शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

कोल्हापूर : बुध्दीभेद करून काही ठिकाणी शहरी नक्षलवाद निर्माण करण्याचा प्रयत्न : अ‍ॅड. उज्वल निकम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 14:03 IST

विचारांची फुट पडून, बुध्दीभेद करून काही ठिकाणी शहरी नक्षलवाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे मत विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्वल निकम यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देनक्षली भागातील नागरिकांसाठी ट्रकभर कपडे, शाहुपूरी पोलीसांचा वेगळा आदर्शअ‍ॅड. उज्वल निकम यांनी केले कौतुक

कोल्हापूर : आज देशामध्ये प्रामुखाने दोन महत्वाच्या समस्या आहेत. दहशतवाद आणि नक्षलवाद, परंतू नक्षलवादाचे लोण शहरी भागात पसरले आहे. म्हणूनच विचारांची फुट पडून, बुध्दीभेद करून काही ठिकाणी शहरी नक्षलवाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याला जर पायबंद घालायचा असेल तर नक्षलवादी भागातील लोकांना आम्ही तुमच्याकरीता आहोत, तुम्ही आमचे आहात ही भावना वाढीला लावणे गरजेचे आहे. त्यांच्या प्रगतीची सुरुवात शाहुपूरी पोलीसांनी केली आहे, असे मत विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्वल निकम यांनी व्यक्त  केले.

शाहुपूरी पोलीस ठाणे आणि व्हिजन ट्रस्ट अक्षय मित्र मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी लोकांना ट्रक भरुन कपडे पाठविण्याच्या कार्यक्रमात ते प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होते. अ‍ॅड. निकम व विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांचे हस्ते झेंडा दाखवून ट्रक गडचिरोलीकडे रवाना झाला.

यावेळी अ‍ॅड. निकम म्हणाले, गडचिरोली भागातील नक्षलग्रस्त लोकांना कपड्यांची नितांत गरज आहे. हे पाहूनच शाहुपूरी पोलीस आज कपड्यांनी भरलेला ट्रक पाठवित आहेत. समाजापुढे त्यांनी एक वेगळा आदर्श दाखविला आहे. पोलीस म्हणजे फक्त कायदा व सुव्यवस्था नाही, तर लोकउपयोगी सेवा करु शकतो हे त्यांनी दाखविले आहे.नक्षलवाद आणि दहशतवाद का निर्माण होतो. आज शहरी भागात नक्षलवाद होवू घातला आहे. त्यामुळे बुध्दीभेद करणे हे काही लोकांचे काम होवून बसले आहे. अशावेळी पोलीसांकडून आपण अपेक्षा करतो. पोलीसांनी समाजापुढे चांगला आरसा दाखविला, तर समाज देखील तुमचं चांगलं प्रतिबिंब आरशात बघेल. त्यांनी चांगलं प्रतिबिंब असलेला आरसा बाळगण ही आज काळाची गरज असल्याचे अ‍ॅड. निकम यांनी सांगितले.

यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक नांगरे-पाटील, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी मनोगते व्यक्त केली. या उपक्रमातील ३५ सहभागी मंडळ, व्यक्तिंना अ‍ॅड. निकम यांचे हस्ते यावेळी सन्मानपत्र देण्यात आली. प्रस्ताविक शाहुपूरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे यांनी केले.

आभार संताजी घोरपडे यांनी मानले. कार्यक्रमास राजर्षि छत्रपती शाहु महाराज शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर ननंदकर, अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, करवीर उपविभागीय पोलीस उपअधीक्षक सूरज गुरव, महापालिका स्थायी समिती सभापती अशिष ढवळे, स्वामी समर्थ सार्वजनिक भक्त मंडळ प्राज्ञापुरीचे अध्यक्ष एन. आर. बुधले आदींसह नागरिक उपस्थित होते. 

 

टॅग्स :Ujjwal Nikamउज्ज्वल निकमkolhapurकोल्हापूर