शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
2
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
3
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
5
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
6
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
7
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
8
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
9
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
10
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
11
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
12
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
13
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
14
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
15
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
16
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
17
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
18
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
19
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
20
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष

कोल्हापूर : माझ्या प्रयत्नामुळेच ‘आंबेओहोळ’ ९० टक्के पूर्णत्वास : हसन मुश्रीफ यांचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2018 12:25 IST

कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस आघाडी सरकारच्या काळातच ‘आंबेओहोळ’ प्रकल्पाचे ९० टक्के काम पूर्ण झाले. त्यानंतर सत्तेत आलेल्या भाजप-शिवसेना युती सरकारच्या नाकर्तेपणामुळेच हा प्रकल्प रखडला. आता दुसऱ्यांदा सुधारित मान्यता मिळाली आहे, पण त्याचे राजकीय श्रेय घेण्याची समरजितसिंह घाटगे यांची धडपड सुरू असल्याची टीका आमदार हसन मुश्रीफ यांनी केली.

ठळक मुद्देमाझ्या प्रयत्नामुळेच ‘आंबेओहोळ’ ९० टक्के पूर्णत्वास : मुश्रीफ यांचा दावासमरजित यांची श्रेयासाठी धडपड : हसन मुश्रीफ

कोल्हापूर : कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस आघाडी सरकारच्या काळातच ‘आंबेओहोळ’ प्रकल्पाचे ९० टक्के काम पूर्ण झाले. त्यानंतर सत्तेत आलेल्या भाजप-शिवसेना युती सरकारच्या नाकर्तेपणामुळेच हा प्रकल्प रखडला. आता दुसऱ्यांदा सुधारित मान्यता मिळाली आहे, पण त्याचे राजकीय श्रेय घेण्याची समरजितसिंह घाटगे यांची धडपड सुरू असल्याची टीका आमदार हसन मुश्रीफ यांनी केली.‘चिकोत्रा’ प्रकल्प आपल्यामुळेच पूर्ण झाला असून, ‘नागनवाडी’ प्रकल्पाचे ७० टक्के काम आपल्या कारकिर्दीतच झाले आहे. २९ कोटींच्या ‘आंबेओहोळ’ प्रकल्पाला १९९८ मध्ये मान्यता मिळाली. त्यानंतर २०१० मध्ये सुधारित ११४ कोटींच्या प्रकल्पाला मान्यता मिळवून दिली.

आता दुसऱ्यांदा २२७ कोटींची सुधारित मान्यता मिळाली आहे. या प्रकल्पाचे ९० टक्के काम आपणच पूर्ण केले. उर्वरित १० ते १५ टक्के कामासाठी शासनाने प्रचंड उदासीनता दाखविल्यामुळे हा प्रकल्प रखडला. या प्रकल्पासाठी ३५८ हेक्टर जमीन पुनर्वसनासाठी लागत होती, त्यापैकी २४७ हेक्टर जमीन पुनर्वसनासाठी आवश्यक असून, ८१ हेक्टर जमिनीचे वाटप केले आहे. त्याचबरोबर हेक्टरी ३६ लाख रुपये पॅकेजचा प्रस्तावही शासनाकडे पाठविला आहे.

प्रकल्पग्रस्तांना जमीन दिल्याशिवाय ते धरणाची घळभरणी करू देत नव्हते. जमिनीऐवजी पॅकेजचा प्रस्ताव चार वर्षे शासन दरबारी धूळखात पडला आहे. त्यांना जमिनी अथवा त्याचा मोबदला दिल्याशिवाय धरणाचे काम सुरू होणे अवघड आहे. याबाबत अनेक बैठका घेतल्या, पण शासनाचे धोरण पश्चिम महाराष्ट्रात एकही थेंब पाणी न अडवण्याचे आहे. दुसऱ्या बाजूला संपूर्ण निधी विदर्भाकडे वळवला आहे.

‘आंबेओहोळ’ मुळे आजरा व गडहिंग्लज तालुक्यातील ३९२५ हेक्टर जमिनी सिंचनाखाली येणार आहे. आगामी हिवाळी अधिवेशनात या प्रकल्पासह ‘नागनवाडी’, ‘उचंगी’ प्रकल्पासाठी आंदोलन करणार आहे. समरजितसिंह घाटगे यांची राजकीय श्रेयासाठी धडपड सुरू असून, प्रकल्पाचे काम कोणामुळे पूर्णत्वास गेले याची जाणीव येथील जनतेला असल्याचे आमदार मुश्रीफ यांनी पत्रकात म्हटले आहे.भाजप सरकारकडून कोल्हापूरवर अन्याय‘कृष्णा’ लवादाप्रमाणे आघाडी सरकारच्या काळात कोल्हापूर जिल्ह्याच्या वाट्याला आलेल्या पाण्यापैकी केवळ १२ टीएमसी पाणी अडवण्याचे काम राहिले होते. त्यात ‘आंबेओहोळ’, ‘नागनवाडी’, ‘सर्फनाला’, ‘उचंगी’, ‘धामणी’ हे प्रकल्प त्यावेळी ज्या परिस्थितीत होते, त्याच परिस्थितीत आजही आहेत. भाजपने कोल्हापूरवर अन्याय केल्याचा आरोप मुश्रीफ यांनी केला आहे. 

टॅग्स :Hassan Mianlal Mushrifहसन मियांलाल मुश्रीफkolhapurकोल्हापूर