शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

कोल्हापूर शहराला हद्दवाढ हवी की बदनामी?; पालकमंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री यांच्याकडे जाण्यास टाळाटाळ

By भारत चव्हाण | Updated: April 22, 2025 13:22 IST

भारत चव्हाण कोल्हापूर : एकीकडे महापालिकेची हद्दवाढ करा म्हणून संघर्ष करत असताना दुसरीकडे कोल्हापूर शहराची बदनामी करण्याचे पातक हद्दवाढ ...

भारत चव्हाणकोल्हापूर : एकीकडे महापालिकेची हद्दवाढ करा म्हणून संघर्ष करत असताना दुसरीकडे कोल्हापूर शहराची बदनामी करण्याचे पातक हद्दवाढ कृती समिती पदाधिकाऱ्यांकडून घडत आहे. हद्दवाढ करण्याचा धोरणात्मक निर्णय राज्य सरकार घेणार आहे, मात्र, कृती समितीचे पदाधिकारी राज्य सरकारचे संबंधित खात्याचे मंत्री, पालकमंत्री किंवा उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री यांच्याकडे मागणीचा आग्रह न धरता ग्रामीण भागातील के.एम.टी. बससेवा बंद करा, त्यांचा पाणीपुरवठा तोडा, अशा मागण्या करताना शहराचीही बदनामी करून मूळ प्रश्नाला बगल देऊ लागले आहेत.एखाद्या महत्त्वाच्या प्रश्नावर लढत असताना त्या प्रश्नाचा पूर्ण अभ्यास करून त्या मुद्द्यावर भांडणे अधिक महत्वाचे असते, परंतु कृती समितीचे पदाधिकारी मात्र शहराच्या हद्दवाढीचा प्रश्न भलतीकडेच न्यायला लागले आहेत. त्यामुळे महापालिकेचे अधिकारी हैराण झालेच आहेत, शिवाय ग्रामीण भागातील माजी लोकप्रतिनिधी, जनता यांच्यातील संघर्षाची दरीही त्यामुळे वाढणार आहे.हद्दवाढ झालीच पाहिजे ही मागणी लावून धरून त्यासाठी आंदोलन करण्याऐवजी हद्दवाढीला ज्या-ज्या गावांतील लोक विरोध करत आहेत, त्यांच्या गावांतील के.एम.टी.ची बससेवा बंद करा, त्या गावातील पाणीपट्टी थकबाकी सक्तीने वसुली करावी, त्यांचा पाणीपुरवठा बंद करा, अशा मागण्या कृती समितीचे पदाधिकारी करत आहेत.एकदा सोडून तीनवेळा महापालिकेच्या अधिकाऱ्यांना या दुराग्रही मागणीद्वारे वेठीस धरले. ग्रामीण भागातील के.एम.टी. बससेवा रद्द करावी तर तोटा आणखी वाढणार आहे आणि नाही रद्द केली तर कृती समितीचा ससेमिरा सोसावा लागत असल्याने दुहेरी डोकेदुखी महापालिका अधिकाऱ्यांची झाली आहे.

केएमटीला बसेल धक्काके.एम.टी. ग्रामीण भागात २१ मार्गावर बससेवा देत आहे, त्यातील एक दोन मार्गवगळता सर्व मार्ग फायद्यातील आहेत. त्या मार्गावर प्रवासी संख्या मोठी असल्याने उत्पन्न चांगले मिळत आहे. असे फायद्यातील मार्ग बंद करणे म्हणजे पायावर दगड मारून घेण्यातील प्रकार ठरणार आहे. के.एम.टी. अधिकच तोट्यात जाणार आहे. त्यामुळे अधिकारी बससेवा बंद करण्यास तयार नाहीत.

लुटूपुटूचा खेळ..हद्दवाढीचा निर्णय राज्य सरकार घेणार आहे, तरीही राज्य सरकारचे प्रतिनिधी असलेल्या पालकमंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री यांच्यापर्यंत जायला कृती समितीचा एकही पदाधिकारी तयार नाही. त्यांच्या विरोधात आंदोलन करायला तयार नाहीत. त्यातूनच कृती समितीचे आंदोलन एक लुटूपुटूचा खेळ होऊन बसले आहे. त्यामुळे या आंदोलनाला जिल्ह्यातीलच पालकमंत्री, आमदार देखील फारशी दखल घेताना दिसत नाही.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर