शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
2
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
3
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
4
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
5
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
6
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
7
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
8
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
9
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
10
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
11
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
12
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
13
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
14
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
15
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
16
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
17
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
18
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
19
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
20
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू

कोल्हापूर : सायंकाळी उशिरापर्यंत धान्य वाटप करा : पुरवठा विभागाकडून रेशन दुकानदारांना संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2018 11:58 IST

राज्यभरात एकाच वेळी धान्यवाटप सुरू असल्याने पॉस मशीनवर ताण पडून त्यामध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे दहा-दहा रेशनकार्डधारकांचे गट तयार करून, त्यांना दर तासाच्या अंतराने बोलावून घेऊन धान्य वाटप करावे; सायंकाळी उशिरापर्यंत हे वाटप सुरू ठेवावे, अशा स्वरूपाचे फर्मान राज्याच्या पुरवठा विभागाने काढले आहे. त्यानुसार जिल्हा पुरवठा विभागाकडून असे संदेश सर्व दुकानदारांना पाठविले आहेत.

ठळक मुद्देसायंकाळी उशिरापर्यंत धान्य वाटप करा : पॉस मशीनचा तांत्रिक घोळपुरवठा विभागाकडून रेशन दुकानदारांना संदेश

प्रवीण देसाई

कोल्हापूर : राज्यभरात एकाच वेळी धान्यवाटप सुरू असल्याने पॉस मशीनवर ताण पडून त्यामध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे दहा-दहा रेशनकार्डधारकांचे गट तयार करून, त्यांना दर तासाच्या अंतराने बोलावून घेऊन धान्य वाटप करावे; सायंकाळी उशिरापर्यंत हे वाटप सुरू ठेवावे, अशा स्वरूपाचे फर्मान राज्याच्या पुरवठा विभागाने काढले आहे. त्यानुसार जिल्हा पुरवठा विभागाकडून असे संदेश सर्व दुकानदारांना पाठविले आहेत.

त्यामुळे दुकानदारांची दोन्ही बाजूंनी गोची झाली आहे. ग्राहकांना तोंड देताना त्यांना नाकी नऊ येत आहे. मशीनच्या तांत्रिक बिघाडाची दुरुस्ती करण्याऐवजी हा अजब मार्ग त्रासदायक होत असल्याच्या भावना दुकानदारांमधून व्यक्त होत आहेत.दिवाळीच्या आदल्या दिवशीपासून ई-पॉस बंद राहिल्याने अर्धा दिवस ग्राहकांची ससेहोलपट झाली. सर्व्हर डाउनमुळे हा तांत्रिक बिघाड झाल्याचे सांगण्यात आले; परंतु दिवाळी दिवशीही या मशीनमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. सर्व्हर संथगतीने सुरू असल्याने दिवाळीदिवशीही रेशन दुकानांसमोर रांगा लागल्या होत्या.

या पार्श्वभूमीवर राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा कार्यालयाने रेशन दुकानदारांसाठी जिल्हा पुरवठा कार्यालयांना व्हॉट्स अ‍ॅपवरून संदेश पाठविले आहेत. यामध्ये पॉस मशीनद्वारे एकाच वेळी राज्यभरात धान्याचे वाटप सुरू केल्याने तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत.

त्यामुळे अशा परिस्थितीत दुकानांसमोरील गर्दीचे नियोजन करावे लागेल. दहा-दहा कार्डधारकांचे गट करून त्यांना दर तासाच्या अंतराने बोलावून घेऊन सायंकाळी उशिरापर्यंत धान्याचे वितरण करावे; तसेच काही अडचणी असल्यास ‘१८००८३३३९००’ या हेल्पलाईनवर संपर्क साधावा, असे कळविले आहे.एका बाजूला संतप्त ग्राहक, तर दुसऱ्या बाजूला शासनाचे अजब फर्मान अशा दुहेरी मन:स्थितीत दुकानदार आहेत. तांत्रिक अडचणींविषयी दुकानदारांनी शासकीय पातळीवर विचारणा केल्यावर सर्व्हर डाऊन असल्याचे उत्तर देऊन आपली सुटका करून घेण्याचे काम होत आहे; परंतु ग्राहकांच्या रोषाला दुकानदारांनाच सामोरे जावे लागत आहे. शासनाने सर्व्हरच्या तांत्रिक अडचणींची लवकर सोडवणूक करावी, असा सूर दुकानदारांसह ग्राहकांमधूनही उमटत आहे.

ई-पॉस मशीनचे व्यवहार संथगतीने सुरू आहेत. हा राज्य सरकारचा हलगर्जीपणा आहे. तांत्रिक बाबतीत जागरूकता दिसत नाही. त्यामुळे अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांनी तातडीने या विषयात लक्ष घालून तो निकाली काढावा.-चंद्रकांत यादव, अध्यक्ष, रेशन बचाव समिती 

 

टॅग्स :Governmentसरकारkolhapurकोल्हापूर