शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात हल्ल्याची तयारी, पाकिस्तानी कनेक्शन उघड; दहशतवादी बिलालच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे
2
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
3
शेजाऱ्याशी लफडं, गुपित पतीला कळलं; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केली हत्या, मृतदेह नदीत फेकला
4
उद्धव ठाकरेंसमोर व्यथा मांडताना ९० वर्षीय शेतकऱ्याला रडू कोसळले; म्हणाले, “कर्जमाफी...”
5
IND vs AUS 5th T20I : तिलक वर्माला बसवलं बाकावर! टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रिंकूची एन्ट्री
6
जरीन खान यांच्यावर हिंदू पद्धतीने झाले अंत्यसंस्कार, मुलगा झायेदने दिला अग्नी; कारण...
7
कतरिना कैफचे सासरे 'आजोबा' बनल्यानंतर झाले भावुक! 'ज्युनिअर कौशल'साठी शेअर केली प्रेमळ पोस्ट
8
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
9
राहू-केतू गोचर २०२५: राहू केतू तसे तापदायकच, पण नोव्हेंबरमध्ये 'या' ८ राशींवर होणार मेहेरबान!
10
Railway: धावत्या ट्रेनला गरुडाची समोरून धडक, जखमी होऊनही लोको पायलटनं प्रसंगावधान दाखवलं, नाही तर...
11
अजबच...! नकळत लग्न झालं...! अमेरिकन पॉप स्टारचा मलेशियन सुलतानशी 'निकाह', आता 'तलाक'ची मागणी; नेमकं प्रकरण काय?
12
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
13
"ओए होए छोटा छावा...", विकी कौशल-कतरिना कैफच्या पोस्टवर संतोष जुवेकरची कमेंट
14
७ वर्षांनंतर अनुष्का शर्मा करणार कमबॅक! 'चकदा एक्सप्रेस' OTTवर होणार रिलीज?
15
एका चपातीमध्ये किती कॅलरीज असतात, वजन कमी करण्यासाठी रात्री किती खाव्यात?
16
Crime:  "काका वारले, मुलंही सारखी आजारी पडतात", जादूटोण्याचा संशयातून जन्मदात्या आईची हत्या!
17
IND vs AUS:"कभी शेर को घास खाते हुए देखा है क्या?" सूर्या भाऊनं केली अभिषेकची थट्टा; व्हिडिओ व्हायरल
18
कतरिना कैफने ४२ व्या वर्षी दिला मुलाला जन्म, कशी आहे तब्येत? रुग्णालयाने शेअर केलं अपडेट
19
Video: मराठी अभिनेत्रींनी केलं सोहम बांदेकरचं केळवण; आदेश-सुचित्रा बांदेकरांची होणारी सून कोण?
20
Gardening Tips: बटाट्याची सालं फेकू नका, रोपांसाठी ठरते सुपरफूड; वापर कसा करायचा ते पाहा 

गुरुवारी ‘कोल्हापूर बंद’; आंदोलन सुरुच राहणार सकल मराठा समाज : अध्यादेश निघेपर्यंत ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 00:56 IST

फडणवीस सरकार हे लबाडांचे सरकार आहे. चार वर्षे त्यांनी मराठा समाजाला आरक्षण देतो म्हणून फसविले;आताही फसवत आहे.

कोल्हापूर : फडणवीस सरकार हे लबाडांचे सरकार आहे. चार वर्षे त्यांनी मराठा समाजाला आरक्षण देतो म्हणून फसविले;आताही फसवत आहे. त्यामुळे सरकार मराठ्यांना आरक्षण दिल्याचा अध्यादेश काढत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा निर्धार कोल्हापुरातील सकल मराठा समाजाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. गुरुवारी (दि. ९) महाराष्ट्रासह कोल्हापूरही बंद राहील. त्यात आता बदल नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

राज्यभरात सुरू असलेल्या आंदोलनात आतापर्यंत १४ बळी गेले. तरीही असंवेदनशील, गेंड्याच्या कातडीचे हे सरकार निर्णय घेत नाही; उलट आंदोलनात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. मराठा समाजाच्या सगळ्या मागण्या मान्य केल्याचे मागच्या वर्षी जाहीर केले. मात्र त्यांतील एकाही मागणीची पूर्तता झालेली नाही. मुख्यमंत्री फडणवीस सरकार हे लबाडांचे सरकार आहे; त्यामुळे त्यांच्या कोणत्याही ‘शब्दा’वर आम्ही विश्वास ठेवणार नाही. ते जोपर्यंत अध्यादेश काढत नाहीत तोपर्यंत आंदोलनातून माघार घेणार नाही, असे इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी स्पष्ट केले. 

