शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर :  सोनवडे घाटाऐवजी प्रलंबित प्रकल्प पूर्ण करा : जालंदर पाटील यांचे परखड मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 12:03 IST

विकासासाठी एखाद्या शहराला जोडणारे दहा रस्ते करण्यास कोणाचीही हरकत नसते, पण विविध कारणांनी रखडलेले व सामान्य माणसांच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले पाणी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे, असे सोनवडे घाटाबाबत परखड मत स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देसोनवडे घाटाऐवजी प्रलंबित प्रकल्प पूर्ण करा : जालंदर पाटील यांचे परखड मत धनदांडग्यांच्या फार्म हाऊससाठीच घाट

कोल्हापूर : विकासासाठी एखाद्या शहराला जोडणारे दहा रस्ते करण्यास कोणाचीही हरकत नसते, पण विविध कारणांनी रखडलेले व सामान्य माणसांच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले पाणी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे, असे सोनवडे घाटाबाबत परखड मत स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील यांनी व्यक्त केले.‘लोकमत’ने सोनवडे घाटाबाबत मांडलेल्या भूमिकेचे स्वागत करत प्रा. जालंदर पाटील म्हणाले, देशाला स्वातंत्र्य मिळून ६० वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला तरी आजही सामान्य माणसाला मूलभूत गरजा देता आलेल्या नाहीत.

आजही कोल्हापूर जिल्ह्यातील दीडशेहून अधिक गावांना रस्ताच नाही. एकीकडे राज्यकर्ते ‘अच्छे दिन’च्या गप्पा मारतात पण गेल्या चार वर्षांत दुर्गम वाड्या-वस्त्यांवर ‘अच्छे दिन’चे वारेही पोहोचलेले नाही. मोठ-मोठ्या शहरांना गोंजारत असताना ज्या शहरांना जगवण्याचे काम करते ते खेडे मात्र प्राथमिक सुविधांपासून उपेक्षित राहिले आहे.

राधानगरी तालुक्यातील धनगर वाड्यांची अवस्था काय आहे. आजही येथील लोकांना दहा-बारा किलोमीटर जंगलातून पायपीट करत यावे लागते. उचंगी, धामणीसारखे अनेक प्रकल्प गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहेत.

हे प्रकल्प झाले तर सामान्य माणसांच्या जीवनात हरितक्रांती येईल. पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे जिल्हा नियोजन मंडळाच्या प्रत्येक बैठकीत केवळ आश्वासन देतात. सभागृहात दिलेला ‘शब्द’ न पाळणाऱ्या लोकप्रतिनिधीकडून विकासाची काय अपेक्षा करायची.मोठ्या शहरांकडे जाण्यासाठी दहा रस्ते करा, आमची त्याला हरकत नाही. पण अगोदर मूलभूत सुविधा तरी द्या. सोनवडे घाट होण्यासाठी लोकप्रतिनिधी धडपडत आहेत, त्यातून सामान्य माणसांचा फायदा काय? घाट होणार म्हटल्यावर आजूबाजूच्या जमिनी कोणी विकत घेतल्या.

धनदांडग्यांचे अलिशान फार्म हाऊस उभारण्यासाठीच फायदा होणार आहे. त्याऐवजी पर्यटन विकासासह सामान्य माणसांच्या हाताला काम कसे देता येईल? यासाठी नियोजन केले पाहिजे.

चांदोली ते गोवा व्हाया गगनबावडा, राधानगरी, आजरा, चंदगडमार्गे रस्ता केला तर या भागातील विकासाला खऱ्या अर्थाने चालना मिळेल. जंगलात राहणारे लोकांच्या रानमेव्याला चांगला दर मिळेल, त्यांचे उत्पन्न वाढेल, तसा प्रकल्प अनेकवेळा आपण मांडला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरroad transportरस्ते वाहतूक