शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

कोल्हापूर शहराची हद्दवाढ हा संवेदनशील विषय, मंत्री चंद्रकांत पाटलांनी झटकली जबाबदारी

By भारत चव्हाण | Updated: August 30, 2022 17:25 IST

कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीला ग्रामीण जनतेतून विरोध

कोल्हापूर : कोल्हापूर शहराची हद्दवाढ हा विषय संवेदनशील असल्यामुळे शहरी आणि ग्रामीण जनतेत एकमत झाल्याशिवाय एकतर्फी निर्णय घेणे चुकीचे होईल, अशा शब्दात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपली जबाबदारी झटकली. कोल्हापूर शहर हद्दवाढ कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मंत्री पाटील यांची आज, मंगळवारी शासकीय विश्रामगृहावर भेट घेऊन हद्दवाढी विषयी चर्चा केली. त्यावेळी मंत्री पाटील यांनी या विषयावर आपले मत सांगितले.हद्दवाढ संदर्भात यापूर्वीही एकमत झाले नाही, म्हणून 42 गावांच्या प्राधिकरणाला मंजुरी देण्यात आली होती. आम्ही शहर व ग्रामीण भागाच्या विकासाचे आराखडे तयार केले होते. तोपर्यंत आमची सत्ता गेली. नंतर काहीच काम झाले नाही. त्यामुळे आता काही निर्णय घ्यायचा झाला तर दोन्ही बाजूने एकमत झाल्याशिवाय पुढे जाता येणार नाही, असे मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले.ग्रामीण भागातील लोक दूध, भाजीपाला रोखण्याचा इशारा दिला जात आहे. त्यामुळे वातावरण चिघळण्यापूर्वी टप्प्या टप्प्याने का होईना हद्दवाढ करावी, अशी विनंती आर. के. पोवार यांनी केली. शहरात आता जागा नसल्यामुळे आम्हाला हद्दवाढ पाहिजे, असे बाबा इंदुलकर यांनी सांगितले. त्यावर तुम्हाला उभा विकास करायला मिळेल, असे मंत्री पाटील म्हणाले. उभा विकास करायचा झाला तर पायाभूत सुविधावर मर्यादा आहेत. त्या लोकांना सुविधा देऊ शकत नाही याकडे इंदुलकरांनी लक्ष वेधले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरchandrakant patilचंद्रकांत पाटील