शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
2
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
3
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?
4
IND vs PAK Final, Asia Cup 2025: फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
5
'पीएम किसान'चा २१ वा हप्ता जाहीर! ३ राज्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी?
6
IND vs PAK Final, Asia Cup 2025: भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
7
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
8
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
9
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
10
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
11
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
12
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
13
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
14
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
15
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
16
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
17
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
18
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
19
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
20
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी

‘स्वच्छता दर्पण’मध्ये अव्वल जिल्ह्यांमध्ये कोल्हापूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 13:10 IST

‘स्वच्छता दर्पण’ या स्पर्धेमध्ये भारतामधील अव्वल १0 जिल्ह्यांमध्ये कोल्हापूरचा समावेश करण्यात आला आहे. रविवार (दि. १२) दिल्ली येथे होणाऱ्या कार्यशाळेमध्ये कोल्हापूर जिल्हा परिषदेचाही गौरव करण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे‘स्वच्छता दर्पण’मध्ये अव्वल जिल्ह्यांमध्ये कोल्हापूरदिल्लीत होणार १२ जानेवारीला जिल्हा परिषदेचा गौरव

कोल्हापूर : ‘स्वच्छता दर्पण’ या स्पर्धेमध्ये भारतामधील अव्वल १0 जिल्ह्यांमध्ये कोल्हापूरचा समावेश करण्यात आला आहे. रविवार (दि. १२) दिल्ली येथे होणाऱ्या कार्यशाळेमध्ये कोल्हापूर जिल्हा परिषदेचाही गौरव करण्यात येणार आहे.केंद्र शासनाच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयामार्फत वर्ष २0१९-२0 मध्ये स्वच्छता आणि हागणदारीमुक्ती अंतर्गत येणाऱ्या मुद्यांच्या अनुषंगाने ‘स्वच्छता दर्पण २0१९’ ही आॅनलाईन गुणांकन प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. या गुणांकन स्पर्धेमध्ये कोल्हापूर जिल्हा देशातील अव्वल १0 जिल्ह्यांमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. गुणांकनामध्ये देश स्तरावर अव्वल जिल्ह्यांमध्ये स्थान मिळविणारा कोल्हापूर जिल्हा हा महाराष्ट्र राज्यातील एकमेव जिल्हा आहे.हागणदारीमुक्त झालेल्या आणि हागणदारीमुक्त न झालेल्या राज्यांसाठी स्वतंत्र गुणांकन पद्धती तयार करण्यात आली होती. यामध्ये गाव पातळीवरील अभियान अंतर्गत झालेले काम, जिल्ह्यांच्या विविध कामांतील प्रगतीचे मुद्दे विचारात घेऊन आॅनलाईन प्रणालीवर नोंद करण्यात आलेल्या अहवालाच्या अनुषंगाने गुणांकन करण्यात आले आहे; यासाठी १ जून २0१९ ते ३१ डिसेंबर २0१९ पर्यंत आॅनलाईन गुणांकन प्रक्रियेची नोंद घेण्यात आली आहे.स्वच्छता दर्पण गुणांकन पद्धतीमध्ये हागणदारीमुक्त गाव, शौचालय बांधकाम आणि वापर, गावांची पडताळणी, शौचालय बांधकाम जिओ टॅगिंग, आर्थिक प्रगती नोंद करणे, तसेच गावस्तरावरील जनजागृती उपक्रम, श्रमदान, लोकसहभाग आणि सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन या घटकांवर आधारित आॅनलाईन गुणांकन प्रणालीवर माहिती भरण्यात आली होती.जिल्हा परिषदेच्या या कामगिरीबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. सर्व पदाधिकारी, अधिकारी, सरपंच, ग्रामसेवक, स्वच्छाग्रही व इतर सर्व कर्मचारी यांनी घेतलेले कष्ट आणि केलेले नियोजनबद्ध काम यामुळे हे यश मिळाले.

 

टॅग्स :zpजिल्हा परिषदkolhapurकोल्हापूरSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान