शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार!
3
"इथं काम करणं आता कठीण..."; रस्त्यांवरील खड्डे अन् वाहतूक कोंडीमुळे बंगळुरूतील कंपनी शिफ्ट होणार
4
Crime: "माझ्या बहिणीपासून दूर राहा", वारंवार समजावूनही मित्र ऐकत नव्हता; मग...
5
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
6
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
7
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
8
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
9
परशुराम महामंडळाच्या अध्यक्षांना दिला मंत्रिदर्जा; अजित पवार गटाचे आशिष दामले आहेत अध्यक्ष
10
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
11
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
12
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
13
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
14
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
15
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
16
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
17
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
18
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
19
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
20
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक

कोल्हापूर :  सोनवडे घाटाऐवजी प्रलंबित प्रकल्प पूर्ण करा : जालंदर पाटील यांचे परखड मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 12:03 IST

विकासासाठी एखाद्या शहराला जोडणारे दहा रस्ते करण्यास कोणाचीही हरकत नसते, पण विविध कारणांनी रखडलेले व सामान्य माणसांच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले पाणी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे, असे सोनवडे घाटाबाबत परखड मत स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देसोनवडे घाटाऐवजी प्रलंबित प्रकल्प पूर्ण करा : जालंदर पाटील यांचे परखड मत धनदांडग्यांच्या फार्म हाऊससाठीच घाट

कोल्हापूर : विकासासाठी एखाद्या शहराला जोडणारे दहा रस्ते करण्यास कोणाचीही हरकत नसते, पण विविध कारणांनी रखडलेले व सामान्य माणसांच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले पाणी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे, असे सोनवडे घाटाबाबत परखड मत स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील यांनी व्यक्त केले.‘लोकमत’ने सोनवडे घाटाबाबत मांडलेल्या भूमिकेचे स्वागत करत प्रा. जालंदर पाटील म्हणाले, देशाला स्वातंत्र्य मिळून ६० वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला तरी आजही सामान्य माणसाला मूलभूत गरजा देता आलेल्या नाहीत.

आजही कोल्हापूर जिल्ह्यातील दीडशेहून अधिक गावांना रस्ताच नाही. एकीकडे राज्यकर्ते ‘अच्छे दिन’च्या गप्पा मारतात पण गेल्या चार वर्षांत दुर्गम वाड्या-वस्त्यांवर ‘अच्छे दिन’चे वारेही पोहोचलेले नाही. मोठ-मोठ्या शहरांना गोंजारत असताना ज्या शहरांना जगवण्याचे काम करते ते खेडे मात्र प्राथमिक सुविधांपासून उपेक्षित राहिले आहे.

राधानगरी तालुक्यातील धनगर वाड्यांची अवस्था काय आहे. आजही येथील लोकांना दहा-बारा किलोमीटर जंगलातून पायपीट करत यावे लागते. उचंगी, धामणीसारखे अनेक प्रकल्प गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहेत.

हे प्रकल्प झाले तर सामान्य माणसांच्या जीवनात हरितक्रांती येईल. पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे जिल्हा नियोजन मंडळाच्या प्रत्येक बैठकीत केवळ आश्वासन देतात. सभागृहात दिलेला ‘शब्द’ न पाळणाऱ्या लोकप्रतिनिधीकडून विकासाची काय अपेक्षा करायची.मोठ्या शहरांकडे जाण्यासाठी दहा रस्ते करा, आमची त्याला हरकत नाही. पण अगोदर मूलभूत सुविधा तरी द्या. सोनवडे घाट होण्यासाठी लोकप्रतिनिधी धडपडत आहेत, त्यातून सामान्य माणसांचा फायदा काय? घाट होणार म्हटल्यावर आजूबाजूच्या जमिनी कोणी विकत घेतल्या.

धनदांडग्यांचे अलिशान फार्म हाऊस उभारण्यासाठीच फायदा होणार आहे. त्याऐवजी पर्यटन विकासासह सामान्य माणसांच्या हाताला काम कसे देता येईल? यासाठी नियोजन केले पाहिजे.

चांदोली ते गोवा व्हाया गगनबावडा, राधानगरी, आजरा, चंदगडमार्गे रस्ता केला तर या भागातील विकासाला खऱ्या अर्थाने चालना मिळेल. जंगलात राहणारे लोकांच्या रानमेव्याला चांगला दर मिळेल, त्यांचे उत्पन्न वाढेल, तसा प्रकल्प अनेकवेळा आपण मांडला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरroad transportरस्ते वाहतूक