शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

खादी ग्रामोद्योगची साडेपाच एकर जागा बिल्डरच्या घशात; संघाची गांधीविचार, तत्वांशी फारकत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2022 13:04 IST

गोविंदराव कोरगांवकर ट्रस्टने ग्रामोद्योग व चळवळीसाठी त्याकाळी फक्त १५ हजार रुपये ना नफा ना तोटा यावर संघाला ही जागा दिली होती, हा प्रकार कळताच ट्रस्टने संघाच्या विरोधात न्यायालयात दाद मागितली आहे.

सत्य, अहिंसा, सत्याग्रह तत्त्वांनी जगलेल्या महात्मा गांधींच्या विचाराने स्थापन झालेल्या कोल्हापूर जिल्हा खादी व ग्रामोद्योग संघाने अर्थपूर्ण हेतूने कोल्हापुरातील रुईकर कॉलनीसमोरील साडेपाच एकर जागा विकसन कराराच्या नावाखाली बिल्डरला विकली आहे. गेली २२ वर्षे गांधीवादी कार्यकर्ते न्यायासाठी रस्त्यावरची आणि न्यायालयातील लढाई लढत आहेत. सामाजिक भावनेतून ही जागा संघाला दिलेल्या कोरगांवकर ट्रस्टने याविरोधात न्यायालयात तक्रार केली असून संघातील या कारभाराचा हिशेब मांडणारी वृत्तमालिका आजपासून...

इंदुमती गणेश

कोल्हापूर : विकासाच्या नावाखाली कोल्हापूर जिल्हा खादी व ग्रामोद्योग संघाची रुईकर कॉलनीसमोरील मुख्य रस्त्याला लागून असलेली साडेपाच एकर जागा फक्त १५ कोटी या कवडीमोल दराने बिल्डरच्या घश्यात घातली आहे. गोविंदराव कोरगांवकर ट्रस्टने ग्रामोद्योग व चळवळीसाठी त्याकाळी फक्त १५ हजार रुपये ना नफा ना तोटा यावर संघाला ही जागा दिली होती, हा प्रकार कळताच ट्रस्टने संघाच्या विरोधात न्यायालयात दाद मागितली आहे.

महात्मा गांधींच्या विचाराने काम करणारी, खादीचा प्रचार प्रसार, ग्रामोद्योगाद्वारे रोजगाराच्या संधी यासाठी सार्वजनिक संस्था म्हणून खादी ग्रामोद्योग संघाचा नावलौकिक आहे. या कार्यविस्तारासाठी रि. स. नं. २५८ ही ५ एकर १३ गुंठे जागा संघाने खरेदी केली. पण त्यावेळी संघाला त्याचा उपयोग नसल्याने ती १३ सप्टेंबर १९५० रोजी काेरगांवकर ट्रस्टला १५ हजारांना विकली. प्रभाकरपंत गोविंदराव कोरगांवकर हे ट्रस्टचे अध्यक्ष होते. पुढे स्थिती सुधारल्यावर संघाने ट्रस्टला २० एप्रिल १९५६ रोजी पत्र पाठवून, गांधीवादी विचार आणि ग्रामोद्योगाचा दाखला देऊन, ही जागा घेतलेल्याच किमतीत ना नफा ना तोटा तत्त्वावर आम्हाला परत द्या, अशी मागणी करताना संघाने नफेखाेरीच्या उद्देशाने जागेचा वापर केल्यास जागा ट्रस्टने परत घ्यावी, अशी ग्वाही दिली. ट्रस्टने सामाजिक भावनेतून १ जुलै १९५७ रोजी जमीन पुन्हा संघाला दिली. या जागेवर त्यावेळी लघु उद्योग, कुटिर उद्याेग, चरखा युनिट होते.

काळानुसार संघाच्या कार्यपद्धतीत बदल झाला नाही, निष्ठा, तत्त्वांशी फारकत झाली आणि १९८० च्या दशकात येेथील उद्योग बंद होऊन संघ तोट्यात गेला. तत्कालीन अध्यक्ष मारुती चौगुले व सचिव सुंदर देसाई यांच्यासह ११ पदाधिकाऱ्यांनी २००१ मध्ये जागेचा विकास करण्याचा निर्णय घेतला आणि रायसन्स कन्स्ट्रक्शनसोबत विकसन करार केला. आता त्यात बदल होऊन रायसन्सचे कंपनीचे भागीदार म्हणून व्यंकटेश्वरा पॉवर प्रोजेक्ट यांची नवीन भागीदारी आहे. एकदा जागा विकासकाच्या ताब्यात गेली की, संघाचा त्या जागेवर कोणताही मालकी हक्क राहणार नाही, असे करारात लिहिले आहे. खरे तर हा विकसन करार नव्हे, तर विक्रीचाच करार होता. तरीही संघाने निर्णय घेतला. हा प्रकार कळल्यानंतर कोरगांवकर ट्रस्टचे अनिल कोरगांवकर यांनी २००४ साली संघाला सक्त ताकीद करणारे पत्र पाठवले. पण काहीच फरक पडला नाही. अखेर त्यांनी २०१३ मध्ये न्यायालयात दाद मागितली. तेव्हापासून आजवर लागलेल्या निकालात संघाच्या विरोधात निर्णय झाला आहे.

संघाची पार्श्वभूमी...

कोल्हापूर जिल्हा खादी ग्रामोद्योग संघ १९२७ ला स्थापन झाला, पण नोंदणी १९५६ साली झाली. यावर स्वातंत्र्यसैनिक आणि गांधी विचाराने काम करणारे कार्यकर्ते, पदाधिकारी असत. विनोबा भावे, माधवराव बागल, म. दु. श्रेष्ठी ही मंंडळी कार्यरत होती. त्याकाळी चरखा, सूतकताई, साबण, कुटिर उद्याेग, अगरबत्ती तयार करणे, मधाच्या विक्रीच्या माध्यमातून ५० हून अधिक लोकांना रोजगार दिला जात होता. संघाची सध्या वर्षाला ४० ते ५० लाख इतकी उलाढाल आहे. बिंदू चौकातील इमारत ही मध्यवर्ती कारागृहाची (सेंट्रल जेल) असून संस्थेवर कारागृहाचा नाममात्र अंकुश आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर