शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

kolhapur airport : ‘छत्रपती राजाराम महाराज विमानतळ’ नामकरण लवकरच, पंतप्रधान कार्यालयाकडे प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2022 12:07 IST

कोल्हापूर विमानतळ सुरू करण्यात छत्रपती राजाराम महाराज यांचे मोठे योगदान

कोल्हापूर : येथील विमानतळाचे ‘छत्रपती राजाराम महाराज विमानतळ’ असे नामकरण लवकरच होणार आहे. त्याबाबतचा प्रस्ताव पंतप्रधान कार्यालयाकडे नागरी उड्डयन खात्याने पाठविला आहे. त्यावर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होऊन नामकरणाचा निर्णय होणार आहे.कोल्हापूर विमानतळ सुरू करण्यात छत्रपती राजाराम महाराज यांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे या विमानतळास त्यांचे नाव देण्यासाठी राजारामपुरी व्यापारी असोसिएशन, राष्ट्रीय मोडी विकास प्रबोधिनी, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजकडून गेल्या २२ वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे.या विमानतळास छत्रपती राजाराम महाराज यांचे नाव देण्याचा ठराव दि. २७ मार्च २०१८ रोजी विधिमंडळात करण्यात आला. हा ठराव राज्य शासनाने नागरी विमान वाहतूक विभागाकडे पाठविला. त्यानंतर दि. २ फेब्रुवारी २०१९ रोजी विमानतळ विस्तारीकरणाच्या कामाच्या भूमिपूजनावेळी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनीही नामकरणाची घोषणा केली. त्यानंतर नागरी उड्डयन खात्याने नामकरणाचा प्रस्ताव पंतप्रधान कार्यालयाकडे पाठविला आहे.दरम्यान, शिर्डी, कोल्हापूर, औरंगाबादसह अन्य १३ विमानतळांच्या नामकरणाचे प्रस्ताव पंतप्रधान कार्यालयाकडे आला आहे. या कार्यालयाकडून त्याला मान्यता मिळाल्यानंतर प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळासमोर येईल. मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होऊन नामकरणाचा निर्णय होईल, अशी माहिती मंत्री कराड यांनी औरंगाबाद येथे गुरुवारी दिली आहे.

कोल्हापूर विमानतळाच्या ‘छत्रपती राजाराम महाराज विमानतळ’ अशा नामकरणाचा प्रस्ताव गेल्या तीन वर्षांपूर्वी पंतप्रधान कार्यालयाकडे गेला आहे. केंद्रीय मंत्री भागवत कराड यांच्याकडून चुकीने दुसऱ्या नावाचा उल्लेख झाला असेल. मी त्यांच्याशी बोलणार आहे. या विमानतळाचे छत्रपती राजाराम महाराज विमानतळ असे नामकरण होणे योग्य आहे. -खासदार संभाजीराजे 

कोल्हापूर विमानतळाची स्थापना आणि तेथून प्रवासी विमानसेवा सुरू करण्यात छत्रपती राजाराम महाराज यांचे योगदान अभूतपूर्व आहे. त्यांचे नाव या विमानतळाला द्यावे यासाठी राजारामपुरी व्यापारी असोसिएशनने १५ वर्षे पाठपुरावा केला आहे. विमानतळ प्राधिकरण, हवाई वाहतूक मंत्री, राज्य सरकार या स्तरावर प्रयत्न केले आहेत. नामकरणाबाबतचे यश शेवटच्या टप्प्यात असताना कोणीही त्याला फाटे फोडू नयेत. -ललित गांधी, अध्यक्ष, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAirportविमानतळ