शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
3
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
5
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
6
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
7
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
9
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
10
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
11
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
12
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
13
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
14
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
15
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
17
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
18
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
19
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
20
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!

कोल्हापूर : ‘मुद्रा’च्या कर्जदारांची शहानिशा करणार : चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 19:51 IST

अनेक बँकांनी मुद्रा योजनेतून दिलेल्या कर्जांची सांगितलेली आकडेवारी पाहिल्यास, जिल्ह्याचा विकासदर आणि उद्योगही वाढले असते; पण तसे होताना दिसत नाही. त्यामुळे या कर्जदारांची शहानिशा आपण करणार आहोत, अशी स्पष्ट भूमिका गुरुवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. तसेच अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळातून ‘मुद्रा’ योजनेंतर्गत यंदा एक हजार जणांना कर्ज देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

ठळक मुद्दे‘मुद्रा’च्या कर्जदारांची शहानिशा करणार : चंद्रकांत पाटीलबॅँक अधिकारी धारेवर : ‘अण्णासाहेब पाटील’द्वारे एक हजार जणांना कर्ज

कोल्हापूर : अनेक बँकांनी मुद्रा योजनेतून दिलेल्या कर्जांची सांगितलेली आकडेवारी पाहिल्यास, जिल्ह्याचा विकासदर आणि उद्योगही वाढले असते; पण तसे होताना दिसत नाही. त्यामुळे या कर्जदारांची शहानिशा आपण करणार आहोत, अशी स्पष्ट भूमिका गुरुवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. तसेच अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळातून ‘मुद्रा’ योजनेंतर्गत यंदा एक हजार जणांना कर्ज देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.जिल्हाधिकारी कार्यालयात मुद्रा बँक योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठीची समन्वय समिती व बॅँक अधिकाºयांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक राहुल माने, ‘नाबार्ड’चे नंदू नाईक, जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक संचालक जे. बी. करीम, आदी प्रमुख उपस्थित होते.मंत्री पाटील म्हणाले, ज्यांना काहीही मिळत नाही, अशांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही योजना आखली; परंतु आम्हांला आदेश नाही, अमुक कागद नाहीत, असे सांगून कर्जप्रकरणे नाकारली जातात, असे सांगत ज्या कारणांनी बँका कर्ज नाकारतात, त्या कारणांचा पाढाच पालकमंत्र्यांनी बँक अधिकाऱ्यांसमोर वाचला. या संदर्भात १५ जूनला बैठक घेण्यात येईल. यामध्ये प्रत्येक बँकेने या विषयाचा १ एप्रिल ते १५ मेपर्यंतचा आढावा सादर करावा, असे आदेशही त्यांनी दिले.‘अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळा’च्या माध्यमातून मुद्रा योजनेतून घेतलेल्या १० लाख रुपयांपर्यंतच्या संपूर्ण कर्जाच्या व्याजाची हमी शासन देते. असे असतानाही बँकांना आनुषंगिक तारण व जामिनाची आवश्यकता का भासते, अशी विचारणा करून या वर्र्षी या महामंडळाच्या माध्यमातून मुद्रा योजनेअंतर्गत किमान एक हजार तरुण-तरुणींना उद्योग-व्यवसायांसाठी कर्ज उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.

 

 

टॅग्स :Chandrakant Dada Bachu Patilचंद्रकांतदादा बच्चू पाटीलkolhapurकोल्हापूरbankबँक