शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
5
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
6
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
7
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
8
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
9
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
10
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
11
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
12
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
13
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
14
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
15
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
16
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
17
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
18
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
19
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
20
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...

कोल्हापूर : सायंकाळी उशिरापर्यंत धान्य वाटप करा : पुरवठा विभागाकडून रेशन दुकानदारांना संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2018 11:58 IST

राज्यभरात एकाच वेळी धान्यवाटप सुरू असल्याने पॉस मशीनवर ताण पडून त्यामध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे दहा-दहा रेशनकार्डधारकांचे गट तयार करून, त्यांना दर तासाच्या अंतराने बोलावून घेऊन धान्य वाटप करावे; सायंकाळी उशिरापर्यंत हे वाटप सुरू ठेवावे, अशा स्वरूपाचे फर्मान राज्याच्या पुरवठा विभागाने काढले आहे. त्यानुसार जिल्हा पुरवठा विभागाकडून असे संदेश सर्व दुकानदारांना पाठविले आहेत.

ठळक मुद्देसायंकाळी उशिरापर्यंत धान्य वाटप करा : पॉस मशीनचा तांत्रिक घोळपुरवठा विभागाकडून रेशन दुकानदारांना संदेश

प्रवीण देसाई

कोल्हापूर : राज्यभरात एकाच वेळी धान्यवाटप सुरू असल्याने पॉस मशीनवर ताण पडून त्यामध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे दहा-दहा रेशनकार्डधारकांचे गट तयार करून, त्यांना दर तासाच्या अंतराने बोलावून घेऊन धान्य वाटप करावे; सायंकाळी उशिरापर्यंत हे वाटप सुरू ठेवावे, अशा स्वरूपाचे फर्मान राज्याच्या पुरवठा विभागाने काढले आहे. त्यानुसार जिल्हा पुरवठा विभागाकडून असे संदेश सर्व दुकानदारांना पाठविले आहेत.

त्यामुळे दुकानदारांची दोन्ही बाजूंनी गोची झाली आहे. ग्राहकांना तोंड देताना त्यांना नाकी नऊ येत आहे. मशीनच्या तांत्रिक बिघाडाची दुरुस्ती करण्याऐवजी हा अजब मार्ग त्रासदायक होत असल्याच्या भावना दुकानदारांमधून व्यक्त होत आहेत.दिवाळीच्या आदल्या दिवशीपासून ई-पॉस बंद राहिल्याने अर्धा दिवस ग्राहकांची ससेहोलपट झाली. सर्व्हर डाउनमुळे हा तांत्रिक बिघाड झाल्याचे सांगण्यात आले; परंतु दिवाळी दिवशीही या मशीनमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. सर्व्हर संथगतीने सुरू असल्याने दिवाळीदिवशीही रेशन दुकानांसमोर रांगा लागल्या होत्या.

या पार्श्वभूमीवर राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा कार्यालयाने रेशन दुकानदारांसाठी जिल्हा पुरवठा कार्यालयांना व्हॉट्स अ‍ॅपवरून संदेश पाठविले आहेत. यामध्ये पॉस मशीनद्वारे एकाच वेळी राज्यभरात धान्याचे वाटप सुरू केल्याने तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत.

त्यामुळे अशा परिस्थितीत दुकानांसमोरील गर्दीचे नियोजन करावे लागेल. दहा-दहा कार्डधारकांचे गट करून त्यांना दर तासाच्या अंतराने बोलावून घेऊन सायंकाळी उशिरापर्यंत धान्याचे वितरण करावे; तसेच काही अडचणी असल्यास ‘१८००८३३३९००’ या हेल्पलाईनवर संपर्क साधावा, असे कळविले आहे.एका बाजूला संतप्त ग्राहक, तर दुसऱ्या बाजूला शासनाचे अजब फर्मान अशा दुहेरी मन:स्थितीत दुकानदार आहेत. तांत्रिक अडचणींविषयी दुकानदारांनी शासकीय पातळीवर विचारणा केल्यावर सर्व्हर डाऊन असल्याचे उत्तर देऊन आपली सुटका करून घेण्याचे काम होत आहे; परंतु ग्राहकांच्या रोषाला दुकानदारांनाच सामोरे जावे लागत आहे. शासनाने सर्व्हरच्या तांत्रिक अडचणींची लवकर सोडवणूक करावी, असा सूर दुकानदारांसह ग्राहकांमधूनही उमटत आहे.

ई-पॉस मशीनचे व्यवहार संथगतीने सुरू आहेत. हा राज्य सरकारचा हलगर्जीपणा आहे. तांत्रिक बाबतीत जागरूकता दिसत नाही. त्यामुळे अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांनी तातडीने या विषयात लक्ष घालून तो निकाली काढावा.-चंद्रकांत यादव, अध्यक्ष, रेशन बचाव समिती 

 

टॅग्स :Governmentसरकारkolhapurकोल्हापूर