शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात गुऱ्हाळाच्या चिमण्या अद्याप थंडच, परतीच्या पावसाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 11:45 IST

महापूर आणि आता परतीच्या पावसाच्या तडाख्याने कोल्हापूर जिल्ह्यातील गुऱ्हाळघरांच्या चिमण्या अद्याप थंडच आहेत. महापुरात जळणाच्या गंजीसह साहित्य वाहून गेले, चिमण्यांची पडझड झाल्याने हा उद्योग पुरता अडचणीत आला असून, किमान महिनाभर हंगाम लांबणीवर पडणार आहे. या सर्वांचा परिणाम कोल्हापूर बाजार समितीतील गुळाच्या आवकेवर झाला असून, गतवर्षीपेक्षा दोन लाख हजार ६०५ गूळरव्यांनी आवक घटली आहे.

ठळक मुद्देकोल्हापुरात गुऱ्हाळाच्या चिमण्या अद्याप थंडच, परतीच्या पावसाचा फटका गतवर्षीपेक्षा दोन लाख गूळरव्यांची आवक कमी : हंगाम महिनाभर लांबणीवर

राजाराम लोंढेकोल्हापूर : महापूर आणि आता परतीच्या पावसाच्या तडाख्याने कोल्हापूर जिल्ह्यातील गुऱ्हाळघरांच्या चिमण्या अद्याप थंडच आहेत. महापुरात जळणाच्या गंजीसह साहित्य वाहून गेले, चिमण्यांची पडझड झाल्याने हा उद्योग पुरता अडचणीत आला असून, किमान महिनाभर हंगाम लांबणीवर पडणार आहे. या सर्वांचा परिणाम कोल्हापूर बाजार समितीतील गुळाच्या आवकेवर झाला असून, गतवर्षीपेक्षा दोन लाख हजार ६०५ गूळरव्यांनी आवक घटली आहे.‘कोल्हापुरी गुळा’ने सातासमुद्रापार भुरळ पाडली आहे. येथील माती आणि पाण्यातच कसदारपणा असल्याने गुळाला वेगळीच चव आहे. कोल्हापुरात उत्पादित होणाऱ्या गुळापैकी ९५ टक्के गूळ हा गुजरात बाजारपेठेत जातो; तर उर्वरित गूळ निर्यात होतो.

येथे एक किलोपासून ३० किलोपर्यंतचे रवे, गुळाचे मोदक, वड्या अशा विविध प्रकारांत गुळाचे उत्पादन काढणारे शेतकरी आहेत. त्याचबरोबर सेंद्रिय गुळाची निर्मितीही मोठ्या प्रमाणात केली जाते. साधारणत: ६०० गुऱ्हाळघरांच्या माध्यमातून प्रत्येक हंगामात २५ लाख गूळरव्यांचे उत्पादन येथे होते.यंदा महापुरामुळे नदीकाठावरील ऊस संपला आहे. उर्वरित उसाला अतिवृष्टीचा फटका बसल्याने, वाढ खुंटल्याने उसाचे उत्पादन घटणार आहे. त्यातच महापुरात गुऱ्हाळघरांचे मोठे नुकसान झाले. गुऱ्हाळाच्या चिमण्यांची पडझड झाली. साहित्यासह जळणाच्या गंज्या वाहून गेल्या. त्यामुळे हंगाम कसा सुरू करायचा, असा प्रश्न गुऱ्हाळमालकांसमोर होता. त्यातून हंगाम सुरू करण्यासाठी धडपड सुरू असतानाच परतीच्या पावसाने आणखी पेच निर्माण केला.त्यामुळे सध्या कशीबशी २५ गुऱ्हाळघरांची धुराडी पेटली; पण तीही दबकतच सुरू आहेत. कोल्हापूर बाजार समितीत नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सरासरी तीन लाख गूळरव्यांची आवक होते.

गतवर्षी ३ नोव्हेंबरपर्यंत तीन लाख ५७ हजार ३६० गूळरव्यांची आवक झाली होती. यंदा केवळ एक लाख ४८ हजार ७५५ म्हणजे गतवर्षीपेक्षा दोन लाख आठ हजार ६०५ रव्यांनी आवक कमी झाली आहे.गुजरातमध्ये गुळाची चणचण भासणार!गुजरातमध्ये नवीन हंगाम सुरू होईपर्यंत हा गूळ कोल्ड स्टोअरेजला ठेवून विक्री केला जातो. आॅक्टोबरला नवीन गूळ येतो; पण यंदा महिनाभर हंगाम लांबल्याने कोल्ड स्टोअरेजमधील गूळ संपला आहे. त्यामुळे आगामी काळात गुजरातमध्ये गुळाची चणचण भासण्याची शक्यता व्यापाऱ्यांतून व्यक्त होत आहे.सांगलीतील आवक मंदावली!सांगलीतही गुळाचे उत्पादन होते; पण तिथे अगोदर महापुराने आणि आता परतीच्या पावसाने गुऱ्हाळघरांचे नुकसान झाल्याने सांगली बाजार समितीतील आवक मंदावली आहे. येथे कर्नाटकातून मोठ्या प्रमाणात गूळ येतो.मागील पाच वर्षांतील कोल्हापुरातील गुळाची आवक व सरासरी प्रतिक्विंटलचा दर असाएप्रिल ते ३ नोव्हेंबर    आवक           सरासरी दर२०१५                        १,८९,४९०          २७००२०१६                        २,२२,८२०         ३४००२०१७                        ३,००,३०७         ३७००२०१८                        ३,५७,३६०         ३२००२०१९                        १,४८,७५५         ३४००

साधारणत: २५ सप्टेंबरपासून गुळाचा हंगाम सुरू होतो; पण यंदा अद्याप गती आलेली नाही. आवक मंदावली आणि गुजरातमध्ये मागणी वाढली आहे. मागील वर्षापेक्षा सध्या दरात प्रतिक्विंटल ६०० रुपयांची वाढ दिसत आहे.- बाळासाहेब मनाडे,गूळ अडत दुकानदार

 

टॅग्स :Rainपाऊसkolhapurकोल्हापूर