शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
3
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
4
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
5
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
6
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
7
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
8
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
9
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
10
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
11
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
12
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
13
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
14
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
15
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
16
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
17
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
18
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
19
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
20
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले

कोल्हापूर : पर्यायी शिवाजी पूल १ आॅक्टोबरला पुन्हा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 17:38 IST

राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांतील कुरघोडीचे राजकारण, पंचगंगा नदीला आलेला पूर, आदी विविध अडथळ्यांमुळे गेले दोन महिने थांबलेले पर्यायी शिवाजी पुलाचे काम पुन्हा सुरू होण्यासाठी किमान महिना लागणार आहे.

ठळक मुद्दे पर्यायी शिवाजी पूल १ आॅक्टोबरला पुन्हा सुरूपंचगंगा नदीला पुन्हा पुराची शक्यता गृहीत

कोल्हापूर : राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांतील कुरघोडीचे राजकारण, पंचगंगा नदीला आलेला पूर, आदी विविध अडथळ्यांमुळे गेले दोन महिने थांबलेले पर्यायीचे काम पुन्हा सुरू होण्यासाठी किमान महिना लागणार आहे. सप्टेंबर महिन्याभरात आणखी एकदा पूर आल्यास, केलेल्या कामाचा बट्ट्याबोळ होईल, यामुळे ठेकेदाराने काम पुन्हा सुरू करण्याचा मुहूर्त १ आॅक्टोबर धरला आहे.कोल्हापूर ते रत्नागिरी या राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा हा शिवाजी पूल असून, तो अरुंद व कालबाह्य झाल्याने नवीन पर्यायी पूल शेजारी उभारण्याचे काम सुरू आहे; पण विविध अडथळ्यांच्या शर्यतीनंतर या पर्यायी पुलाचे काम ८० टक्के पूर्ण होऊन डिसेंबर २०१५ नंतर तो पुन्हा वादाच्या भोवऱ्यांत सापडला होता.

अखेर पुरातत्वच्या कचाट्यातून सुटण्यासाठी जिल्हा प्रशासनाने केलेले अथक प्रयत्न आणि सर्वपक्षीय कृती समितीचा रेटा यामुळे जूनच्या पहिल्या आठवड्यात काम सुरू झाले. पुलाच्या उर्वरित कामाचा ठेका गोव्यातील आसमास कन्स्ट्रक्शन प्रा. लि. ला दिला.

पुलाच्या अखेरच्या कॉलमसाठी खुदाई करताना पाया न लागणे व त्यानंतर पुलाच्या पाणी पातळीच्या चुकीच्या मोजमापावरून वाद उफाळला; त्यामुळे पुलाचे डिझाईन बदलण्याची नामुष्की आली. दरम्यान, पंचगंगा नदीला पूर आल्याने पाया खुदाईत टाकलेल्या काँक्रीटवर पुराचे पाणी आल्याने काम ठप्प झाले. ते बंदच आहे.

सद्या पूर ओसरला असला तरीही प्रतिवर्षाप्रमाणे सप्टेंबर महिन्यात नदीला पुन्हा पूर येण्याची शक्यता ठेकेदार एन. डी. लाड यांनी गृहीत धरली; त्यामुळे पुन्हा काँक्रीट वाहून जाऊ नये, यासाठी हे काम दि. १ आॅक्टोबरला सुरू करण्यात येणार आहे. त्यानंतर नदी पात्रात रस्ता करून तेथे कामगार छावणी उभारण्यात येणार आहे. तेथेच कॉलमसाठी सळई, आदी साहित्य उतरण्यात येणार आहे.

नवा पूल ३१ जानेवारीपर्यंत खुलाजिल्हा प्रशासनाने जूनच्या पहिल्या आठवड्यात ठेकेदाराला पुलाच्या कामाची वर्क आॅर्डर दिली. काम २८ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्याची अट आहे; पण अधिकाऱ्यांतील अंतर्गत वाद, नदीचा पूर यामुळे वेळ वाढल्याने हे काम ३१ जानेवारी २०१९ पर्यंत पूर्ण करून पूल रहदारीस खुला करण्याचे उद्दिष्ट ठेकेदाराचे आहे.

पाऊस थांबला असला तरीही पुढील काम नदीपात्रात आहे; त्यामुळे पुन्हा पुराच्या पाण्याचा धोका उद्भवू शकतो. नुकसानीला सामोरे जाण्यापेक्षा काहीवेळ थांबून १ आॅक्टोबरपासून काम पूर्ववत सुरू ठेवून पुढील तीन महिन्यांत पूर्ण करू.- एन. डी. ऊर्फ बापू लाड, ठेकेदार, आसमास कन्स्ट्रक्शन प्रा. लि. 

 

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभागMuncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर