शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

कोल्हापूर : चांगल्या गोष्टींची ओळख पुस्तकांमधून : उमेशचंद्र मोरे, ‘पुस्तकांचा गाव’ पुस्तकाचे प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 17:54 IST

कोल्हापूर : चांगल्या गोष्टींची ओळख आपणास पुस्तकांमधूनच होते. माणसाला माणूस म्हणून घडविण्याची ताकद पुस्तकांमध्ये आहे. त्यामुळे ‘ पुस्तकांचा गाव’ या पुस्तकाची संकल्पना कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाचे सचिव उमेशचंद्र मोरे यांनी केले.शाहू स्मारक भवन येथे वाचनकट्टा बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने आयोजित ‘पुस्तकांचा गाव’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत ...

ठळक मुद्देवाचनकट्टा बहुउद्देशीय संस्थेतर्फे ‘पुस्तकांचा गाव’ पुस्तकाचे प्रकाशनप्रकाशन सोहळ्यानिमित्त आयोजित बालसभेत बालचमूंची उपस्थिती

कोल्हापूर : चांगल्या गोष्टींची ओळख आपणास पुस्तकांमधूनच होते. माणसाला माणूस म्हणून घडविण्याची ताकद पुस्तकांमध्ये आहे. त्यामुळे ‘पुस्तकांचा गाव’ या पुस्तकाची संकल्पना कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाचे सचिव उमेशचंद्र मोरे यांनी केले.शाहू स्मारक भवन येथे वाचनकट्टा बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने आयोजित ‘पुस्तकांचा गाव’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसचे संचालक विनय पाटील होते.मोरे म्हणाले, वयाच्या दहाव्या वर्षी मुले खुनासारखे गुन्हे करीत आहेत. कायद्याचे परिणाम त्यांना माहिती नसतात. यासाठी स्त्रीभ्रूण हत्या, आरटीओ नियम, रॅगिंग कायदा, वाहतुकीचे नियम न पाळल्यास काय होऊ शकते याची माहिती होण्यासाठी ‘विधि वाचनकट्टा’ सुरूकरा, यासाठी जिल्हा विधि सेवा प्राधिकरणतर्फे सहकार्य केले जाईल, असे त्यांनी सांगितले.याप्रसंगी श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसचे संचालक विनय पाटील, महानगरपालिकेचे प्रशासन अधिकारी विश्वास सुतार यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नलगे, न्यू कॉलेजचे उपप्राचार्य टी. के. सलगर, दिनेश प्रभू, डॉ. शशिकांत पाटील, सामाजिक कार्यकर्ते एस. वाय. कदम, वनिता कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी पुस्तकाचे लेखक युवराज कदम यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. वाचनकट्ट्याच्या कार्यकारी सदस्या भाग्यश्री शिंदे यांनी आभार मानले, तर वैदेही जोशी यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह शालेय विद्यार्थी उपस्थित होते.

बालचमूंची बालसभाडोंबाऱ्यांचा खेळ करणारी चिंधी, टागोरांच्या कथा, विनूची आई, वीरांच्या कथा, गुणवान सिक्रेट अशा छोट्या कथांनी मनावर व विचारांवर संस्कार केल्याचे विवेचन शालेय विद्यार्थ्यांनी व्यक्त केले. पुस्तक प्रकाशन सोहळ्यानिमित्त आयोजित बालसभेत गायत्री पाटील, श्रृती राऊत, विराज तलवार, साक्षी मालेकर, अन्शुल टेंबे, मिरासाहेब जमादार, संध्या काटकर, आदी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरliteratureसाहित्य