शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर हद्दवाढ : आधी शहराचा विकास करा, मग हद्दवाढीवर बोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2022 11:46 IST

दोन मंत्री असूनही कोल्हापुरात आयटी पार्क झाला नाही. येथील बेरोजगारांना नोकरीसाठी पुण्यात जावे लागते. यामुळे आधी आयटी पार्क विकसित करा, मग हद्दवाढीचा विचार करू

कळंबा : हद्दवाढ समर्थक आणि विरोधकांतील परस्पर विरोधी विचार, आधी शहराचा विकास करा, मग हद्दवाढीवर बोला, अशी सरपंचाची भूमिका, हद्दवाढ विरोधातील घोषणा आणि फलकबाजी अशा गोंधळाच्या वातावरणात रविवारी हद्दवाढ कृती समितीतर्फे शहरालगत असलेल्या कळंबा येथे आयोजित समन्वय बैठक पार पडली. यावेळी कृती समितीतर्फे हद्दवाढ फायद्याचीच आहे, असे सांगितले. येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या सभागृहात बैठक झाली. यावेळी ग्रामस्थांचा हद्दवाढीला तीव्र विरोध केल्याने संवादाऐवजी विसंवाद वाढला. शेवटी बैठक गुंडाळली.

बैठकीत कृती समितीचे निमंत्रक ॲड. बाबा इंदूलकर यांचे भाषण सुरू असताना माजी सरपंच विश्वास गुरव यांनी हद्दवाढ विरोधातील मत व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी दोन मंत्री असूनही कोल्हापुरात आयटी पार्क झाला नाही. येथील बेरोजगारांना नोकरीसाठी पुण्यात जावे लागते. यामुळे आधी आयटी पार्क विकसित करा, मग हद्दवाढीचा विचार करू असे गुरव यांनी सांगितले. यावेळी माजी नगरसेवक सत्यजित कदम यांनी हस्तक्षेप करीत प्रत्येकाला मत व्यक्त करण्याची संधी दिली जाईल, असे स्पष्ट केले.पण गुरव आक्रमकपणे आपली भूमिका मांडत राहिले. त्यावेळी इंदूूलकर, आर. के. पोवार यांनी सरपंच बोलल्यानंतर तुम्ही बोला, मध्येच बोलू नका, असे सूचित केले. तरीही गुरव ऐकण्याच्या मानसिकतेत नसल्याने ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ शिंदे, संग्राम चौगुले आदींनी त्यांना बैठकीतून बाहेर घेऊन गेले.

माजी नगरसेवक अनिल कदम बैठकीत शांतता राखण्याचे आवाहन करीत होते. यामध्येच सरपंच भोगम यांनी हद्दवाढीच्या विरोधात भाषण केले. ते हद्दवाढ विरोधातील ग्रामसभेचे सर्व ठराव पोवार यांना देण्यासाठी गेले. पण पोवार यांनी ते ठराव न घेता जिल्हाधिकाऱ्यांना देण्याचा सल्ला दिला. पोवार यांनी ठराव न घेतल्याने सरपंच भोगम, ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी आक्रमक झाले. ते बैठकीतून बाहेर पडत हद्दवाढ विरोधी घोषणा दिल्या. बैठकच गुंडाळल्याने हद्दवाढ कृती समितीचे पदाधिकारीही निघून गेले.बैठकीस हद्दवाढ कृती समितीचे पदाधिकारी माजी महापौर सुनील कदम, बाबा पार्टे, माजी नगरसेवक महेश उत्तुरे, विजय जाधव, सुभाष देसाई, कुलदीप गायकवाड, शुभांगी साखरे, अलका सणगर, किशोर घाटगे, उपसरपंच अरुण टोपकर, माजी पंचायत समिती सदस्य रंगराव तिवले, बाजीराव पोवार, राजू तिवले, सर्जेराव साळुंखे, दिलीप पाटील आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

पेढा गोड झालाच नाही

पोवार यांनी बैठकीच्या सुरुवातीला सरपंच भोगम यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत पेढा भरवला. बैठकीतून गोड निर्णय व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केल; पण बैठकीत गोंधळ झाल्याने पेढा गोड झालाच नाही.

महापालिकेच्या सेवा, सुविधा घ्यायच्या आणि हद्दवाढीला विरोध करायचे हे चुकीचे धोरण आहे. शहर आणि लगतच्या गावांचा सर्वांगीण विकास होणे आवश्यक आहे. गावांनी हद्दवाढीत समाविष्ट व्हावे. - आर. के. पोवार, हद्दवाढ कृती समितीचे निमंत्रक 

हद्दवाढ न झाल्याने शहराचा अपेक्षित विकास झाला नाही. हद्दवाढ झाल्यास ग्रामीण भागांचाही समतोल विकास होणार आहे. विरोधाला विरोध न करता ग्रामस्थांनी हद्दवाढीचे फायदे समजून घ्यावेत. बैठकीत काही ग्रामस्थांचा विरोध झाला तरी सकारात्मक चर्चा झाली. - ॲड. बाबा इंदूलकर, कॉमन मॅनशहराच्या उपनगरांचा विकास झालेला नाही. याउलट कळंबा गावास विविध योजनेतून निधी मिळत आहे. त्यातून विकास केला जात आहे. म्हणून हद्दवाढीस ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे. -सागर भोगम, सरपंच, कळंबा

टॅग्स :kolhapurकोल्हापूर