शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

सचिव उरले नावालाच, कारभार लिपिकांच्या हातातच; कोल्हापूर जिल्ह्यात विकास संस्थांतील गोलमाल 

By राजाराम लोंढे | Updated: May 27, 2024 13:25 IST

शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा गैरफायदा, जिल्हा बँकेचे निरीक्षक करतात काय?

राजाराम लोंढेकोल्हापूर : जिल्ह्याच्या ग्रामीण भागाच्या अर्थ कारणाचा केंद्रबिंदू असलेल्या विकास संस्थांचा कारभार आता सचिवाऐवजी लिपिकांच्या हातातच आल्याने गोलमाल करण्यास वाव मिळू लागला आहे. एका एका सचिवाकडे तीन-चार संस्था असल्याने जिल्हा बँक व केडरचे नियंत्रण असलेला सचिव केवळ नावालाच राहिल्याने अपहाराचे प्रकार घडत आहेत. शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन त्यांना राजरोसपणे फसविले जात असताना संस्था चालक गप्प कसे बसतात? यामध्ये सचिव, लिपिक जेवढे जबाबदार, त्यापेक्षाही अधिक संस्थांचे पदाधिकारीही आहेत.जिल्हा बँक विकास संस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप करते. त्याशिवाय सक्षम विकास संस्था शेतकऱ्यांना मध्यम मुदत, दीर्घ मुदतीच्या कर्जाचे वाटप करतात. जिल्ह्यात वर्षाला साधारणता ३ हजार कोटींचे वाटप या माध्यमातून होते. या कर्ज वाटपाचे कायदेशीर नियंत्रण हे केडरच्या सचिवांकडे असते. संस्थेचा अध्यक्ष आणि सचिव यांची कर्ज वाटपाबराेबरच त्याच्या वसुलीची जबाबदारी असते.मात्र, जिल्ह्यात एका एका सचिवाकडे चार-चार विकास संस्थांचा कारभार आहे. त्यामुळे सचिव केवळ कागदोपत्रीच आहेत, सगळा कारभार लिपिकांवर सोपविला आहे. सचिव जिल्हा बँक व केडरशी बांधील असतो. लिपिक संस्थेशी बांधील असला तरी आर्थिक व्यवहार त्याच्या हातात देताच येत नाही. तरीही बहुतांशी संस्थात सचिव पगाराला आणि नावालाच आहेत, सगळा कारभार लिपिकांच्या हातातच असल्याने गैरव्यवहाराला संधी मिळत आहे.मीटिंग भत्यापुरतेच संचालकस्थानिक नेते संचालक मंडळात आपल्या मर्जीतील लोक पाठवतात. पण त्यांना सहकारातील ज्ञान किती आहे, हे पाहिले जात नाही. त्यामुळे बहुतांशी विकास संस्थांचे संचालकांचे अस्तित्व मीटिंग भत्यापुरतेच असते.

शेतकरी हो, उघडा डोळे..विकास संस्थांतील ९० टक्के शेतकरी हे आपण कर्ज किती घेतले, वर्षात त्यावर व्याज आकारणी किती केली, साखर कारखान्यांकडून भरणा किती आला, रोखीने किती भरले, फिरवाफिरवी करून हातात किती मिळाले? याची चौकशीच करत नाहीत. त्याचाच गैरफायदा संस्थांचे कर्मचारी घेऊ लागल्याने आता शेतकऱ्यांनीच डोळे उघडे ठेवून व्यवहार केला पाहिजे.

एकाची मंजुरी; दुसऱ्याकडून उचलविकास संस्थेचे सर्वच पात्र शेतकरी पीक कर्जाची उचल करत नाहीत. त्याचा फायदा सचिव व संस्थेतील यंत्रणा उचलते, त्या शेतकऱ्याचे मंजूर कर्ज परस्पर सही अथवा अंगठा उठवून दुसऱ्याला देण्याचे उद्योगही राजरोसपणे केले जातात.

जिल्हा बँकेचे निरीक्षक करतात काय?जिल्हा बँकेच्या माध्यमातून हजारो कोटींच्या कर्जांची वाटप बँकेच्या निरीक्षकांच्या शिफारशीने केले जाते. अनेक ठिकाणी निरीक्षक लिपिकावर विश्वास ठेवून मंजुरी देतात. सचिव आला तरच शिफारस अशी सक्ती केली तर कामकाजाला शिस्त लागेल.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरbankबँकFarmerशेतकरी