शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
2
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
3
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
4
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
5
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
6
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
7
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
8
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
9
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
10
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
11
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
12
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
13
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
14
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
15
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
16
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
17
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
18
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
19
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
20
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !

कोल्हापूर : चांगल्या गोष्टींची ओळख पुस्तकांमधून : उमेशचंद्र मोरे, ‘पुस्तकांचा गाव’ पुस्तकाचे प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 17:54 IST

कोल्हापूर : चांगल्या गोष्टींची ओळख आपणास पुस्तकांमधूनच होते. माणसाला माणूस म्हणून घडविण्याची ताकद पुस्तकांमध्ये आहे. त्यामुळे ‘ पुस्तकांचा गाव’ या पुस्तकाची संकल्पना कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाचे सचिव उमेशचंद्र मोरे यांनी केले.शाहू स्मारक भवन येथे वाचनकट्टा बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने आयोजित ‘पुस्तकांचा गाव’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत ...

ठळक मुद्देवाचनकट्टा बहुउद्देशीय संस्थेतर्फे ‘पुस्तकांचा गाव’ पुस्तकाचे प्रकाशनप्रकाशन सोहळ्यानिमित्त आयोजित बालसभेत बालचमूंची उपस्थिती

कोल्हापूर : चांगल्या गोष्टींची ओळख आपणास पुस्तकांमधूनच होते. माणसाला माणूस म्हणून घडविण्याची ताकद पुस्तकांमध्ये आहे. त्यामुळे ‘पुस्तकांचा गाव’ या पुस्तकाची संकल्पना कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाचे सचिव उमेशचंद्र मोरे यांनी केले.शाहू स्मारक भवन येथे वाचनकट्टा बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने आयोजित ‘पुस्तकांचा गाव’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसचे संचालक विनय पाटील होते.मोरे म्हणाले, वयाच्या दहाव्या वर्षी मुले खुनासारखे गुन्हे करीत आहेत. कायद्याचे परिणाम त्यांना माहिती नसतात. यासाठी स्त्रीभ्रूण हत्या, आरटीओ नियम, रॅगिंग कायदा, वाहतुकीचे नियम न पाळल्यास काय होऊ शकते याची माहिती होण्यासाठी ‘विधि वाचनकट्टा’ सुरूकरा, यासाठी जिल्हा विधि सेवा प्राधिकरणतर्फे सहकार्य केले जाईल, असे त्यांनी सांगितले.याप्रसंगी श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसचे संचालक विनय पाटील, महानगरपालिकेचे प्रशासन अधिकारी विश्वास सुतार यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नलगे, न्यू कॉलेजचे उपप्राचार्य टी. के. सलगर, दिनेश प्रभू, डॉ. शशिकांत पाटील, सामाजिक कार्यकर्ते एस. वाय. कदम, वनिता कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी पुस्तकाचे लेखक युवराज कदम यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. वाचनकट्ट्याच्या कार्यकारी सदस्या भाग्यश्री शिंदे यांनी आभार मानले, तर वैदेही जोशी यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह शालेय विद्यार्थी उपस्थित होते.

बालचमूंची बालसभाडोंबाऱ्यांचा खेळ करणारी चिंधी, टागोरांच्या कथा, विनूची आई, वीरांच्या कथा, गुणवान सिक्रेट अशा छोट्या कथांनी मनावर व विचारांवर संस्कार केल्याचे विवेचन शालेय विद्यार्थ्यांनी व्यक्त केले. पुस्तक प्रकाशन सोहळ्यानिमित्त आयोजित बालसभेत गायत्री पाटील, श्रृती राऊत, विराज तलवार, साक्षी मालेकर, अन्शुल टेंबे, मिरासाहेब जमादार, संध्या काटकर, आदी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरliteratureसाहित्य