शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : आंबेओहोळच्या २२७ कोटींच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेला मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2018 12:36 IST

केवळ १५ टक्के कामासाठी रखडलेल्या आजरा तालुक्यातील उत्तूर परिसरातील आंबेओहोळ प्रकल्पाच्या २२७ कोटी ५४ लाख रुपयांच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेला व्यय अग्रक्रम समितीने मंजुरी दिली आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे हे काम मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देआंबेओहोळच्या २२७ कोटींच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेला मंजुरीपालकमंत्र्यांचा पाठपुरावा, प्रकल्पाला मिळणार गती

कोल्हापूर : केवळ १५ टक्के कामासाठी रखडलेल्या आजरा तालुक्यातील उत्तूर परिसरातील आंबेओहोळ प्रकल्पाच्या २२७ कोटी ५४ लाख रुपयांच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेला व्यय अग्रक्रम समितीने मंजुरी दिली आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे हे काम मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.आजरा आणि गडहिंग्लज तालुक्यांतील सिंचनक्षेत्र वाढीसाठी महत्त्वपूर्ण असलेला हा प्रकल्प आजरा तालुक्यातील आर्दाळ, पेंढारवाडी, करपेवाडी या गावांजवळ आंबेओहोळ नाल्यावर उभारण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत कोल्हापूर पद्धतीचे सात बंधारे बांधण्यात येत आहेत.

या माध्यमातून आजरा आणि गडहिंग्लज तालुक्यांतील ३९२५ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. आतापर्यंत या प्रकल्पाच्या मातीच्या धरणाचे ८० टक्के, पुच्छ कालव्याचे ८० टक्के काम; तर विद्युत विमोचकाचे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे; परंतु अद्याप प्रकल्पाची घळभरणी झालेली नाही.या प्रकल्पासाठी मूळ प्रशासकीय मान्यता आॅक्टोबर १९९८ मध्ये घेण्यात आली होती. त्यानंतर पहिली सुधारित प्रशासकीय मान्यता जानेवारी २०१० मध्ये घेण्यात आली. प्रकल्पाची कामे अद्याप पूर्ण झाली नसल्याने द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव जलसंपदा विभागाने व्यय अग्रक्रम समितीसमोर सादर केला होता. कामांचा प्राधान्यक्रम ठरवून निविदा प्रक्रिया सुरू असलेली कामे पूर्ण करण्यात येणार असल्याने पुढील वर्षी प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याबाबत आग्रह धरला जाणार आहे.

जमिनीसाठीच्या रकमेचा प्रस्तावामध्ये समावेशया प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्यांना ज्या जमिनी द्यावयाच्या आहेत, त्यांना पाहिजे असल्यास रोख रक्कमही दिली जाणार आहे. त्याचीही तरतूद या सुधारित प्रशासकीय मंजुरीमध्ये करण्यात आली आहे. त्यामुळे जमीनवाटपाचा मुद्दा निकाली निघण्याची शक्यता आहे.

अन्य प्रकल्पांचे काय?या प्रकल्पाबरोबरच आजरा तालुक्यातील उचंगी प्रकल्प केवळ ४० कोटी रुपयांसाठी रखडला आहे. तसेच याच तालुक्यातील हिरण्यकेशी नदीवरील सर्फनाला प्रकल्पाचेही काम रखडले आहे. राधानगरी तालुक्यातील धामणी प्रकल्पाचे कामही सुरू झालेले नाही. या प्रकल्पांबाबतही आता युद्धपातळीवर प्रयत्न करावे लागणार आहेत. 

टॅग्स :Chandrakant Dada Bachu Patilचंद्रकांतदादा बच्चू पाटीलkolhapurकोल्हापूर