आयोगाकडूनही ताकतुंबामागासवर्गीय आयोगाकडूनही ताकतुंबा केला जात असल्याचा आरोप इंद्रजित सावंत यांनी केला. आयोगाची स्थापना झाल्यापासून आतापर्यंत आयोगाने काय केले हे कळलेले नाही. अहवाल द्यायला तीन महिने लागतील; पण कोणावर विश्वास ठेवायचा, असा प्रश्न आहे.मराठा समाजाने दादांना भेट नाकारलीमराठ्यांना आरक्षण द्यावे, या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने गेले दहा दिवस दसरा चौकात ठिय्या आंदोलन सुरू आहे. शुक्रवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील कोल्हापुरात आल्यानंतर त्यांनी आंदोलनस्थळी भेट देण्याची तयारी दर्शवली; पण ते येथे आले तर भडका उडेल, त्याची जबाबदारी प्रशासनाची असेल, असे सांगत सकल मराठा समाजाने त्यांना भेट नाकारली. आंदोलन पेटल्यानंतर पहिल्यांदाच पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे शुक्रवारी सकाळी कोल्हापुरात आले.विविध कार्यक्रमांना हजेरी लावल्यानंतर दुपारी पावणे तीनच्या सुमारास आंदोलनस्थळास भेट देणार होते. पोलीस प्रशासनाच्या वतीने तसा निरोप दिलीप देसाई यांच्यासह मराठा कार्यकर्त्यांना दिला; पण पोलिसांची मागणी स्पष्ट शब्दांत झिडकारून लावत, ६० किलोमीटर पायपीट करून सेनापती कापशी येथून कार्यकर्ते येत आहेत, अशा परिस्थितीत मंत्री पाटील येथे आले आणि भडका उडाला तर सर्वस्वी पोलीस प्रशासनाची जबाबदारी राहील, असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला.दरम्यान, आंदोलनस्थळी पालकमंत्री पाटील येणार ही वार्ता वाऱ्यासारखी शहरात पसरली; त्यामुळे दसरा चौकात हळूहळू गर्दी वाढू लागली. त्यात पोलीस बंदोबस्तही वाढविल्याने काही काळ तणाव निर्माण झाला.महामंडळाकडे पैसे नाहीतअण्णासाहेब पाटील महामंडळाकडे निधी नाही; त्यामुळे या मंडळाकडून कर्जे वितरित केली जात नाहीत. बॅँका मराठा समाजातील तरुणांना कर्ज देत नाहीत. नुसत्या घोषणा केल्या; पण दिले तर काहीच नाही. जर देणार नसाल तर नाही म्हणून सांगा; आम्हाला वेगळा मार्ग स्वीकारायला लागेल, असे सावंत म्हणाले. 

बुद्धिवंतांनी फसू नयेराज्य सरकार मराठा समाजातील बुद्धिवंत, विचारवंत, संशोधक यांची फसवणूक आणि बुद्धिभेद करीत आहे. चर्चेचे नाटक करून वेळ काढत आहे. मराठा समाजाने कोणाला अधिकृत प्रतिनिधी नेमलेले नाही, असेही सांगितले. यावेळी वसंतराव मुळीक, सचिन तोडकर, हर्षल सुर्वे, स्वप्निल पार्टे, अवधूत पाटील उपस्थित होते.मराठा वसतिगृह ही नौटंकीमराठा विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेले वसतिगृह ही सरकारची नौटंकी आहे, असे दिलीप देसाई यांनी सांगितले. आपण जर न्यायालयात गेलो तर हे वसतिगृह एका क्षणात बंद पडेल. वसतिगृह सुरू करण्याची कोणतीही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केलेली नाही.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरStrikeसंप