शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
4
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
5
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
6
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
7
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
8
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
9
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
10
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
11
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
12
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
13
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
14
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
15
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
16
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
17
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
18
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
19
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
20
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : साखर कारखानदारांच्या प्रश्नांचा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात, चंद्रकांतदादा पाटील यांचे बैठकीचे आश्वासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 19:11 IST

साखरेचे दर झपाट्याने उतरल्याने निर्माण झालेल्या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत मंगळवारीच बैठक लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी गुरुवारी दिली.

ठळक मुद्देचंद्रकांतदादा पाटील यांचे बैठकीचे आश्वासन२० लाख टनांच्या बफर स्टॉकची मागणीगडकरींच्या ‘त्या’ सूचनेचे स्वागत, पुण्यात बैठक

कोल्हापूर : साखरेचे दर झपाट्याने उतरल्याने निर्माण झालेल्या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत मंगळवारीच बैठक लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी गुरुवारी दिली. कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांशी चर्चा केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.येथील शासकीय विश्रामगृहावर कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीला सर्व कारखानदारांनी एकत्र बसून सुमारे दोन तास निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत चर्चा केली. त्यानंतर त्यांनी महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची भेट घेऊन त्यांना निर्माण झालेले प्रश्न सांगून त्यावर उपाय करण्याची विनंती केली.या बैठकीनंतर मंत्री पाटील म्हणाले, एफआरपीपेक्षा २०० रुपये जादा द्यावेत, अशा प्रकारचा तोडगा विविध शेतकरी संघटना, कारखानदारांच्या बैठकीत काढण्यात आला होता. त्यानुसार कारखाने सुरू झाले.

काही कारखान्यांनी बिलेही अदा करण्यास सुरुवात केली. मात्र, आता साखरेचे दर ५०० रुपयांनी खाली येऊन ३०५० रुपयांपर्यंत खाली आले आहेत. दोन वर्षांपूर्वी अशीच परिस्थिती निर्माण झाल्यानंतर सरकारने मदत केली होती.हे प्रश्न आर्थिक असल्याने मुख्यमंत्र्यांशीच बोलून आणि सहकार मंत्र्यांना सोबत घेऊन निर्णय घ्यावे लागतील. त्यानुसार ही बैठक मंगळवारी व्हावी यासाठी माझे प्रयत्न राहणार आहेत. मी सहकारमंत्री असताना राज्य बँकेने केलेल्या ८५ टक्के मूल्यांकन वाढवून ९० टक्के केले होते. यंदाही याच पद्धतीने उपाय करावे लागतील.त्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत आमदार हसन मुश्रीफ म्हणाले, साखरेचे दर उतरल्याने मोठे संकट कारखानदारीसमोर उभे राहिले आहे. मंत्री पाटील यांच्याच उपस्थितीमध्ये एफआरपी आणि अधिकचे २०० रुपये, असा तोडगा काढण्यात आला होता. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलेला ‘शब्द’ पाळण्यासाठी यातून काही तरी मार्ग काढणे आवश्यक आहे म्हणूनच आम्ही महसूलमंत्री पाटील यांची भेट घेऊन आमच्या मागण्या सादर केल्या आहेत.

आता त्यांनीच पुढाकार घेऊन यातून मार्ग काढणे आवश्यक आहे. यावेळी भोगावती साखर कारखान्याचे चेअरमन पी. एन. पाटील, ‘जवाहर’चे चेअरमन प्रकाश आवाडे, ‘बिद्री’चे चेअरमन के. पी. पाटील, सदाशिवराव मंडलिक कारखान्याचे चेअरमन संजय मंडलिक, ‘कुंभी-कासारी’चे चेअरमन आमदार चंद्रदीप नरके आणि आजरा साखर कारखान्याचे चेअरमन अशोक चराटी उपस्थित होते.

कारखानदारांच्या मागण्या१) शासनाने तातडीने २० लाख मेट्रिक टन साखरेचा बफर स्टॉक करावा. ज्यामुळे साखरेचे दर आणखी कमी होणार नाहीत.२) यासाठीचे होणारे ५० टक्के व्याज शासनाने भरावे तर ५० टक्के व्याज कारखाने भरतील. गोदामाचे भाडे शासनाने दिले नाही तरी चालेल.३) मूल्यांकनाच्या ८५ टक्के रक्कम राज्य बँकेकडून उपलब्ध करून दिले जाते त्यामध्ये ५ टक्क्यांची वाढ करून ९० टक्के कर्ज द्यावे.४) एफआरपी अदा करण्यासाठी याआधी कारखान्यांना दोन कर्जे घ्यावी लागली आहेत. त्या कर्जाची पुनर्रचना करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने राज्य, जिल्हा आणि खासगी बँकांना आदेश द्यावेत.गडकरींच्या ‘त्या’ सूचनेचे स्वागतगॅस अनुदानाप्रमाणे शिधापत्रिकेवर साखर देण्यापेक्षा ती घेणाऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अनुदान जमा करावे ही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सूचना केली आहे, असे सांगण्यात आले. तिचे आम्ही स्वागत करतो, असे यावेळी आमदार मुश्रीफ म्हणाले.

पुण्यात बैठकमहाराष्ट्र राज्य साखर संघाने राज्यातील सर्व कारखाना अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक महत्त्वाची बैठक दुपारी २ वाजता पुणे येथे साखर संकुलात बोलावली आहे. साखरेचे दर उतरल्याने जे निर्माण झालेल्या परिस्थितीवर यावेळी चर्चा होणार असून या बैठकीत पुढची दिशा ठरणार आहे. 

 

टॅग्स :Chandrakant Dada Bachu Patilचंद्रकांतदादा बच्चू पाटीलSugar factoryसाखर कारखाने