शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

कोल्हापूरची हद्दवाढ महापालिका निवडणुकीनंतरच, जयश्री जाधव यांच्या लक्षवेधीला विधानसभेत उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2023 11:56 IST

कोल्हापूरची हद्दवाढ झाली नसल्याने राज्य व केंद्र सरकारच्या विविध योजनांतून निधी मिळवण्यास अडचणी

कोल्हापूर : कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीसंदर्भात महानगरपालिका निवडणुका झाल्यानंतर सहा महिन्यांत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन नगरविकासमंत्री (अतिरिक्त) उदय सामंत यांनी बुधवारी विधानसभेत दिले. काँग्रेसच्या कोल्हापूर उत्तरच्या आमदार जयश्री जाधव यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधले.मंत्री सामंत म्हणाले, महानगरपालिका निवडणुकीच्या अगोदर सहा महिने शहराच्या हद्दवाढीबाबत निर्णय घेतले जाऊ नयेत असे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिले असल्याने सरकारला निर्णय घेण्यात अडचणी आहेत. मुख्यमंत्री हद्दवाढीबाबत सकारात्मक आहेत, म्हणून महापालिका निवडणूक झाल्यानंतर पुढील सहा महिन्यांत याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल.कोल्हापूर शहराची हद्दवाढ रखडली आहे. कोल्हापूरनंतर स्थापन झालेल्या अनेक महानगरपालिकांची एकदा-दोनदा नव्हे, तर अनेकदा हद्दवाढ झाली. त्यामुळे त्या शहरांचा विकास झाला; परंतु कोल्हापूरची हद्दवाढ झाली नसल्याने राज्य व केंद्र सरकारच्या विविध योजनांतून निधी मिळवण्यास अडचणी येत आहेत. परिणामी शहराच्या सर्वांगीण विकास खुंटला आहे. हद्दवाढीचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे. या प्रस्तावास शासनाने त्वरित मंजुरी द्यावी, अशी मागणी आमदार जाधव यांनी केली.महापालिकेने २०१३ पासून २०२१ पर्यंत चार वेळा हद्दवाढीचे प्रस्ताव सादर केले. २०१४ मध्ये १७ गावांचा समावेश असलेला हद्दवाढीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर केला होता. या प्रस्तावावर शासनाकडून कोणतीही कार्यवाही केलेली नाही. हद्दवाढीला मान्यता दिलेली नाही. कोल्हापूरवासीयांच्या हक्कावर गदा आणण्याचा प्रयत्न शासनाकडून करण्यात येत आहे का, अशी शंका उपस्थित केली जात असल्याचे जाधव यांनी सरकारच्या निदर्शनास आणून दिले.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाविकास आघाडी सरकारमध्ये नगरविकासमंत्री असताना, त्यांनी महानगरपालिकेकडून हद्दवाढीचा फेरप्रस्ताव मागविला होता. त्यानुसार प्रशासनाने फेब्रुवारी २०२१ मध्ये १८ गावे व दोन एमआयडीसींसह नवीन प्रस्ताव सादर केला आहे; पण त्याकडे शासनाने दुर्लक्ष केल्याचे आमदार जाधव यांनी निदर्शनास आणून दिले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर