शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

खादी ग्रामोद्योगची साडेपाच एकर जागा बिल्डरच्या घशात; संघाची गांधीविचार, तत्वांशी फारकत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2022 13:04 IST

गोविंदराव कोरगांवकर ट्रस्टने ग्रामोद्योग व चळवळीसाठी त्याकाळी फक्त १५ हजार रुपये ना नफा ना तोटा यावर संघाला ही जागा दिली होती, हा प्रकार कळताच ट्रस्टने संघाच्या विरोधात न्यायालयात दाद मागितली आहे.

सत्य, अहिंसा, सत्याग्रह तत्त्वांनी जगलेल्या महात्मा गांधींच्या विचाराने स्थापन झालेल्या कोल्हापूर जिल्हा खादी व ग्रामोद्योग संघाने अर्थपूर्ण हेतूने कोल्हापुरातील रुईकर कॉलनीसमोरील साडेपाच एकर जागा विकसन कराराच्या नावाखाली बिल्डरला विकली आहे. गेली २२ वर्षे गांधीवादी कार्यकर्ते न्यायासाठी रस्त्यावरची आणि न्यायालयातील लढाई लढत आहेत. सामाजिक भावनेतून ही जागा संघाला दिलेल्या कोरगांवकर ट्रस्टने याविरोधात न्यायालयात तक्रार केली असून संघातील या कारभाराचा हिशेब मांडणारी वृत्तमालिका आजपासून...

इंदुमती गणेश

कोल्हापूर : विकासाच्या नावाखाली कोल्हापूर जिल्हा खादी व ग्रामोद्योग संघाची रुईकर कॉलनीसमोरील मुख्य रस्त्याला लागून असलेली साडेपाच एकर जागा फक्त १५ कोटी या कवडीमोल दराने बिल्डरच्या घश्यात घातली आहे. गोविंदराव कोरगांवकर ट्रस्टने ग्रामोद्योग व चळवळीसाठी त्याकाळी फक्त १५ हजार रुपये ना नफा ना तोटा यावर संघाला ही जागा दिली होती, हा प्रकार कळताच ट्रस्टने संघाच्या विरोधात न्यायालयात दाद मागितली आहे.

महात्मा गांधींच्या विचाराने काम करणारी, खादीचा प्रचार प्रसार, ग्रामोद्योगाद्वारे रोजगाराच्या संधी यासाठी सार्वजनिक संस्था म्हणून खादी ग्रामोद्योग संघाचा नावलौकिक आहे. या कार्यविस्तारासाठी रि. स. नं. २५८ ही ५ एकर १३ गुंठे जागा संघाने खरेदी केली. पण त्यावेळी संघाला त्याचा उपयोग नसल्याने ती १३ सप्टेंबर १९५० रोजी काेरगांवकर ट्रस्टला १५ हजारांना विकली. प्रभाकरपंत गोविंदराव कोरगांवकर हे ट्रस्टचे अध्यक्ष होते. पुढे स्थिती सुधारल्यावर संघाने ट्रस्टला २० एप्रिल १९५६ रोजी पत्र पाठवून, गांधीवादी विचार आणि ग्रामोद्योगाचा दाखला देऊन, ही जागा घेतलेल्याच किमतीत ना नफा ना तोटा तत्त्वावर आम्हाला परत द्या, अशी मागणी करताना संघाने नफेखाेरीच्या उद्देशाने जागेचा वापर केल्यास जागा ट्रस्टने परत घ्यावी, अशी ग्वाही दिली. ट्रस्टने सामाजिक भावनेतून १ जुलै १९५७ रोजी जमीन पुन्हा संघाला दिली. या जागेवर त्यावेळी लघु उद्योग, कुटिर उद्याेग, चरखा युनिट होते.

काळानुसार संघाच्या कार्यपद्धतीत बदल झाला नाही, निष्ठा, तत्त्वांशी फारकत झाली आणि १९८० च्या दशकात येेथील उद्योग बंद होऊन संघ तोट्यात गेला. तत्कालीन अध्यक्ष मारुती चौगुले व सचिव सुंदर देसाई यांच्यासह ११ पदाधिकाऱ्यांनी २००१ मध्ये जागेचा विकास करण्याचा निर्णय घेतला आणि रायसन्स कन्स्ट्रक्शनसोबत विकसन करार केला. आता त्यात बदल होऊन रायसन्सचे कंपनीचे भागीदार म्हणून व्यंकटेश्वरा पॉवर प्रोजेक्ट यांची नवीन भागीदारी आहे. एकदा जागा विकासकाच्या ताब्यात गेली की, संघाचा त्या जागेवर कोणताही मालकी हक्क राहणार नाही, असे करारात लिहिले आहे. खरे तर हा विकसन करार नव्हे, तर विक्रीचाच करार होता. तरीही संघाने निर्णय घेतला. हा प्रकार कळल्यानंतर कोरगांवकर ट्रस्टचे अनिल कोरगांवकर यांनी २००४ साली संघाला सक्त ताकीद करणारे पत्र पाठवले. पण काहीच फरक पडला नाही. अखेर त्यांनी २०१३ मध्ये न्यायालयात दाद मागितली. तेव्हापासून आजवर लागलेल्या निकालात संघाच्या विरोधात निर्णय झाला आहे.

संघाची पार्श्वभूमी...

कोल्हापूर जिल्हा खादी ग्रामोद्योग संघ १९२७ ला स्थापन झाला, पण नोंदणी १९५६ साली झाली. यावर स्वातंत्र्यसैनिक आणि गांधी विचाराने काम करणारे कार्यकर्ते, पदाधिकारी असत. विनोबा भावे, माधवराव बागल, म. दु. श्रेष्ठी ही मंंडळी कार्यरत होती. त्याकाळी चरखा, सूतकताई, साबण, कुटिर उद्याेग, अगरबत्ती तयार करणे, मधाच्या विक्रीच्या माध्यमातून ५० हून अधिक लोकांना रोजगार दिला जात होता. संघाची सध्या वर्षाला ४० ते ५० लाख इतकी उलाढाल आहे. बिंदू चौकातील इमारत ही मध्यवर्ती कारागृहाची (सेंट्रल जेल) असून संस्थेवर कारागृहाचा नाममात्र अंकुश आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर