शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

वसुली १०० टक्के तरीही संस्थांकडे कोल्हापूर जिल्हा बँकेचे दुर्लक्ष, १ टक्का परतावा देण्याची मागणी

By राजाराम लोंढे | Updated: October 28, 2023 15:57 IST

जिल्ह्यातील ३५ टक्के विकास संस्था अनिष्ट दुराव्यात

राजाराम लोंढेकोल्हापूर : विकास संस्थांच्या पातळीवर १०० टक्के पीक कर्जांची वसुली करणाऱ्या संस्थांना जिल्हा बँक पूर्वी व्याजात सवलत देत होती. मात्र, सध्या अशा संस्थांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली जात नसल्याने संस्था पातळीवर उदासीनता दिसत आहे. १,८७९ पैकी केवळ २४७ संस्थांनी १०० टक्के वसुली केली आहे.शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज, पारंपरिक व्यवसाय मोडकळीस आल्याने संस्था आर्थिक अरिष्टात आहेत. त्यामुळे १०० टक्के पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या संस्थांना बँकेने प्रोत्साहन म्हणून पूर्वीप्रमाणे १ टक्क्याप्रमाणे व्याज परतावा देण्याची मागणी होत आहे.पीक कर्जाची परतफेड करण्यात कोल्हापूर जिल्हा महाराष्ट्रात आघाडीवर आहे. हे कर्जमाफीच्या आकड्यावरून सिध्द होते. राज्यात कर्जमाफीचा सर्वांत कमी लाभ कोल्हापूर जिल्ह्याला झाला, तर पीक कर्ज वाटपाच्या पातळीवर प्रोत्साहन अनुदानाचा सर्वाधिक लाभ कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाच झाला. त्यात, राज्य व केंद्र सरकारने पीक कर्जाची उचल केल्यापासून ३६५ दिवसात परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज दिले जाते. यातूनही शेतकऱ्यांना परतफेडीसाठी प्रोत्साहन मिळते.जिल्हा बँकेच्या पातळीवर ८८ ते ९० टक्के वसुली होते. संस्था पातळीवरही ९० टक्क्याच्या पुढे वसुली होते. त्यातही संस्था पातळीवर १०० टक्के पीक कर्जाची वसुली करणाऱ्या व मध्यम मुदतीसह इतर कर्जाचे हप्ते नियमित असणाऱ्या विकास संस्थाही आहेत. २०२२-२३ या आर्थिक वर्षात २४७ विकास संस्थांनी मेंबर पातळीवर १०० टक्के वसुली केली.अशा संस्थांना जिल्हा बँक पीक कर्ज वाटपावर १ टक्का व्याज सवलत देत होती. यामुळे संस्था पातळीवर वसुलीसाठी चढाओढ पाहावयास मिळत होती. मात्र, २००५ पासून जिल्हा बँकेने ही योजना बंद केल्याने शंभर टक्के वसुली करणाऱ्या संस्थांची संख्या कमी होत आहे. प्रोत्साहन म्हणून बँकेने ही योजना पुन्हा सुरू करण्याची मागणी होत आहे.

जिल्ह्यातील ३५ टक्के विकास संस्था अनिष्ट दुराव्यातशेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज पुरवठ्यामुळे विकास संस्थांच्या उत्पन्नावर मर्यादा आल्या आहेत. उत्पन्न कमी आणि खर्च वाढल्याने ३५ टक्के विकास संस्था अनिष्ट दुराव्यात आहेत. याला केंद्र सरकारच्या कर्जमाफीतील ११२ कोटी रक्कमही जबाबदार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरbankबँक