शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

KDCC BANK ELECTION :  निवडणूक लांबल्याने इच्छुक अस्वस्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2021 11:53 IST

निवडणुकीच्या निमित्ताने होणारी ‘भांडवली गुंतवणूक’ वाढतच चालल्याने ही अस्वस्थता आहे. म्हणूनच उच्च न्यायालयात थांबलेली ही निवडणूक प्रक्रिया तातडीने सुरू व्हावी यासाठी याचिका दाखल करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची निवडणूक जशी लांबत चालली आहे तसे इच्छुक अस्वस्थ होत आहेत. या निवडणुकीच्या निमित्ताने होणारी ‘भांडवली गुंतवणूक’ वाढतच चालल्याने ही अस्वस्थता आहे. म्हणूनच उच्च न्यायालयात थांबलेली ही निवडणूक प्रक्रिया तातडीने सुरू व्हावी यासाठी याचिका दाखल करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

दोन महिन्यांपूर्वी जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठीच्या हालचाली सुरू झाल्या. दरम्यान, मतदार यादीतील संस्थांच्या सहभागावरून काही सेवा संस्था न्यायालयात गेल्या आहेत. शेजारच्या सांगली, सातारा जिल्हा बँकांच्या निवडणुका लागल्या असून, त्यांचे मतदानही जवळ आले आहे; परंतु कोल्हापूर जिल्हा बँकेचा निर्णय उच्च न्यायालयात का रखडला आहे, याचे उत्तर कोणाजवळ नाही.

सेवा संस्था गटातील बाराही तालुक्यांतील जागांवर इच्छुक असलेल्यांनी गेल्या तीन महिन्यांपासून जोडण्या घालायला सुरुवात केली होती. गेल्या वर्षी ठराव करतानाही अशीच तयारी करावी लागली होती. दिवाळीच्या निमित्ताने सर्व गटातील इच्छुकांनी आपली जिल्हा बँकेचा फोटो छापून आपली शुभेच्छापत्रेही जिल्हाभर पाठवली. सार्वजनिक कार्यक्रमात फारसे न दिसणारे काही लोकप्रतिनिधी यानिमित्ताने जिल्ह्याचा दौराही करू लागले. परंतू तरीही निवडणूक लागलेली नाही.

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा बंकेचे कामकाज सुरू आहे. त्यामुळे त्यांनी सर्वपक्षीय नेत्यांच्या अनेक बैठका घेऊन ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले. परंतु निवडणुकीचा कार्यक्रमच जाहीर होत नसल्याने अनेकांची कोंडी झाली आहे. आता तर विधान परिषदेची निवडणूक जाहीर झाली तरी जिल्हा बँकेची निवडणूक जाहीर होत नसल्याने नेत्यांसह इच्छुकही अस्वस्थ आहेत.

सहलीवर पाठवलेल्यांचा खर्च वाढतोय

आजऱ्यासारख्या काही तालुक्यांमध्ये सेवा संस्था गटात मोठी चुरस आहे. त्यामुळे दिवाळीनंतर दोन्ही गटांनी काही निवडक मतदारांना सहलीवर पाठवले आहे. परंतु निवडणुकीबाबतचा न्यायालयातील निर्णय प्रलंबित असल्याने सहलीचा खर्च किती दिवस वाढणार याची चिंता आता उमेदवारांना लागून राहिली आहे.

प्रलोभनांची वाढती संख्या

काही ठरावधारकांच्या मुलांना बंका, साखर कारखाना, दूध संघामध्ये नोकऱ्या देण्याचेही आश्वसान देण्यात येत आहे. ज्या ठिकाणी सेवा संस्था गटात अतिशय अटीतटीची परिस्थिती आहे तिथे दोन्ही गटाकडून नाेकऱ्यांच्या ऑफर्स सुरू झाल्याने कोणती नोकरी स्वीकारावी याचाही प्रश्न काही जणांना पडला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरElectionनिवडणूक