शहरं
Join us  
Trending Stories
1
२० वर्षांचा ईएमआय १५ वर्षांत संपणार, घर-वाहन कर्ज झाले आणखी स्वस्त, ‘आरबीआय’कडून रेपो दरात कपात
2
इंडिगो नव्हे, इंडि-नो-गो! दिवसभरात १ हजार उड्डाणे, ३ दिवसांत २ हजारांपेक्षा जास्त विमानसेवा रद्द
3
इंडिगो विमान संकट, रेल्वेने मोर्चा सांभाळला, ३७ ट्रेनमध्ये वाढवले ११६ डबे, या दोन स्टेशनदरम्यान धावणार विशेष ट्रेन
4
RBI नं रेपो दरात कपात करताच 'या' दोन सरकारी बँकांनी कर्ज केली स्वस्त; पाहा काय आहेत नवे दर?
5
आजचे राशीभविष्य, ०६ डिसेंबर २०२५: कुटुंबात मतभेदाचे प्रसंग उद्भवतील, नवीन कामात अपयशी होण्याची शक्यता
6
रशिया भारताला अखंड तेलपुरवठा करत राहणार; आर्थिक सहकार्याचा ५ वर्षांचा आराखडा निश्चित
7
अजबच! अचानक खेळपट्टीने गिळला चेंडू आणि सामनाच करावा लागला रद्द, WBBL मध्ये नेमकं काय घडलं?   
8
आरक्षण देणाऱ्या मुख्यमंत्र्यांप्रति अनाथ कृतज्ञ होतात तेव्हा...; वर्षा निवासस्थानी पार पडला भावुक सोहळा
9
विशेष लेख: ‘आधी, नंतर आणि शेवटीही फक्त भारतीयच!’  
10
वर्षात चार वेळा ईएमआय झाला कमी!घर, कार घेणे स्वस्त; आरबीआयचा सर्वसामान्यांना दिलासा
11
मध्य रेल्वे मनी लाँड्रिंग: ‘क्लोजर रिपोर्ट’ विशेष न्यायालयाने स्वीकारला, आठ अधिकाऱ्यांचे प्रकरण काय?
12
‘नगरां’च्या निवडणुकीची २१ डिसेंबरलाच मतमोजणी; खंडपीठाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम
13
पुतीन परतले, पुढे...?
14
शाकाहारी असाल तरच तुम्हाला फ्लॅट देणार! मराठी माणसाला नाकारले घर?
15
“४० वर्षीय तरुणाला लाजवणारी कार्यक्षमता, २०२९ ला मोदीच PM असतील”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
16
शिक्षकांचे संच मान्यता निकष, टीईटी सक्तीविरोधात आंदोलन; मुंबईमध्ये शाळा बंदला संमिश्र प्रतिसाद
17
कामगार युनियनवरून ठाकरेंची शिवसेना-भाजपमध्ये राडा, वरळीत तणाव; पोलिसांचा कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज
18
दोन दिवसीय भारत दौऱ्याची सांगता, पुतिन रशियाला जाण्यासाठी रवाना; PM मोदींचे मानले विशेष आभार
19
‘मतचोरी’विरोधात काँग्रेसची रॅली; मातोश्रीवर येऊन दिले निमंत्रण, उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार?
20
सेवा-समर्पणाच्या वाटेवरच्या ध्येयनिष्ठ प्रवाशाची कहाणी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : राधानगरीचा क्रमांक ३ चा दरवाजा बंद : दुधगंगेचाही विसर्ग झाला कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 18:51 IST

पावसाचा जोर कमी झाला असून गुरुवारी दिवसभर जिल्ह्यात उघडझाप राहीली. दुपारी दीड वाजता दुधगंगेतून साडे तीन हजार क्युसेकने विसर्ग कमी करण्यात आला तर राधानगरी धरणाचा क्रमांक ३ चा दरवाजाही साडे चार वाजता बंद झाला. अद्याप नद्या तुडूंब भरल्याने २० बंधारे पाण्याखाली आहेत.

ठळक मुद्दे राधानगरीचा क्रमांक ३ चा दरवाजा बंद दुधगंगेचाही विसर्ग झाला कमी

कोल्हापूर : पावसाचा जोर कमी झाला असून गुरुवारी दिवसभर जिल्ह्यात उघडझाप राहीली. दुपारी दीड वाजता दुधगंगेतून साडे तीन हजार क्युसेकने विसर्ग कमी करण्यात आला तर राधानगरी धरणाचा क्रमांक ३ चा दरवाजाही साडे चार वाजता बंद झाला. अद्याप नद्या तुडूंब भरल्याने २० बंधारे पाण्याखाली आहेत.गेल्या आठवड्यात धुंवाधार पावसाने जिल्ह्यात महापूर आणला होता. परंतु गेल्या चार दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला असून गुरुवारी पावसाची उघडीप होती. परंतु ढगाळ वातावरणाने वातावरणामध्ये कमालीचा गारठा जाणवत होता.

धरणक्षेत्रातील पाऊस थांबल्याने राधानगरी धरणाचा क्रमांक ३ चा दरवाजा बंद झाला. येथून ४,५०० क्युसेकने होणार विर्सग कमी होऊन तो आता १६००क्युसेकने सुुुरु आहे. त्याचबरोबर दुधगंगा धरणातून पाण्याचा विसर्ग दुपारी ३,५०० क्युसेकने कमी करण्यात आला असून येथून ४,५०० क्युसेक विसर्ग सुरु आहे.

पाण्याची पातळी कमी होत असून पंचगंगेची राजाराम बंधारा येथे पाणी पातळी सायंकाळी २५ .१० इंच राहीली. धरणातील पाण्याचा विसर्ग कमी झाल्याने पाणी पातळी झपाट्याने कमी होत आहे. अद्याप २० बंधारे पाण्याखाली असून १० ग्रामीण, ३ राज्य, ५ प्रमुख जिल्हा, १७ इतर जिल्हा मार्ग वाहतुकीसाठी बंद असून पर्यायी मार्गाने वाहतुक सुरु आहे.जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात गुरुवारी सकाळी आठपर्यंत ९.०५ मि.मी. पावसाची नोंद झाली. यामध्ये हातकणंगलेत २.०० मि.मी., शिरोळमध्ये १.००, पन्हाळ्यात ८.२९ , शाहूवाडी १५.६६, राधानगरी १२.३३, गगनबावडा १८.००, करवीर ७.७२, कागल ७.१४, गडहिंग्लज ३.१४, भुदरगड ८.८०, आजरा १५.००, चंदगड ९.५० मि.मी. पाऊस पडला आहे.

टॅग्स :monsoon 2018मान्सून 2018kolhapurकोल्हापूर