शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

कोल्हापूर : रताळे, वरी, शाबूदाण्याला मागणी, महाशिवरात्रीमुळे बाजारात गर्दी : भाज्यांचे दर स्थिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 15:23 IST

दोन दिवसांवर आलेल्या महाशिवरात्री सणाच्या पार्श्वभूमीवर रविवारच्या आठवडी बाजारात विशेषत : उपवासाच्या पदार्थांना मागणी होती. रताळे, फळांसह शाबूदाणा, वरी आणि शेंगदाणे, राजगिरा लाडू खरेदीसाठी बाजारात ग्राहकांची लगबग सुरू होती. दुसरीकडे, भाज्यांचे दर स्थिर होते तर कलिंगड, द्राक्षांसाठी गर्दी होती.

ठळक मुद्देरताळे, वरी, शाबूदाण्याला मागणी महाशिवरात्रीमुळे बाजारात गर्दी भाज्यांचे दर स्थिर

कोल्हापूर : दोन दिवसांवर आलेल्या महाशिवरात्री सणाच्या पार्श्वभूमीवर रविवारच्या आठवडी बाजारात विशेषत : उपवासाच्या पदार्थांना मागणी होती. रताळे, फळांसह शाबूदाणा, वरी आणि शेंगदाणे, राजगिरा लाडू खरेदीसाठी बाजारात ग्राहकांची लगबग सुरू होती. दुसरीकडे, भाज्यांचे दर स्थिर होते तर कलिंगड, द्राक्षांसाठी गर्दी होती.लक्ष्मीपुरीतील रविवारच्या आठवडी बाजारासह कपिलतीर्थ मार्केट, पाडळकर मार्केट, नार्वेकर मार्केट, आदी बाजारांत उपवासाच्या पदार्थांना जास्त मागणी होती. किरकोळ बाजारात रताळ्याचा प्रतिकिलो दर २० रुपये, शाबूदाणा ६० पासून ७२ रुपये, वरी ६० पासून ८० पर्यंत, तर शेंगदाणे ८० रुपयांपासून १०० रुपयांपर्यंत होते. राजगिरा लाडू (दहा नग) दर २० रुपये होता.त्याचबरोबर काजू ८०० ते एक हजार रुपयांपर्यंत, बदाम ५०० ते ८०० रुपयांच्या घरात, तर पिस्ता १६०० रुपये प्रतिकिलो होता. खारी २०० ते ४०० रुपये, सुके खोबरे १८० रुपये, तांदळाचे दर ४० रुपये ते १४० रुपयांपर्यंत, तर शेंगतेल १२५ रुपये असा प्रतिकिलोचा दर होता. तसेच कोबी, वांगी, ओली मिरची, टोमॅटो, कारली, भेंडी, वरणा, दोडका, काकडी, वाल, बिनीस, हिरवा टोमॅटो, दुधी भोपळा, गाजर, आले आणि मेथी, पालक व पोकळ्याचा दर स्थिर होता. ओल्या वाटाण्याचा दर कमी झाला आहे. तो १८ रुपये प्रतिकिलो असा होता. लिंबूची आवक वाढल्याने त्याचा दरावर परिणाम झाला आहे. २२५ रुपयांना त्याचे चुमडे होते.फळबाजारात मोसंबी, माल्टा, चिक्कू, पेरू, सफरचंद, डाळिंब, अननसालाही मागणी वाढली आहे. द्राक्षे ६० रुपये, मोसंबी ५० ते ५५ रुपये, चिक्कू ३० रुपये, पेरू ४० ते ४५ रुपये, सफरचंद ८० ते १०० रुपयांच्या घरात होते. डाळिंब ४० रुपये प्रतिकिलो होते. विशेष म्हणजे स्ट्रॉबेरीला मागणी वाढली होती. बॉक्सचा दर १०० रुपये होता. एकंदरीत, सणामुळे बाजारात ग्राहकांची गर्दी होती.

रताळ्यांची आवक वाढलीमहाशिवरात्री सणानिमित्त घाऊक बाजारात रताळ्यांची आवक वाढल्याने त्याचा दरावर परिणाम झाला आहे. रताळ्यांचा दर दहा किलोंना १८० रुपये असा होता. ऐन सणात रताळ्यांचा दर उतरल्याने ग्राहकांना याचा फायदा झाला.

कांदा-बटाटा, गुळाचा दर स्थिरकांदा, बटाट्यासह लसूण, गूळरव्यांचा दर स्थिर होता. कांदा २० रुपये, बटाटा दहा रुपये, तर लसूण २२ ते २५ रुपये असा प्रतिकिलो दर होता. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMarketबाजार