शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
4
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
5
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
6
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
7
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
8
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
9
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
10
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
11
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
12
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
13
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
14
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
15
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
16
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
17
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
18
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
19
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
20
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू

कोल्हापूर : राधानगरीचा क्रमांक ३ चा दरवाजा बंद : दुधगंगेचाही विसर्ग झाला कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 18:51 IST

पावसाचा जोर कमी झाला असून गुरुवारी दिवसभर जिल्ह्यात उघडझाप राहीली. दुपारी दीड वाजता दुधगंगेतून साडे तीन हजार क्युसेकने विसर्ग कमी करण्यात आला तर राधानगरी धरणाचा क्रमांक ३ चा दरवाजाही साडे चार वाजता बंद झाला. अद्याप नद्या तुडूंब भरल्याने २० बंधारे पाण्याखाली आहेत.

ठळक मुद्दे राधानगरीचा क्रमांक ३ चा दरवाजा बंद दुधगंगेचाही विसर्ग झाला कमी

कोल्हापूर : पावसाचा जोर कमी झाला असून गुरुवारी दिवसभर जिल्ह्यात उघडझाप राहीली. दुपारी दीड वाजता दुधगंगेतून साडे तीन हजार क्युसेकने विसर्ग कमी करण्यात आला तर राधानगरी धरणाचा क्रमांक ३ चा दरवाजाही साडे चार वाजता बंद झाला. अद्याप नद्या तुडूंब भरल्याने २० बंधारे पाण्याखाली आहेत.गेल्या आठवड्यात धुंवाधार पावसाने जिल्ह्यात महापूर आणला होता. परंतु गेल्या चार दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला असून गुरुवारी पावसाची उघडीप होती. परंतु ढगाळ वातावरणाने वातावरणामध्ये कमालीचा गारठा जाणवत होता.

धरणक्षेत्रातील पाऊस थांबल्याने राधानगरी धरणाचा क्रमांक ३ चा दरवाजा बंद झाला. येथून ४,५०० क्युसेकने होणार विर्सग कमी होऊन तो आता १६००क्युसेकने सुुुरु आहे. त्याचबरोबर दुधगंगा धरणातून पाण्याचा विसर्ग दुपारी ३,५०० क्युसेकने कमी करण्यात आला असून येथून ४,५०० क्युसेक विसर्ग सुरु आहे.

पाण्याची पातळी कमी होत असून पंचगंगेची राजाराम बंधारा येथे पाणी पातळी सायंकाळी २५ .१० इंच राहीली. धरणातील पाण्याचा विसर्ग कमी झाल्याने पाणी पातळी झपाट्याने कमी होत आहे. अद्याप २० बंधारे पाण्याखाली असून १० ग्रामीण, ३ राज्य, ५ प्रमुख जिल्हा, १७ इतर जिल्हा मार्ग वाहतुकीसाठी बंद असून पर्यायी मार्गाने वाहतुक सुरु आहे.जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात गुरुवारी सकाळी आठपर्यंत ९.०५ मि.मी. पावसाची नोंद झाली. यामध्ये हातकणंगलेत २.०० मि.मी., शिरोळमध्ये १.००, पन्हाळ्यात ८.२९ , शाहूवाडी १५.६६, राधानगरी १२.३३, गगनबावडा १८.००, करवीर ७.७२, कागल ७.१४, गडहिंग्लज ३.१४, भुदरगड ८.८०, आजरा १५.००, चंदगड ९.५० मि.मी. पाऊस पडला आहे.

टॅग्स :monsoon 2018मान्सून 2018kolhapurकोल्हापूर