शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
4
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
5
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
6
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
7
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
8
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
9
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
10
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
11
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
12
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
13
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
14
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
15
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
16
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
17
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
18
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
19
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
20
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?

कोल्हापूर : माझ्या प्रयत्नामुळेच ‘आंबेओहोळ’ ९० टक्के पूर्णत्वास : हसन मुश्रीफ यांचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2018 12:25 IST

कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस आघाडी सरकारच्या काळातच ‘आंबेओहोळ’ प्रकल्पाचे ९० टक्के काम पूर्ण झाले. त्यानंतर सत्तेत आलेल्या भाजप-शिवसेना युती सरकारच्या नाकर्तेपणामुळेच हा प्रकल्प रखडला. आता दुसऱ्यांदा सुधारित मान्यता मिळाली आहे, पण त्याचे राजकीय श्रेय घेण्याची समरजितसिंह घाटगे यांची धडपड सुरू असल्याची टीका आमदार हसन मुश्रीफ यांनी केली.

ठळक मुद्देमाझ्या प्रयत्नामुळेच ‘आंबेओहोळ’ ९० टक्के पूर्णत्वास : मुश्रीफ यांचा दावासमरजित यांची श्रेयासाठी धडपड : हसन मुश्रीफ

कोल्हापूर : कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस आघाडी सरकारच्या काळातच ‘आंबेओहोळ’ प्रकल्पाचे ९० टक्के काम पूर्ण झाले. त्यानंतर सत्तेत आलेल्या भाजप-शिवसेना युती सरकारच्या नाकर्तेपणामुळेच हा प्रकल्प रखडला. आता दुसऱ्यांदा सुधारित मान्यता मिळाली आहे, पण त्याचे राजकीय श्रेय घेण्याची समरजितसिंह घाटगे यांची धडपड सुरू असल्याची टीका आमदार हसन मुश्रीफ यांनी केली.‘चिकोत्रा’ प्रकल्प आपल्यामुळेच पूर्ण झाला असून, ‘नागनवाडी’ प्रकल्पाचे ७० टक्के काम आपल्या कारकिर्दीतच झाले आहे. २९ कोटींच्या ‘आंबेओहोळ’ प्रकल्पाला १९९८ मध्ये मान्यता मिळाली. त्यानंतर २०१० मध्ये सुधारित ११४ कोटींच्या प्रकल्पाला मान्यता मिळवून दिली.

आता दुसऱ्यांदा २२७ कोटींची सुधारित मान्यता मिळाली आहे. या प्रकल्पाचे ९० टक्के काम आपणच पूर्ण केले. उर्वरित १० ते १५ टक्के कामासाठी शासनाने प्रचंड उदासीनता दाखविल्यामुळे हा प्रकल्प रखडला. या प्रकल्पासाठी ३५८ हेक्टर जमीन पुनर्वसनासाठी लागत होती, त्यापैकी २४७ हेक्टर जमीन पुनर्वसनासाठी आवश्यक असून, ८१ हेक्टर जमिनीचे वाटप केले आहे. त्याचबरोबर हेक्टरी ३६ लाख रुपये पॅकेजचा प्रस्तावही शासनाकडे पाठविला आहे.

प्रकल्पग्रस्तांना जमीन दिल्याशिवाय ते धरणाची घळभरणी करू देत नव्हते. जमिनीऐवजी पॅकेजचा प्रस्ताव चार वर्षे शासन दरबारी धूळखात पडला आहे. त्यांना जमिनी अथवा त्याचा मोबदला दिल्याशिवाय धरणाचे काम सुरू होणे अवघड आहे. याबाबत अनेक बैठका घेतल्या, पण शासनाचे धोरण पश्चिम महाराष्ट्रात एकही थेंब पाणी न अडवण्याचे आहे. दुसऱ्या बाजूला संपूर्ण निधी विदर्भाकडे वळवला आहे.

‘आंबेओहोळ’ मुळे आजरा व गडहिंग्लज तालुक्यातील ३९२५ हेक्टर जमिनी सिंचनाखाली येणार आहे. आगामी हिवाळी अधिवेशनात या प्रकल्पासह ‘नागनवाडी’, ‘उचंगी’ प्रकल्पासाठी आंदोलन करणार आहे. समरजितसिंह घाटगे यांची राजकीय श्रेयासाठी धडपड सुरू असून, प्रकल्पाचे काम कोणामुळे पूर्णत्वास गेले याची जाणीव येथील जनतेला असल्याचे आमदार मुश्रीफ यांनी पत्रकात म्हटले आहे.भाजप सरकारकडून कोल्हापूरवर अन्याय‘कृष्णा’ लवादाप्रमाणे आघाडी सरकारच्या काळात कोल्हापूर जिल्ह्याच्या वाट्याला आलेल्या पाण्यापैकी केवळ १२ टीएमसी पाणी अडवण्याचे काम राहिले होते. त्यात ‘आंबेओहोळ’, ‘नागनवाडी’, ‘सर्फनाला’, ‘उचंगी’, ‘धामणी’ हे प्रकल्प त्यावेळी ज्या परिस्थितीत होते, त्याच परिस्थितीत आजही आहेत. भाजपने कोल्हापूरवर अन्याय केल्याचा आरोप मुश्रीफ यांनी केला आहे. 

टॅग्स :Hassan Mianlal Mushrifहसन मियांलाल मुश्रीफkolhapurकोल्हापूर