शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : ‘एफआरपी’चा बेस साडेनऊ टक्केच : सदाभाऊ खोत, लोकमत कार्यालयास सदिच्छा भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 18:11 IST

‘एफआरपी’चा बेस हलवलेला नाही, तो साडेनऊ टक्के इतकाच आहे. शेतकऱ्यांना अधिकचा लाभ व्हावा म्हणून १० टक्क्यांचा बेस एफआरपी देण्यासाठी गृहीत धरला आहे. केंद्राने घेतलेला निर्णय पूर्ण न समजून घेता काही लोक जाणीवपूर्वक लोकांचा गोंधळून वाढवून त्यांची दिशाभूल करत आहेत, असा टोला कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी खासदार राजू शेट्टी यांचे नाव न घेता लगावला. यावर्षी ऊसदरासाठी आंदोलन करण्याची वेळच येणार नाही, असा विश्वासही मंत्री खोत यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्दे‘एफआरपी’चा बेस साडेनऊ टक्केच : सदाभाऊ खोत , लोकमत कार्यालयास सदिच्छा भेटकाहींजणांकडून दिशाभूल करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न : सदाभाऊ खोत

कोल्हापूर : ‘एफआरपी’चा बेस हलवलेला नाही, तो साडेनऊ टक्के इतकाच आहे. शेतकऱ्यांना अधिकचा लाभ व्हावा म्हणून १० टक्क्यांचा बेस एफआरपी देण्यासाठी गृहीत धरला आहे. केंद्राने घेतलेला निर्णय पूर्ण न समजून घेता काही लोक जाणीवपूर्वक लोकांचा गोंधळून वाढवून त्यांची दिशाभूल करत आहेत, असा टोला कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी खासदार राजू शेट्टी यांचे नाव न घेता लगावला. यावर्षी ऊसदरासाठी आंदोलन करण्याची वेळच येणार नाही, असा विश्वासही मंत्री खोत यांनी व्यक्त केला.येत्या २४ आॅक्टोबरला वारणा कोडोली येथे होत असलेल्या शेतकरी कष्टकरी परिषदेसाठी निमंत्रण देण्याकरिता मंत्री खोत यांनी सोमवारी दुपारी ‘लोकमत शहर’ कार्यालयास सदिच्छा भेट दिली. ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले यांनी त्यांच्या निमंत्रणाचा स्वीकार करून पुढील वाटचालींविषयी विस्तृत चर्चा केली.‘एफआरपी’चा बेस बदलण्यावरून सुरू झालेल्या नवा वादावर भाष्य करताना मंत्री खोत यांनी ९.५० टक्के हाच बेस कायम आहे. गेल्यावर्षी ९.५० टक्के बेसला २५५० रुपये मूळ एफआरपी होती. यावर्षी त्यात ६२ रुपयांची वाढ करून ती २६१२ रुपये केली आहे. वाढ झालेली असतानाही लोकांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक होत असल्याचे स्पष्ट केले.

साखर उद्योगातील जाणकार असलेल्या शरद पवार यांनीही केंद्राच्या धोरणांचे कौतुकच केले आहे. त्यांना कसे काय बेस बदलल्याचे दिसले नाही, असा चिमटाही मंत्री खोत यांनी काढला. साखर उद्योग अडचणींतून बाहेर येत आहे. साखर निर्यात अनुदान, साखर विक्री कोटा, २९ रुपयांनी साखरेला बांधून दिलेला दर, इथेनॉल निर्मिती व दर अनुदान या केंद्र सरकारच्या धोरणांमुळे साखरेचे दर कोसळण्याची अजिबात भीती नाही.

आमची झोपडी ताजमहालासारखीच‘स्वाभिमानी’तून बाहेर पडल्यानंतर संघटना स्थापन केली तेव्हापासून संघटनेतील संख्येवरून टीका होत असल्याचा धागा पकडत मंत्री खोत यांनी आमची संघटना लहान की मोठी माहीत नाही पण आमची झोपडी आम्हाला ताजमहालासारखीच वाटते. झोपडीलाच ताजमहल समजून आम्ही काम करतो, असे सांगितले.३५७५ चा खोडसाळपणा‘१३ टक्के उताऱ्याला ३५७५ रुपये एफआरपी बसणार,’ असे मी म्हटले आहे, पण यावर्षीची ‘पहिली उचल ३५७५ रुपये असेल,असे मी कुठेही म्हटलेले नाही. मुख्यमंत्री व माझ्या नावावर ते मुद्दाम खपवले जात आहे. प्रसारमाध्यमांवर फिरणारा हा संदेश मुख्यमंत्री येणार म्हणून पोटशूळ उठलेल्यांनीच खोडसाळपणानेच टाकला आहे,’ असे मंत्री खोत यांनी सांगितले.

मुख्यमंत्री पहिल्यांदाच ऊस परिषदेतआतापर्यंत सरकारने चर्चेसाठी यावे म्हणून आंदोलने करायची, लाठ्या-काठ्या खायच्या मग चर्चा व्हायची आणि तोडगा निघायचा. आता मात्र स्वत: सरकारच्यावतीने मुख्यमंत्री शेतकरी कष्टकरी परिषदेच्या व्यासपीठावर येत आहेत. सरकार शेतकऱ्यांच्या बांधावर आल्याने येथून पुढे ऊस दरासाठी आंदोलन करण्याची वेळ शेतकऱ्यांवर येणार नाही याची दक्षता घेतली जाणार आहे, असे मंत्री खोत यांनी स्पष्ट केले.

 

टॅग्स :Sadabhau Khotसदाभाउ खोत Lokmatलोकमतkolhapurकोल्हापूर