शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : पुण्याच्या दबावामुळेच सर्किट बेंच पत्रास उशीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 13:54 IST

कोल्हापूरला उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच होण्यात पुणे जिल्ह्याचा राजकीय दबावच मुख्य अडथळा ठरला आहे. त्यामुळेच ‘सर्किट बेंच कोल्हापूरला व्हावे,’ असे एका ओळीचे पत्र द्यायला मुख्यमंत्री कार्यालयाकडून नवे वायदे दिले जात आहेत.

ठळक मुद्देकोल्हापूर : पुण्याच्या दबावामुळेच सर्किट बेंच पत्रास उशीरनुसताच ताकतुंबा : आचारसंहिता लागल्यास विषय लांबणीवर

विश्वास पाटीलकोल्हापूर : कोल्हापूरला उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच होण्यात पुणे जिल्ह्याचा राजकीय दबावच मुख्य अडथळा ठरला आहे. त्यामुळेच ‘सर्किट बेंच कोल्हापूरला व्हावे,’ असे एका ओळीचे पत्र द्यायला मुख्यमंत्री कार्यालयाकडून नवे वायदे दिले जात आहेत.

मुख्य न्यायाधीश रूजू होताच दुसऱ्या दिवशी पत्र देतो, असा ‘शब्द’ देणाऱ्या सरकारने आता आणखी आठवड्याचा वायदा घेतला आहे. फेब्रुवारीत लोकसभा निवडणुकीची कधीही आचारसंहिता लागू शकते, तसे झाले तर हा विषय पुन्हा लांबणीवर पडणार आहे.‘मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात व्हावे, त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा आम्ही करून द्यायला तयार आहोत’ असा एका ओळीचा ठराव राज्य सरकारने न्यायालयास करून द्यायला हवा आहे व तोच या मागणीतला मुख्य तिढा आहे.

यापूर्वी १२ मे २०१५ ला तसा ठराव राज्य सरकारने करून दिला; परंतु तो करताना कोल्हापूरच्या मागणीची शिफारस करताना त्यास एका ओळीची ‘पुणे येथील खंडपीठ मागणीचा सकारात्मक विचार व्हावा,’ अशी शेपूट सरकारने हेतूपुरस्सर जोडली.

पुण्याचे पालकमंत्री गिरीष बापट यांनी त्यासाठी मंत्रिमंडळात आकांडतांडव केल्यावर सरकारने पुण्याचा उल्लेख केला. त्यामुळे कोल्हापूरच्या मागणीत अडचणी निर्माण झाल्या. न्यायालयास ‘फक्त कोल्हापुरात सर्किट बेंच व्हावे,’ असा ठराव राज्य सरकारकडून करून हवा आहे. कारण या दोन्ही शहरांमध्ये सर्किट बेंच व नंतर खंडपीठ करायला न्यायव्यवस्था तयार नाही. त्यामुळे कोल्हापूरचे पत्र आवश्यक आहे. त्यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीचीही गरज नाही.

मे २०१५ पासून पावणेचार वर्षे होत आली तरी हे पत्र सरकार देऊ शकलेले नाही. त्यासाठी काही ना काही अडथळे आले आहेत. मुख्य न्यायाधीश रूजू झाल्यावर दुसºया दिवशी पत्र देऊ, असे स्वत: कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर बार असोसिएशनला आश्वासन दिले होते. मुख्य न्यायाधीश नरेश पाटील रूजू होऊन सव्वा महिना उलटून गेला तरी हे पत्र मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून बाहेर पडलेले नाही.

आता सोमवारी मुख्यमंत्र्यांनी पुन्हा तेच आश्वासन दिले आहे. पुणे शहरातील सर्व आठ व पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यातील चार असे तब्बल १२ आमदार हे भाजपचे आहेत. पुण्याचा खासदारही भाजपचाच आहे त्यामुळे एवढे राजकीय बळ असल्याने त्यांच्या विरोधात जावून काही निर्णय घेणे मुख्यमंत्र्यांनाही अडचणीचे ठरत आहे.

मुख्यमंत्री सकारात्मक पण...सर्किट बेंच कोल्हापूरलाच व्हायला हवे, असे माझे व्यक्तिगत मत आहे; असे मुख्यमंत्र्यांनी सोमवारीही कोल्हापूर बार असोसिशनच्या शिष्टमंडळाला सांगितले. ते या मागणीबाबत सकारात्मक होते; परंतु राजकीय अडचण दूर सारून ते पत्र देण्याचे धाडस करणार का, हाच त्यातील कळीचा मुद्दा आहे.

‘मी पत्र देणार आहे, तुम्ही तसे हवे तर मुख्य न्यायाधीशांना सांगून त्यांनाही भेटू शकता,’ असेही मुख्यमंत्र्यांनी सुचविले आहे; परंतू पत्रच हातात नसताना नुसते मुख्य न्यायाधीशांना भेटण्यात काय अर्थ नाही. 

 

टॅग्स :Courtन्यायालयkolhapurकोल्हापूर