शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
4
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
6
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
7
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
8
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
9
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
10
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
11
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
12
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
13
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
14
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
15
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
16
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
17
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
18
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
19
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
20
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस

कोल्हापूर :  सोनवडे घाटाऐवजी प्रलंबित प्रकल्प पूर्ण करा : जालंदर पाटील यांचे परखड मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 12:03 IST

विकासासाठी एखाद्या शहराला जोडणारे दहा रस्ते करण्यास कोणाचीही हरकत नसते, पण विविध कारणांनी रखडलेले व सामान्य माणसांच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले पाणी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे, असे सोनवडे घाटाबाबत परखड मत स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देसोनवडे घाटाऐवजी प्रलंबित प्रकल्प पूर्ण करा : जालंदर पाटील यांचे परखड मत धनदांडग्यांच्या फार्म हाऊससाठीच घाट

कोल्हापूर : विकासासाठी एखाद्या शहराला जोडणारे दहा रस्ते करण्यास कोणाचीही हरकत नसते, पण विविध कारणांनी रखडलेले व सामान्य माणसांच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले पाणी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे, असे सोनवडे घाटाबाबत परखड मत स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील यांनी व्यक्त केले.‘लोकमत’ने सोनवडे घाटाबाबत मांडलेल्या भूमिकेचे स्वागत करत प्रा. जालंदर पाटील म्हणाले, देशाला स्वातंत्र्य मिळून ६० वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला तरी आजही सामान्य माणसाला मूलभूत गरजा देता आलेल्या नाहीत.

आजही कोल्हापूर जिल्ह्यातील दीडशेहून अधिक गावांना रस्ताच नाही. एकीकडे राज्यकर्ते ‘अच्छे दिन’च्या गप्पा मारतात पण गेल्या चार वर्षांत दुर्गम वाड्या-वस्त्यांवर ‘अच्छे दिन’चे वारेही पोहोचलेले नाही. मोठ-मोठ्या शहरांना गोंजारत असताना ज्या शहरांना जगवण्याचे काम करते ते खेडे मात्र प्राथमिक सुविधांपासून उपेक्षित राहिले आहे.

राधानगरी तालुक्यातील धनगर वाड्यांची अवस्था काय आहे. आजही येथील लोकांना दहा-बारा किलोमीटर जंगलातून पायपीट करत यावे लागते. उचंगी, धामणीसारखे अनेक प्रकल्प गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहेत.

हे प्रकल्प झाले तर सामान्य माणसांच्या जीवनात हरितक्रांती येईल. पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे जिल्हा नियोजन मंडळाच्या प्रत्येक बैठकीत केवळ आश्वासन देतात. सभागृहात दिलेला ‘शब्द’ न पाळणाऱ्या लोकप्रतिनिधीकडून विकासाची काय अपेक्षा करायची.मोठ्या शहरांकडे जाण्यासाठी दहा रस्ते करा, आमची त्याला हरकत नाही. पण अगोदर मूलभूत सुविधा तरी द्या. सोनवडे घाट होण्यासाठी लोकप्रतिनिधी धडपडत आहेत, त्यातून सामान्य माणसांचा फायदा काय? घाट होणार म्हटल्यावर आजूबाजूच्या जमिनी कोणी विकत घेतल्या.

धनदांडग्यांचे अलिशान फार्म हाऊस उभारण्यासाठीच फायदा होणार आहे. त्याऐवजी पर्यटन विकासासह सामान्य माणसांच्या हाताला काम कसे देता येईल? यासाठी नियोजन केले पाहिजे.

चांदोली ते गोवा व्हाया गगनबावडा, राधानगरी, आजरा, चंदगडमार्गे रस्ता केला तर या भागातील विकासाला खऱ्या अर्थाने चालना मिळेल. जंगलात राहणारे लोकांच्या रानमेव्याला चांगला दर मिळेल, त्यांचे उत्पन्न वाढेल, तसा प्रकल्प अनेकवेळा आपण मांडला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरroad transportरस्ते वाहतूक