख १३ हजार १९५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यापैकी १ लाख ६ हजार ०४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विभागात कोल्हापूर जिल्ह्याचा निकाल ९४.४० टक्के लागला असून, सलगपणे प्रथम राहण्याची परंपरा कायम ठेवली. सांगली जिल्ह्याचा ९३.३९ टक्के इतका निकाल लागला असून, विभागात दुसरा क्रमांक मिळवला आहे. सातारा जिल्ह्याचा निकाल ९२.७६ टक्के इतका लागला आहे.

जिल्हा - प्रविष्ट विद्यार्थी - उत्तीर्ण विद्यार्थी - टक्केवारी

  • कोल्हापूर - ४८८३६  - ४६१०५ - ९४.४०
  • सांगली  - ३१२०७ - २९१४५ - ९३.३९
  • सातारा - ३३१५२ - ३०७५४ - ९२.७६
  • एकूण  - ११३१९५ - १०६००४ - ९३.६४

विभागाचा शाखानिहाय निकालविज्ञान- ९८.६३, कला- ८१.६९, वाणिज्य- ९४.५३, व्यावसायिक-९२.४०, आयटीआय- ८९.५७.

मुलीच सरसबारावी परीक्षेत विभागात पुन्हा एकदा मुलींनीच बाजी मारली आहे. मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण ९६.९२ टक्के इतके आहे. तर ९०.७१ टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत. कोल्हापूर विभागात ५९ हजार ७२६ पैकी ५४ हजार १८१ मुले उत्तीर्ण झाली. तर ५३ हजार ४६९ मुलींपैकी ५१ हजार ८२३ मुली उत्तीर्ण झाल्या. मुलांपेक्षा ६.२१ टक्के मुली अधिक उत्तीर्ण झाल्या आहेत.

गैरप्रकाराची २५ प्रकरणेकॉपीमुक्त अभियान विभागात प्रभावीपणे राबवले. प्रत्यक्षात कॉपीचा एकही प्रकार आढळला नसला तरी केंद्रात मोबाइल आढळणे, उत्तरपत्रिकेवर ओळख पटेल असे लिहिणे असे २५ प्रकार विभागात आढळले आहेत.

२ हजार ३३३ विद्यार्थ्यांना सवलत गुणशैक्षणिक वर्ष २०१५-१६ पासून खेळाडू, एनसीसी, स्काउट-गाइडच्या विद्यार्थ्यांना शासन निर्णयानुसार सवलत गुण देण्यात येत आहेत. त्यानुसार यावर्षी राज्यातील सुमारे २० हजार ९४३ तर कोल्हापूर विभागातील २ हजार ३३३ विद्यार्थ्यांना प्रावीण्याचे गुण देण्यात आले आहेत.

कोल्हापूर विभागात प्रथम श्रेणीचे ५ हजार ८२६ विद्यार्थीराज्यातील नऊ विभागीय मंडळाचा विचार करता प्रावीण्यासह प्रथम श्रेणी (७५ टक्के)च्या पुढे गुण मिळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कोल्हापूर विभागात कमी आहे. ती ५ हजार ८२६ आहे. प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांमध्ये सर्वाधिक मुंबईत ४२ हजार ४८१ तर कोकण विभागात सर्वाधिक कमी १ हजार ५५९ विद्यार्थी आहेत.

कोल्हापूर विभागाचा निकाल हा दर्जात्मक लागला आहे. परीक्षार्थ्यांसाठी शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासाठी विविध उपक्रम, कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबविल्याने दर्जा उंचावला आहे. -राजेश क्षीरसागर, अध्यक्ष, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, कोल्हापूर विभाग

टॅग्स :kolhapurकोल्हापूरHSC Exam Resultबारावी निकाल