शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

कोल्हापूर : शिवडावमधील शाळकरी मुलाला जीवदान, ‘आपलं सीपीआर,चांगलं सीपीआर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 14:59 IST

दूचाकी अपघातामध्ये गंभीररित्या जखमी होऊन किडनीला (मुत्रपिंड) मोठी दुखापत झालेल्या जिल्हयातील शिवडाव (ता. भुदरगड) मधील शाळकरी मुलावर छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात (सीपीआर) ‘अ‍ॅब-थेरा’ या नवीन तंत्रज्ञानाच्या उपचार पद्धतीचा वापर करुन ही शस्त्रक्रिया करण्यात आली.

ठळक मुद्दे‘आपलं सीपीआर,चांगलं सीपीआरअ‍ॅब थेराद्वारे किडनीवर शस्त्रक्रिया शिवडावमधील शाळकरी मुलाला जीवदान,४० दिवसानंतर डिस्चार्ज

कोल्हापूर : दूचाकी अपघातामध्ये गंभीररित्या जखमी होऊन किडनीला (मुत्रपिंड) मोठी दुखापत झालेल्या जिल्हयातील शिवडाव (ता. भुदरगड) मधील शाळकरी मुलावर छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात (सीपीआर) ‘अ‍ॅब-थेरा’ या नवीन तंत्रज्ञानाच्या उपचार पद्धतीचा वापर करुन ही शस्त्रक्रिया करण्यात आली.

निलेश अनिल जाधव (वय १६) असे या मुलाचे नांव आहे. त्याच्या किडनीचे काम पूर्ववत सुरु झाले असून तो पूर्णपणे बरा झाला असल्याची माहिती राजर्षि छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.डॉ. रामानंद म्हणाले, शिवडाव येथे दूचाकी अपघातात निलेश जाधव हा २२ नोव्हेंबर २०१७ ला जखमी झाला होता. त्याच्या पोटाला मार बसून उजव्या किडनीला मोठी दुखापत होऊन रक्तस्त्राव झाला. त्याचा रक्तदाबही कमी झाला होता.

त्याची सोनाग्राफी केली असता किडनीभोवती रक्त जमा झाले होते. त्यामुळे त्याला प्रथम कडगांव प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आले. पण, प्रकृति गंभीर असल्याने त्याला तत्काळ १०८ नंबरच्या रुग्णवाहिकेमधून सीपीआरमध्ये आणले.

सुमारे चार तास ही शस्त्रक्रिया सुरु होती. त्यासाठी चार रक्ताच्या बाटल्या लागल्या. ही शस्त्रक्रिया जोखमीची होती. रक्तपोटाच्या मागच्या बाजुला पसरल्याने पोटाची क्षमता कमी झाली होती.

ही किडनी काढून टाकण्यात आली. परंतु, मोठ्या प्रमाणात रक्त गोठवून राहिल्याने पोटाचा आकार व क्षमता कमी झाली होती. शस्त्रक्रियेनंतर पोट टाके घेऊन बंद करणे शक्य नव्हते.म्हणून ‘अ‍ॅब-थेरा’ (पोट बंद न करता) या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन एका कृत्रिम आवरणाने झाकण्यात आले. तसेच छातीमध्ये नळी टाकून साठलेले रक्त काढले.निलेशच्या शस्त्रक्रियेनंतर त्याला तीन दिवस व्हेंटिलेटरवर ठेवले. यानंतर दुसरी शस्त्रक्रिया करुन कृत्रिम आवरण काढून टाकून पोट पूर्णपणे बंद केले. दोन दिवसानंतर श्वसनाची नळी व १४ व्या दिवशी छातीची नळी काढली व त्याचे खाणे सुरु झाले आणि तो चालू-फिरु लागला. ४० दिवसानंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आला.शल्यचिकित्साशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ.वसंतराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. कौस्तुभ मेंच, डॉ.मधूर जोशी, डॉ. नीता भुरट यांनी शस्त्रक्रिया केली. भूलतज्ञ्ज्ञ डॉ. उल्हास मिसाळ, डॉ. दिपाली, डॉ.राहूल पाटील, डॉ.राऊत यांचे सहकार्य मिळाले.यावेळी वैद्यकिय अधीक्षक डॉ. शिशिर मिरगुंडे, अभ्यागत समितीचे सदस्य सुनील करंबे उपस्थित होते.यााबाबत निलेशचे मामा उत्तम भिकाजी यादव म्हणाले, निलेशची आई शेतकाम तर वडिल गवंडी काम करतात. तो तांबाळे हायस्कुल नववीमध्ये शिक्षण घेत आहे. डॉक्टरांनी त्याच्यावर चांगले उपचार केले. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरhospitalहॉस्पिटल