शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

दहावीच्या पुरवणी परीक्षेत कोल्हापूर विभागाचा निकाल घटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 12:07 IST

जुलैमध्ये घेण्यात आलेल्या दहावी (माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र) परीक्षेचा आॅनलाईन निकाल शुक्रवारी दुपारी एक वाजता राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केला. त्यात कोल्हापूर विभागाचा निकाल १५.१७ टक्के लागला असून, राज्यात हा विभाग आठव्या क्रमांकावर आहे.

ठळक मुद्देदहावीच्या पुरवणी परीक्षेत कोल्हापूर विभागाचा निकाल घटलामुलींची आघाडी; कोल्हापूर जिल्हा अव्वल स्थानी

कोल्हापूर : जुलैमध्ये घेण्यात आलेल्या दहावी (माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र) परीक्षेचा आॅनलाईन निकाल शुक्रवारी दुपारी एक वाजता राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केला. त्यात कोल्हापूर विभागाचा निकाल १५.१७ टक्के लागला असून, राज्यात हा विभाग आठव्या क्रमांकावर आहे.

विभागात २०.०५ टक्क्यांसह कोल्हापूर जिल्हा अव्वलस्थानी आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील १९८७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यांतील मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी १८.७० टक्के, तर मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण १४.०५ टक्के आहे. मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण मुलांपेक्षा ४.६५ टक्क्यांनी अधिक आहे.शिक्षण मंडळाचे कोल्हापूर विभागीय सचिव एस. एम. आवारी यांनी पत्रकार परिषदेत या निकालाची माहिती दिली. यावेळी सहायक शिक्षण संचालक सुभाष चौगुले उपस्थित होते. कोल्हापूर विभागांतर्गत कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील १३०९४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यांतील १९८७ जण उत्तीर्ण झाले.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा १.९५ टक्क्यांनी निकाल घटला आहे. विभागात सांगली १२.९२ टक्क्यांसह द्वितीय आणि सातारा १२.४२ टक्क्यांसह तृतीय क्रमांकावर आहे. या परीक्षेत कोल्हापूर विभागात परीक्षा केंद्रांवर १५ गैरमार्गांची प्रकरणे घडली. त्यातील सर्वाधिक १३ प्रकरणे कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत.

साताऱ्यामध्ये दोन प्रकरणे घडली आहेत. त्यातील परीक्षार्थींवर शिक्षण मंडळांकडून कारवाई करण्यात आली आहे. उत्तरपत्रिकेची गुणपडताळणीसाठी अर्ज करण्याची मुदत दि. ९ सप्टेंबरपर्यंत आणि छायाप्रत मिळविण्याची मुदत १९ सप्टेंबरपर्यंत आहे. एक किंवा दोन विषयांत अनुत्तीर्ण झालेले विद्यार्थी हे शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये एटीकेटी सवलतीद्वारे इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी पात्र ठरतील, असे सचिव आवारी यांनी सांगितले.

जिल्हानिहाय निकालजिल्हा      उत्तीर्ण विद्यार्थी      टक्केवारीकोल्हापूर    ८९०                       २०.५सांगली       ५७४                      १२.९२सातारा      ५२३                       १२.४२

विभागातील आकडेवारी दृष्टिक्षेपात

  • परीक्षेसाठी नोंदणी केलेले विद्यार्थी : १३८६२
  • परीक्षेला बसलेले विद्यार्थी : १३०९४
  • एकूण उत्तीर्ण विद्यार्थी : १९८७
  • उत्तीर्ण मुलांची संख्या : १३९५ (परीक्षा दिलेली मुले : ९९२९)
  • उत्तीर्ण मुलींची संख्या : ५९२ (परीक्षा दिलेल्या मुली : ३१६५)

श्रेणीनिहाय उत्तीर्ण विद्यार्थी

  • प्रथम श्रेणी : ४
  •  द्वितीय श्रेणी : ६
  •  उत्तीर्ण श्रेणी : १९७७

 

फेब्रुवारी-मार्चदरम्यान झालेल्या परीक्षेत ज्या विभागीय मंडळांचे निकाल चांगले लागले होते, त्या मंडळांमध्ये जुलैमधील या परीक्षेचा निकाल कमी लागला आहे. त्यात कोल्हापूर, कोकण, आदींचा समावेश आहे. निकालाबाबत ज्या विद्यार्थ्यांच्या तक्रारी असतील, त्यांनी शिक्षण मंडळाशी संपर्क साधावा. पुरामध्ये ज्या विद्यार्थ्यांच्या दहावी, बारावीच्या गुणपत्रिका वाहून गेल्या अथवा खराब झाल्या असतील, तर त्यांना त्या बदलून दिल्या जातील.- एस. एम. आवारी, सचिव, कोल्हापूर विभाग. 

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकालkolhapurकोल्हापूर