शहरं
Join us  
Trending Stories
1
जपानमधील एका एक्सप्रेसवेवर ५० हून अधिक वाहनांची टक्कर, एकाचा मृत्यू; २६ जण जखमी
2
"सीमा उघडा, आम्हाला वाचवा..."; बांगलादेशात अडकलेल्या हिंदूंची भारताकडे विनवणी
3
भयंकर! पंतप्रधान आवास योजनेचा मिळाला नाही लाभ; पेट्रोल टाकून थेट ग्रामपंचायतीला लावली आग
4
Nitish Kumar : Video - मुख्यमंत्री नितीश कुमारांच्या ताफ्यातील कारची DSP ना धडक; थोडक्यात वाचला जीव
5
दररोज करा छोटी बचत, मिळतील १७ लाख रुपये; पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम करेल मालामाल, पटापट पाहा डिटेल्स
6
PNB Fraud: पंजाब नॅशनल बँकेत पुन्हा झाला ₹२,४३४ कोटींचा घोटाळा; RBI ला दिली माहिती, कोणावर आहे आरोप?
7
वृश्चिक राशीसाठी नवीन वर्ष 2026: आव्हानांमधून प्रगतीची 'आशा'; परिश्रमात सातत्य ठेवल्यास होणार नाही निराशा 
8
मित्रपक्षाच्या ३ माजी नगरसेवकांवरही भाजपाचा गळ, ९०हून अधिक सक्षम उमेदवार असल्याचा दावा
9
औटघटकेची ठरली तिसऱ्या आघाडीची चर्चा! निलंबित नेत्यांची होणार घरवापसी, नागपुरात घेतली वरिष्ठांची भेट
10
काँग्रेसची ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; २९ नवे चेहरे रिंगणात, पहिल्या यादीत कोणाची नावे?
11
तूळ राशीसाठी नवीन वर्ष 2026 नियोजन आणि स्वप्नपूर्तीचे वर्ष; 'या' एका चुकीमुळे होऊ शकते मोठे नुकसान!
12
पिंपरीत आम्ही १२५ जागा जिंकू, अजित पवारांना फक्त तीनच जागा मिळणार', भाजपा आमदाराचा दावा
13
फोननंतर विजयकुमारांचा बंडाचा झेंडा; गोरे, तडवळकर मुंबईकडे, उमेदवारीवरून रणकंदन
14
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
15
आता कॅब बुक करताना मिळणार महिला ड्रायव्हर निवडण्याचा पर्याय, महिलांच्या सुरक्षेसाठा सरकारचा मोठं पाऊल
16
Salman Khan Birthday: मध्यरात्री पनवेलच्या फार्महाऊसवर सलमानने केलं वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन, व्हिडीओ व्हायरल
17
बांगलादेशमध्ये प्रसिद्ध गायक जेम्सच्या संगीत कार्यक्रमावर जमावाने केला हल्ला, अनेक जण जखमी
18
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
19
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
20
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर देवस्थान समिती होऊ शकते बरखास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 10:37 IST

युती सरकारच्या काळात या समित्यांवर भाजप, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली होती. आता नवे सरकार शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे असल्याने तीनही पक्षांच्या कार्यकर्त्यांना पदे द्यावी लागणार आहेत.

ठळक मुद्देराज्यातील चार देवस्थाने सरकारच्या अखत्यारित

कोल्हापूर : शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे नवे सरकार स्थापन झाल्यानंतर महाराष्ट्रातील श्री सिद्धिविनायक, शिर्डी, कोल्हापूर आणि पंढरपूर या प्रमुख देवस्थान समित्या बरखास्त होऊन तेथे नव्याने पदाधिकाऱ्यांची नियुक्ती होऊ शकते. सिद्धिविनायकचे अध्यक्षपद शिवसेनेला, शिर्डीचे काँग्रेसला, तर पंढरपूर व कोल्हापुरातील पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीवर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला संधी मिळण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात श्री सिद्धिविनायक, शिर्डी साईबाबा, पंढरपूर व पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी येथील देवस्थान मिळून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती ही चार प्रमुख देवस्थाने राज्य सरकारच्या अखत्यारित आहेत. या देवस्थानांवर अध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांची निवड त्या-त्या वेळच्या सरकारकडून केली जाते.

युती सरकारच्या काळात या समित्यांवर भाजप, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली होती. आता नवे सरकार शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे असल्याने तीनही पक्षांच्या कार्यकर्त्यांना पदे द्यावी लागणार आहेत. इतक्या मोठ्या संख्येने असलेल्या कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी सरकार महामंडळे व समित्यांवर त्यांची नियुक्ती करू शकतात.

राजकीय संकेतानुसार सरकार बदलले की विद्यमान समिती व महामंडळांवरील पदाधिका-यांनी स्वत:हून राजीनामे देणे अपेक्षित असते. त्यांना हटवून नव्या सरकारची नियुक्ती करण्यासाठी आधी दिलेल्या नियुक्ती आदेशातील तरतुदी, कायदेशीर बाबी तपासाव्या लागतात. सरकारमध्ये एकमताने ठराव होऊन तो राज्यपालांकडे सहीसाठी जातो. त्यांची मान्यता मिळाली की नियुक्तीचा मार्ग मोकळा होतो. सध्या समितीवर भाजपसोबतच शिवसेनेचेही पदाधिकारी आहेत, समिती बरखास्त झाली तर शिवसेनेच्याच त्याच कार्यकर्त्यांना नव्याने संधी मिळू शकते.न्यायालयाचा निर्णय सरकारच्या बाजूनेजनता दलाचे सरकार पडले त्या १९८० च्या दरम्यान ईश्वरचंद दलवाई हे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष होते. त्यानंतर काँग्रेसचे सरकार आल्याने कार्यकाल संपण्यापूर्वीच दलवाई यांना अध्यक्षपदावरून हटविण्यात आले. याविरोधात त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. यावर न्यायालयाने समितीचे पद किंवा अधिकार हे सरकारने दिलेले असतात, ते संपादन केले नसतात, त्यामुळे तुम्ही त्यावर हक्क सांगू शकत नाही, असे म्हणत सरकारच्या बाजूने निर्णय दिला होता. या निर्णयानंतर पुढे तीन वर्षे तत्कालीन जिल्हाधिकारी समितीचे प्रशासक म्हणून काम करत होते. १९८३ साली अ‍ॅड. अशोकराव साळोखे यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.कार्यकाल पूर्ण...काँग्रेस राष्ट्रवादीच्या सत्ताकाळात सात वर्षे देवस्थान समितीला अध्यक्षच नव्हते. पाच वर्षांपूर्वी युतीचे सरकार आल्यानंतर समित्या व महामंडळांवर नियुक्त्या करण्यात आल्या, त्यावेळी काँग्रेस व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते समितीवर होते. या पदाधिकाºयांना हटविण्याऐवजी त्यांचा कार्यकाल संपल्यानंतर नव्या कार्यकर्त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर देवस्थान समितीत काय घडेल, हे येत्या काळातच ठरेल. 

 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरTempleमंदिर