शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
2
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
3
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
4
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
5
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
6
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
7
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
8
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
9
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
10
एरोड्रोम परवान्याने अडविले नवी मुंबईतील विमानोड्डाण; सप्टेंबरचा मुहूर्तही हुकणार?
11
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
12
अरे व्वा...! काही तासांत क्लिअर होणार चेक; ४ ऑक्टोबरपासून दोन टप्प्यांत अंमलबजावणी
13
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
14
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
15
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
16
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
17
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
18
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
19
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
20
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...

दहावीच्या पुरवणी परीक्षेत कोल्हापूर विभागाचा निकाल घटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 12:07 IST

जुलैमध्ये घेण्यात आलेल्या दहावी (माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र) परीक्षेचा आॅनलाईन निकाल शुक्रवारी दुपारी एक वाजता राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केला. त्यात कोल्हापूर विभागाचा निकाल १५.१७ टक्के लागला असून, राज्यात हा विभाग आठव्या क्रमांकावर आहे.

ठळक मुद्देदहावीच्या पुरवणी परीक्षेत कोल्हापूर विभागाचा निकाल घटलामुलींची आघाडी; कोल्हापूर जिल्हा अव्वल स्थानी

कोल्हापूर : जुलैमध्ये घेण्यात आलेल्या दहावी (माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र) परीक्षेचा आॅनलाईन निकाल शुक्रवारी दुपारी एक वाजता राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केला. त्यात कोल्हापूर विभागाचा निकाल १५.१७ टक्के लागला असून, राज्यात हा विभाग आठव्या क्रमांकावर आहे.

विभागात २०.०५ टक्क्यांसह कोल्हापूर जिल्हा अव्वलस्थानी आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील १९८७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यांतील मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी १८.७० टक्के, तर मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण १४.०५ टक्के आहे. मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण मुलांपेक्षा ४.६५ टक्क्यांनी अधिक आहे.शिक्षण मंडळाचे कोल्हापूर विभागीय सचिव एस. एम. आवारी यांनी पत्रकार परिषदेत या निकालाची माहिती दिली. यावेळी सहायक शिक्षण संचालक सुभाष चौगुले उपस्थित होते. कोल्हापूर विभागांतर्गत कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील १३०९४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यांतील १९८७ जण उत्तीर्ण झाले.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा १.९५ टक्क्यांनी निकाल घटला आहे. विभागात सांगली १२.९२ टक्क्यांसह द्वितीय आणि सातारा १२.४२ टक्क्यांसह तृतीय क्रमांकावर आहे. या परीक्षेत कोल्हापूर विभागात परीक्षा केंद्रांवर १५ गैरमार्गांची प्रकरणे घडली. त्यातील सर्वाधिक १३ प्रकरणे कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत.

साताऱ्यामध्ये दोन प्रकरणे घडली आहेत. त्यातील परीक्षार्थींवर शिक्षण मंडळांकडून कारवाई करण्यात आली आहे. उत्तरपत्रिकेची गुणपडताळणीसाठी अर्ज करण्याची मुदत दि. ९ सप्टेंबरपर्यंत आणि छायाप्रत मिळविण्याची मुदत १९ सप्टेंबरपर्यंत आहे. एक किंवा दोन विषयांत अनुत्तीर्ण झालेले विद्यार्थी हे शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये एटीकेटी सवलतीद्वारे इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी पात्र ठरतील, असे सचिव आवारी यांनी सांगितले.

जिल्हानिहाय निकालजिल्हा      उत्तीर्ण विद्यार्थी      टक्केवारीकोल्हापूर    ८९०                       २०.५सांगली       ५७४                      १२.९२सातारा      ५२३                       १२.४२

विभागातील आकडेवारी दृष्टिक्षेपात

  • परीक्षेसाठी नोंदणी केलेले विद्यार्थी : १३८६२
  • परीक्षेला बसलेले विद्यार्थी : १३०९४
  • एकूण उत्तीर्ण विद्यार्थी : १९८७
  • उत्तीर्ण मुलांची संख्या : १३९५ (परीक्षा दिलेली मुले : ९९२९)
  • उत्तीर्ण मुलींची संख्या : ५९२ (परीक्षा दिलेल्या मुली : ३१६५)

श्रेणीनिहाय उत्तीर्ण विद्यार्थी

  • प्रथम श्रेणी : ४
  •  द्वितीय श्रेणी : ६
  •  उत्तीर्ण श्रेणी : १९७७

 

फेब्रुवारी-मार्चदरम्यान झालेल्या परीक्षेत ज्या विभागीय मंडळांचे निकाल चांगले लागले होते, त्या मंडळांमध्ये जुलैमधील या परीक्षेचा निकाल कमी लागला आहे. त्यात कोल्हापूर, कोकण, आदींचा समावेश आहे. निकालाबाबत ज्या विद्यार्थ्यांच्या तक्रारी असतील, त्यांनी शिक्षण मंडळाशी संपर्क साधावा. पुरामध्ये ज्या विद्यार्थ्यांच्या दहावी, बारावीच्या गुणपत्रिका वाहून गेल्या अथवा खराब झाल्या असतील, तर त्यांना त्या बदलून दिल्या जातील.- एस. एम. आवारी, सचिव, कोल्हापूर विभाग. 

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकालkolhapurकोल्हापूर