शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कोल्हापूर : माझ्या प्रयत्नामुळेच ‘आंबेओहोळ’ ९० टक्के पूर्णत्वास : हसन मुश्रीफ यांचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2018 12:25 IST

कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस आघाडी सरकारच्या काळातच ‘आंबेओहोळ’ प्रकल्पाचे ९० टक्के काम पूर्ण झाले. त्यानंतर सत्तेत आलेल्या भाजप-शिवसेना युती सरकारच्या नाकर्तेपणामुळेच हा प्रकल्प रखडला. आता दुसऱ्यांदा सुधारित मान्यता मिळाली आहे, पण त्याचे राजकीय श्रेय घेण्याची समरजितसिंह घाटगे यांची धडपड सुरू असल्याची टीका आमदार हसन मुश्रीफ यांनी केली.

ठळक मुद्देमाझ्या प्रयत्नामुळेच ‘आंबेओहोळ’ ९० टक्के पूर्णत्वास : मुश्रीफ यांचा दावासमरजित यांची श्रेयासाठी धडपड : हसन मुश्रीफ

कोल्हापूर : कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस आघाडी सरकारच्या काळातच ‘आंबेओहोळ’ प्रकल्पाचे ९० टक्के काम पूर्ण झाले. त्यानंतर सत्तेत आलेल्या भाजप-शिवसेना युती सरकारच्या नाकर्तेपणामुळेच हा प्रकल्प रखडला. आता दुसऱ्यांदा सुधारित मान्यता मिळाली आहे, पण त्याचे राजकीय श्रेय घेण्याची समरजितसिंह घाटगे यांची धडपड सुरू असल्याची टीका आमदार हसन मुश्रीफ यांनी केली.‘चिकोत्रा’ प्रकल्प आपल्यामुळेच पूर्ण झाला असून, ‘नागनवाडी’ प्रकल्पाचे ७० टक्के काम आपल्या कारकिर्दीतच झाले आहे. २९ कोटींच्या ‘आंबेओहोळ’ प्रकल्पाला १९९८ मध्ये मान्यता मिळाली. त्यानंतर २०१० मध्ये सुधारित ११४ कोटींच्या प्रकल्पाला मान्यता मिळवून दिली.

आता दुसऱ्यांदा २२७ कोटींची सुधारित मान्यता मिळाली आहे. या प्रकल्पाचे ९० टक्के काम आपणच पूर्ण केले. उर्वरित १० ते १५ टक्के कामासाठी शासनाने प्रचंड उदासीनता दाखविल्यामुळे हा प्रकल्प रखडला. या प्रकल्पासाठी ३५८ हेक्टर जमीन पुनर्वसनासाठी लागत होती, त्यापैकी २४७ हेक्टर जमीन पुनर्वसनासाठी आवश्यक असून, ८१ हेक्टर जमिनीचे वाटप केले आहे. त्याचबरोबर हेक्टरी ३६ लाख रुपये पॅकेजचा प्रस्तावही शासनाकडे पाठविला आहे.

प्रकल्पग्रस्तांना जमीन दिल्याशिवाय ते धरणाची घळभरणी करू देत नव्हते. जमिनीऐवजी पॅकेजचा प्रस्ताव चार वर्षे शासन दरबारी धूळखात पडला आहे. त्यांना जमिनी अथवा त्याचा मोबदला दिल्याशिवाय धरणाचे काम सुरू होणे अवघड आहे. याबाबत अनेक बैठका घेतल्या, पण शासनाचे धोरण पश्चिम महाराष्ट्रात एकही थेंब पाणी न अडवण्याचे आहे. दुसऱ्या बाजूला संपूर्ण निधी विदर्भाकडे वळवला आहे.

‘आंबेओहोळ’ मुळे आजरा व गडहिंग्लज तालुक्यातील ३९२५ हेक्टर जमिनी सिंचनाखाली येणार आहे. आगामी हिवाळी अधिवेशनात या प्रकल्पासह ‘नागनवाडी’, ‘उचंगी’ प्रकल्पासाठी आंदोलन करणार आहे. समरजितसिंह घाटगे यांची राजकीय श्रेयासाठी धडपड सुरू असून, प्रकल्पाचे काम कोणामुळे पूर्णत्वास गेले याची जाणीव येथील जनतेला असल्याचे आमदार मुश्रीफ यांनी पत्रकात म्हटले आहे.भाजप सरकारकडून कोल्हापूरवर अन्याय‘कृष्णा’ लवादाप्रमाणे आघाडी सरकारच्या काळात कोल्हापूर जिल्ह्याच्या वाट्याला आलेल्या पाण्यापैकी केवळ १२ टीएमसी पाणी अडवण्याचे काम राहिले होते. त्यात ‘आंबेओहोळ’, ‘नागनवाडी’, ‘सर्फनाला’, ‘उचंगी’, ‘धामणी’ हे प्रकल्प त्यावेळी ज्या परिस्थितीत होते, त्याच परिस्थितीत आजही आहेत. भाजपने कोल्हापूरवर अन्याय केल्याचा आरोप मुश्रीफ यांनी केला आहे. 

टॅग्स :Hassan Mianlal Mushrifहसन मियांलाल मुश्रीफkolhapurकोल्हापूर