शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
4
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
5
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
6
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
7
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
8
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
9
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
10
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
11
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
12
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
13
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
14
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
15
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
16
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
17
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
18
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
19
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
20
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?

कोल्हापूरची हद्दवाढ महापालिका निवडणुकीनंतरच, जयश्री जाधव यांच्या लक्षवेधीला विधानसभेत उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2023 11:56 IST

कोल्हापूरची हद्दवाढ झाली नसल्याने राज्य व केंद्र सरकारच्या विविध योजनांतून निधी मिळवण्यास अडचणी

कोल्हापूर : कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीसंदर्भात महानगरपालिका निवडणुका झाल्यानंतर सहा महिन्यांत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन नगरविकासमंत्री (अतिरिक्त) उदय सामंत यांनी बुधवारी विधानसभेत दिले. काँग्रेसच्या कोल्हापूर उत्तरच्या आमदार जयश्री जाधव यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधले.मंत्री सामंत म्हणाले, महानगरपालिका निवडणुकीच्या अगोदर सहा महिने शहराच्या हद्दवाढीबाबत निर्णय घेतले जाऊ नयेत असे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिले असल्याने सरकारला निर्णय घेण्यात अडचणी आहेत. मुख्यमंत्री हद्दवाढीबाबत सकारात्मक आहेत, म्हणून महापालिका निवडणूक झाल्यानंतर पुढील सहा महिन्यांत याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल.कोल्हापूर शहराची हद्दवाढ रखडली आहे. कोल्हापूरनंतर स्थापन झालेल्या अनेक महानगरपालिकांची एकदा-दोनदा नव्हे, तर अनेकदा हद्दवाढ झाली. त्यामुळे त्या शहरांचा विकास झाला; परंतु कोल्हापूरची हद्दवाढ झाली नसल्याने राज्य व केंद्र सरकारच्या विविध योजनांतून निधी मिळवण्यास अडचणी येत आहेत. परिणामी शहराच्या सर्वांगीण विकास खुंटला आहे. हद्दवाढीचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे. या प्रस्तावास शासनाने त्वरित मंजुरी द्यावी, अशी मागणी आमदार जाधव यांनी केली.महापालिकेने २०१३ पासून २०२१ पर्यंत चार वेळा हद्दवाढीचे प्रस्ताव सादर केले. २०१४ मध्ये १७ गावांचा समावेश असलेला हद्दवाढीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर केला होता. या प्रस्तावावर शासनाकडून कोणतीही कार्यवाही केलेली नाही. हद्दवाढीला मान्यता दिलेली नाही. कोल्हापूरवासीयांच्या हक्कावर गदा आणण्याचा प्रयत्न शासनाकडून करण्यात येत आहे का, अशी शंका उपस्थित केली जात असल्याचे जाधव यांनी सरकारच्या निदर्शनास आणून दिले.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाविकास आघाडी सरकारमध्ये नगरविकासमंत्री असताना, त्यांनी महानगरपालिकेकडून हद्दवाढीचा फेरप्रस्ताव मागविला होता. त्यानुसार प्रशासनाने फेब्रुवारी २०२१ मध्ये १८ गावे व दोन एमआयडीसींसह नवीन प्रस्ताव सादर केला आहे; पण त्याकडे शासनाने दुर्लक्ष केल्याचे आमदार जाधव यांनी निदर्शनास आणून दिले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर