शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
2
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
3
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
4
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
5
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
6
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
7
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
8
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
9
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
10
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
11
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
12
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
13
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
14
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
15
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
16
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
17
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला
18
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
19
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
20
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर

कोल्हापूर : सायंकाळी उशिरापर्यंत धान्य वाटप करा : पुरवठा विभागाकडून रेशन दुकानदारांना संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2018 11:58 IST

राज्यभरात एकाच वेळी धान्यवाटप सुरू असल्याने पॉस मशीनवर ताण पडून त्यामध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे दहा-दहा रेशनकार्डधारकांचे गट तयार करून, त्यांना दर तासाच्या अंतराने बोलावून घेऊन धान्य वाटप करावे; सायंकाळी उशिरापर्यंत हे वाटप सुरू ठेवावे, अशा स्वरूपाचे फर्मान राज्याच्या पुरवठा विभागाने काढले आहे. त्यानुसार जिल्हा पुरवठा विभागाकडून असे संदेश सर्व दुकानदारांना पाठविले आहेत.

ठळक मुद्देसायंकाळी उशिरापर्यंत धान्य वाटप करा : पॉस मशीनचा तांत्रिक घोळपुरवठा विभागाकडून रेशन दुकानदारांना संदेश

प्रवीण देसाई

कोल्हापूर : राज्यभरात एकाच वेळी धान्यवाटप सुरू असल्याने पॉस मशीनवर ताण पडून त्यामध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे दहा-दहा रेशनकार्डधारकांचे गट तयार करून, त्यांना दर तासाच्या अंतराने बोलावून घेऊन धान्य वाटप करावे; सायंकाळी उशिरापर्यंत हे वाटप सुरू ठेवावे, अशा स्वरूपाचे फर्मान राज्याच्या पुरवठा विभागाने काढले आहे. त्यानुसार जिल्हा पुरवठा विभागाकडून असे संदेश सर्व दुकानदारांना पाठविले आहेत.

त्यामुळे दुकानदारांची दोन्ही बाजूंनी गोची झाली आहे. ग्राहकांना तोंड देताना त्यांना नाकी नऊ येत आहे. मशीनच्या तांत्रिक बिघाडाची दुरुस्ती करण्याऐवजी हा अजब मार्ग त्रासदायक होत असल्याच्या भावना दुकानदारांमधून व्यक्त होत आहेत.दिवाळीच्या आदल्या दिवशीपासून ई-पॉस बंद राहिल्याने अर्धा दिवस ग्राहकांची ससेहोलपट झाली. सर्व्हर डाउनमुळे हा तांत्रिक बिघाड झाल्याचे सांगण्यात आले; परंतु दिवाळी दिवशीही या मशीनमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. सर्व्हर संथगतीने सुरू असल्याने दिवाळीदिवशीही रेशन दुकानांसमोर रांगा लागल्या होत्या.

या पार्श्वभूमीवर राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा कार्यालयाने रेशन दुकानदारांसाठी जिल्हा पुरवठा कार्यालयांना व्हॉट्स अ‍ॅपवरून संदेश पाठविले आहेत. यामध्ये पॉस मशीनद्वारे एकाच वेळी राज्यभरात धान्याचे वाटप सुरू केल्याने तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत.

त्यामुळे अशा परिस्थितीत दुकानांसमोरील गर्दीचे नियोजन करावे लागेल. दहा-दहा कार्डधारकांचे गट करून त्यांना दर तासाच्या अंतराने बोलावून घेऊन सायंकाळी उशिरापर्यंत धान्याचे वितरण करावे; तसेच काही अडचणी असल्यास ‘१८००८३३३९००’ या हेल्पलाईनवर संपर्क साधावा, असे कळविले आहे.एका बाजूला संतप्त ग्राहक, तर दुसऱ्या बाजूला शासनाचे अजब फर्मान अशा दुहेरी मन:स्थितीत दुकानदार आहेत. तांत्रिक अडचणींविषयी दुकानदारांनी शासकीय पातळीवर विचारणा केल्यावर सर्व्हर डाऊन असल्याचे उत्तर देऊन आपली सुटका करून घेण्याचे काम होत आहे; परंतु ग्राहकांच्या रोषाला दुकानदारांनाच सामोरे जावे लागत आहे. शासनाने सर्व्हरच्या तांत्रिक अडचणींची लवकर सोडवणूक करावी, असा सूर दुकानदारांसह ग्राहकांमधूनही उमटत आहे.

ई-पॉस मशीनचे व्यवहार संथगतीने सुरू आहेत. हा राज्य सरकारचा हलगर्जीपणा आहे. तांत्रिक बाबतीत जागरूकता दिसत नाही. त्यामुळे अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांनी तातडीने या विषयात लक्ष घालून तो निकाली काढावा.-चंद्रकांत यादव, अध्यक्ष, रेशन बचाव समिती 

 

टॅग्स :Governmentसरकारkolhapurकोल्हापूर