शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

कोल्हापूर : नियम मोडणारी देवस्थान समिती बरखास्त करा, पुजारी हटाव संघर्ष समितीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 13:57 IST

कायदा धाब्यावर बसविणारी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीची पगारी पुजारी कायद्यानुसार स्थापन झालेली  नवी समिती बरखास्त करण्यात यावी व लोकप्रतिनिधींनी पावसाळी अधिवेशनात समितीविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव सादर करावा, अशी मागणी श्री करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिर पुजारी हटाव संघर्ष समितीने पत्रकार परिषदेत केली.

ठळक मुद्देनियम मोडणारी देवस्थान समिती बरखास्त करापुजारी हटाव संघर्ष समिती, हक्कभंगाच्या कारवाईची मागणी

कोल्हापूर : कायदा धाब्यावर बसविणारी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीची पगारी पुजारी कायद्यानुसार स्थापन झालेली  नवी समिती बरखास्त करण्यात यावी व लोकप्रतिनिधींनी पावसाळी अधिवेशनात समितीविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव सादर करावा, अशी मागणी श्री करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिर पुजारी हटाव संघर्ष समितीने पत्रकार परिषदेत केली.

शासनाने मंजूर केलेल्या पगारी पुजारी कायद्यानुसार नवी समिती स्थापन होऊन त्यांच्याकडे अंबाबाई मंदिराच्या सर्व अधिकारांचे हस्तांतरण होणे गरजेचे आहे. मात्र पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने आपल्या अधिकारांचा गैरवापर करीत पुजारी नियुक्ती प्रक्रिया सुरू केली आहे. ही जनतेची दिशाभूल आहे. यावेळी डॉ. सुभाष देसाई, दिलीप देसाई व डॉ. जयश्री चव्हाण यांनी पगारी पुजारी नियुक्ती प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

ते म्हणाले, महाराष्ट्र शासन विधान मंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी अधिकृत केलेले अध्यादेश व केलेले विनियम क्रमांक ३५ हा सन २०१८ च्या महाराष्ट्र शासन राजपत्रात दिनांक १२ एप्रिल २०१८ रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे.

त्यानुसार विद्यमान पुजाऱ्यांचे आनुवंशिक हक्क, विशेषाधिकार नाहीसे करण्याचा निर्णय झाला आहे. त्यात कोणताही बदल करायचा असेल, तर शासनाची रीतसर परवानगी घ्यावी लागते. अन्यथा ही कृती बेकायदेशीर ठरून शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते.राज्यपालांनी स्वाक्षरी केल्यानंतर शासनाने कायद्याची ताबडतोब अंमलबजावणी करणे; त्यासाठी कलम ३ च्या पोटकलम (९) अन्वये श्री करवीरनिवासिनी महालक्ष्मी (अंबाबाई) मंदिर व्यवस्थापन समिती स्थापन करणे गरजेचे आहे. त्यांच्याकडे देवस्थान समितीने मंदिराचे सर्वाधिकार हस्तांतरित करावयाचे आहेत.

मात्र पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अध्यक्षांनी ‘कायद्यानुुसार पुजारी नेमण्याचे सर्व अधिकार देवस्थान व्यवस्थापन समितीस राहतील,’ असे जाहीर करून दिशाभूल केली आहे. देवस्थान समिती ही सर्वस्वी वेगळी आहे.

पुनर्गठित होणाऱ्या व्यवस्थेवर आपला हक्क सांगणे ही शासनाची, समाजाची आणि भक्तांची घोर फसवणूक आहे.शिवाय, नव्या कायद्याचा आधार घेऊन परंपरागत पुजाऱ्यांना पुन्हा नेमण्याचे कटकारस्थान शिजत आहे. या कायद्यानुसार श्री करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिर व्यवस्थापनातील सारे लोकसेवक आहेत, याचे भान ठेवावे. समितीतील शासकीय अधिकाऱ्यांनी बेकायदेशीर कृत्यांना पाठीशी घालू नये. 

 

टॅग्स :Ambadevi Mandirअंबादेवी संस्थानkolhapurकोल्हापूर