शहरं
Join us  
Trending Stories
1
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
2
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
3
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
4
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
5
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
6
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
7
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
8
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
9
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
10
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
11
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
12
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
13
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
14
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
15
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
16
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
17
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
18
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
19
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
20
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."

कोल्हापूर : चांगल्या गोष्टींची ओळख पुस्तकांमधून : उमेशचंद्र मोरे, ‘पुस्तकांचा गाव’ पुस्तकाचे प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 17:54 IST

कोल्हापूर : चांगल्या गोष्टींची ओळख आपणास पुस्तकांमधूनच होते. माणसाला माणूस म्हणून घडविण्याची ताकद पुस्तकांमध्ये आहे. त्यामुळे ‘ पुस्तकांचा गाव’ या पुस्तकाची संकल्पना कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाचे सचिव उमेशचंद्र मोरे यांनी केले.शाहू स्मारक भवन येथे वाचनकट्टा बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने आयोजित ‘पुस्तकांचा गाव’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत ...

ठळक मुद्देवाचनकट्टा बहुउद्देशीय संस्थेतर्फे ‘पुस्तकांचा गाव’ पुस्तकाचे प्रकाशनप्रकाशन सोहळ्यानिमित्त आयोजित बालसभेत बालचमूंची उपस्थिती

कोल्हापूर : चांगल्या गोष्टींची ओळख आपणास पुस्तकांमधूनच होते. माणसाला माणूस म्हणून घडविण्याची ताकद पुस्तकांमध्ये आहे. त्यामुळे ‘पुस्तकांचा गाव’ या पुस्तकाची संकल्पना कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाचे सचिव उमेशचंद्र मोरे यांनी केले.शाहू स्मारक भवन येथे वाचनकट्टा बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने आयोजित ‘पुस्तकांचा गाव’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसचे संचालक विनय पाटील होते.मोरे म्हणाले, वयाच्या दहाव्या वर्षी मुले खुनासारखे गुन्हे करीत आहेत. कायद्याचे परिणाम त्यांना माहिती नसतात. यासाठी स्त्रीभ्रूण हत्या, आरटीओ नियम, रॅगिंग कायदा, वाहतुकीचे नियम न पाळल्यास काय होऊ शकते याची माहिती होण्यासाठी ‘विधि वाचनकट्टा’ सुरूकरा, यासाठी जिल्हा विधि सेवा प्राधिकरणतर्फे सहकार्य केले जाईल, असे त्यांनी सांगितले.याप्रसंगी श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसचे संचालक विनय पाटील, महानगरपालिकेचे प्रशासन अधिकारी विश्वास सुतार यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नलगे, न्यू कॉलेजचे उपप्राचार्य टी. के. सलगर, दिनेश प्रभू, डॉ. शशिकांत पाटील, सामाजिक कार्यकर्ते एस. वाय. कदम, वनिता कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी पुस्तकाचे लेखक युवराज कदम यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. वाचनकट्ट्याच्या कार्यकारी सदस्या भाग्यश्री शिंदे यांनी आभार मानले, तर वैदेही जोशी यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह शालेय विद्यार्थी उपस्थित होते.

बालचमूंची बालसभाडोंबाऱ्यांचा खेळ करणारी चिंधी, टागोरांच्या कथा, विनूची आई, वीरांच्या कथा, गुणवान सिक्रेट अशा छोट्या कथांनी मनावर व विचारांवर संस्कार केल्याचे विवेचन शालेय विद्यार्थ्यांनी व्यक्त केले. पुस्तक प्रकाशन सोहळ्यानिमित्त आयोजित बालसभेत गायत्री पाटील, श्रृती राऊत, विराज तलवार, साक्षी मालेकर, अन्शुल टेंबे, मिरासाहेब जमादार, संध्या काटकर, आदी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरliteratureसाहित्य