शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

कोल्हापूर : पंचायत राज संघटनेचे राष्ट्रीय सरचिटणीस पदी बाजीराव खाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 17:24 IST

अखिल भारतीय कॉँग्रेस कमिटी अंतर्गत राजीव गांधी पंचायत राज सघटनेच्या राष्ट्रीय सरचिटणीस पदी बाजीराव नानासो खाडे (रा. सांगरूळ) यांची निवड झाली. आंध्रप्रदेश व तेलंगणा राज्याचे प्रभारी पदाची जबाबदारीही त्यांच्यावर सोपवण्यात आल्याचे पत्र संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा, माजी खासदार मिनाक्षी नटराजन यांनी दिले.

ठळक मुद्देपंचायत राज संघटनेचे राष्ट्रीय सरचिटणीस पदी बाजीराव खाडेआंध्रप्रदेश, नेलंगणाच्या प्रभारी पदाचीही जबाबदारी 

कोल्हापूर : अखिल भारतीय कॉँग्रेस कमिटी अंतर्गत राजीव गांधी पंचायत राज सघटनेच्या राष्ट्रीय सरचिटणीस पदी बाजीराव नानासो खाडे (रा. सांगरूळ) यांची निवड झाली. आंध्रप्रदेश व तेलंगणा राज्याचे प्रभारी पदाची जबाबदारीही त्यांच्यावर सोपवण्यात आल्याचे पत्र संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा, माजी खासदार मिनाक्षी नटराजन यांनी दिले.स्थानिक स्वराज संस्थांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये सत्तेच्या विकेंद्रीकरणाच्या विचाराबाबत जागरूकता निर्माण करणे व त्यांना कॉँग्रेस पक्षाशी जोडण्याचे महत्वपुर्ण काम पंचायत राज संघटना करते. राज्यातील तरूण कार्यकर्त्यांना या संघटनेची जबाबदारी दिली आहे.

बाजीराव खाडे यांच्यावर कोल्हापूर जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांची जबाबदारी सोपवली. त्यानंतर २०१६ मध्ये कर्नाटक राज्याचा प्रभारी म्हणून काम केले. त्यांनी कॉँग्रेसचे पक्षाध्यक्ष राहूल गांधी यांनी दिलेली जबाबदारी अत्यंत आक्रमकपणे पार पाडल्याने आता पंचायत राज संघटनेचे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून संधी दिली. त्याचबरोबर आंध्रप्रदेश व तेलंगणा राज्याचे प्रभारी पदाची जबाबदारी सोपवली.खाडे हे कृषी पदवीधर आहेत, नोकरी न करता आधूनिक शेतीकडे वळले. त्यातून स्वर्गीय श्रीपतराव बोंद्रे यांच्याशी जवळिकता आली. कॉँग्रेसच्या स्थापना दिनी २८ डिसेंबर १९९६ ला कॉँग्रेसचे प्राथमिक सभासद होऊन कामास सुरूवात केली. त्यानंतर आलेल्या १९९७ च्या जिल्हा परिषद निवडणूकीत खाडे यांनी सांगरूळ मतदारसंघातून उभे राहावे, अशी बोंद्रे यांची इच्छा होती. पण त्यावेळी बंधू बाळासाहेब खाडेंना संधी दिली.

प्रत्येक निवडणूकीत कॉँग्रेस पक्षाचा सच्चा कार्यकर्ता म्हणून काम केले पण व्यासपीठ मिळाले नाही. राहूल गांधी यांनी मतदान हक्क जागरूकता कार्यक्रम हातात घेतला आणि खाडे यांनी करवीर मतदारसंघात ११ दिवसाची ४०० किलो मीटर पदयात्रा काढून जागृती केली. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcongressकाँग्रेस