शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : आंबेओहोळच्या २२७ कोटींच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेला मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2018 12:36 IST

केवळ १५ टक्के कामासाठी रखडलेल्या आजरा तालुक्यातील उत्तूर परिसरातील आंबेओहोळ प्रकल्पाच्या २२७ कोटी ५४ लाख रुपयांच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेला व्यय अग्रक्रम समितीने मंजुरी दिली आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे हे काम मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देआंबेओहोळच्या २२७ कोटींच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेला मंजुरीपालकमंत्र्यांचा पाठपुरावा, प्रकल्पाला मिळणार गती

कोल्हापूर : केवळ १५ टक्के कामासाठी रखडलेल्या आजरा तालुक्यातील उत्तूर परिसरातील आंबेओहोळ प्रकल्पाच्या २२७ कोटी ५४ लाख रुपयांच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेला व्यय अग्रक्रम समितीने मंजुरी दिली आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे हे काम मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.आजरा आणि गडहिंग्लज तालुक्यांतील सिंचनक्षेत्र वाढीसाठी महत्त्वपूर्ण असलेला हा प्रकल्प आजरा तालुक्यातील आर्दाळ, पेंढारवाडी, करपेवाडी या गावांजवळ आंबेओहोळ नाल्यावर उभारण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत कोल्हापूर पद्धतीचे सात बंधारे बांधण्यात येत आहेत.

या माध्यमातून आजरा आणि गडहिंग्लज तालुक्यांतील ३९२५ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. आतापर्यंत या प्रकल्पाच्या मातीच्या धरणाचे ८० टक्के, पुच्छ कालव्याचे ८० टक्के काम; तर विद्युत विमोचकाचे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे; परंतु अद्याप प्रकल्पाची घळभरणी झालेली नाही.या प्रकल्पासाठी मूळ प्रशासकीय मान्यता आॅक्टोबर १९९८ मध्ये घेण्यात आली होती. त्यानंतर पहिली सुधारित प्रशासकीय मान्यता जानेवारी २०१० मध्ये घेण्यात आली. प्रकल्पाची कामे अद्याप पूर्ण झाली नसल्याने द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव जलसंपदा विभागाने व्यय अग्रक्रम समितीसमोर सादर केला होता. कामांचा प्राधान्यक्रम ठरवून निविदा प्रक्रिया सुरू असलेली कामे पूर्ण करण्यात येणार असल्याने पुढील वर्षी प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याबाबत आग्रह धरला जाणार आहे.

जमिनीसाठीच्या रकमेचा प्रस्तावामध्ये समावेशया प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्यांना ज्या जमिनी द्यावयाच्या आहेत, त्यांना पाहिजे असल्यास रोख रक्कमही दिली जाणार आहे. त्याचीही तरतूद या सुधारित प्रशासकीय मंजुरीमध्ये करण्यात आली आहे. त्यामुळे जमीनवाटपाचा मुद्दा निकाली निघण्याची शक्यता आहे.

अन्य प्रकल्पांचे काय?या प्रकल्पाबरोबरच आजरा तालुक्यातील उचंगी प्रकल्प केवळ ४० कोटी रुपयांसाठी रखडला आहे. तसेच याच तालुक्यातील हिरण्यकेशी नदीवरील सर्फनाला प्रकल्पाचेही काम रखडले आहे. राधानगरी तालुक्यातील धामणी प्रकल्पाचे कामही सुरू झालेले नाही. या प्रकल्पांबाबतही आता युद्धपातळीवर प्रयत्न करावे लागणार आहेत. 

टॅग्स :Chandrakant Dada Bachu Patilचंद्रकांतदादा बच्चू पाटीलkolhapurकोल्हापूर