शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
4
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
5
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
6
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
7
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
8
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
9
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
10
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
11
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
12
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
13
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
14
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
15
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
16
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
17
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
18
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
19
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर  : पर्यायानंतरच ‘तामगाव-उजळाईवाडी’ मार्ग होणार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 13:13 IST

पर्यायी रस्ता उपलब्ध झाल्यानंतर कोल्हापूर विमानतळाच्या हद्दीतील तामगाव-उजळाईवाडी मार्ग बंद होण्याची शक्यता आहे. सध्या तामगाव तलाव ते गोकुळ शिरगाव हद्दीतील सुदर्शन पेट्रोलपंप या मार्गाचा पर्याय पुढे आला आहे; मात्र, तामगावच्या ग्रामस्थांना तो अमान्य आहे.

ठळक मुद्देपर्यायानंतरच ‘तामगाव-उजळाईवाडी’ मार्ग होणार बंदतलावाकडील पर्याय अमान्य; संरक्षक भिंतीजवळून रस्त्याची मागणी

कोल्हापूर / उजळाईवाडी : पर्यायी रस्ता उपलब्ध झाल्यानंतर कोल्हापूर विमानतळाच्या हद्दीतील तामगाव-उजळाईवाडी मार्ग बंद होण्याची शक्यता आहे. सध्या तामगाव तलाव ते गोकुळ शिरगाव हद्दीतील सुदर्शन पेट्रोलपंप या मार्गाचा पर्याय पुढे आला आहे; मात्र, तामगावच्या ग्रामस्थांना तो अमान्य आहे.

भारतीय विमानपत्तन प्राधिकरणाने कोल्हापूर विमानतळाच्या विस्तारीकरण, आधुनिकीकरणासाठी २७४ कोटी रुपयांचा आराखडा मंजूर केला असून त्याअंतर्गत सध्या संरक्षण भिंती बांधण्याचे काम सुरू आहे. विस्तारीकरणासाठी संपादित केलेल्या जागेत उजळाईवाडी-तामगाव या मार्गाचा काही भाग येतो. संरक्षक भिंत बांधणे काम सुरू असून हा मार्ग बंद केला जाणार आहे; पण हा मार्ग बंद करू नये, अशी मागणी तामगाव, उजळाईवाडी ग्रामस्थांतून होत आहे.

त्यावर जिल्हा प्रशासनाने या ग्रामपंचायतींना पर्यायी मार्गांचा विचार करावा, असे सुचविले आहे. तामगाव तलाव ते गोकुळ शिरगाव हद्दीमधील सुदर्शन पेट्रोलपंप आणि मयूर पेट्रोलपंपाच्या पुढील बाजूने जाणारा मार्ग असे पर्याय समोर आले आहेत. यातील तलावावरून जाणारा मार्ग सोईस्कर नसल्याचे तामगाव ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्याऐवजी विमानतळाच्या नव्या संरक्षण भिंतीजवळून मार्ग उपलब्ध करून देण्याची त्यांची मागणी आहे.

ग्रामपंचायतीची मागणीसध्याचा तामगाव-उजळाईवाडी रस्ता विमानतळ विस्तारीकरणात गेल्याने गावाला पर्यायी रस्ता उपलब्ध नसल्याने वाहतुकीस अडचण निर्माण होत आहे. त्याचप्रमाणे गावामधील रुग्णांना उपचाराकरिता कोल्हापूरपेक्षा उजळाईवाडीमधील आरोग्य केंद्र जवळ व उपयोगाचे आहे.

सध्या कोल्हापूरकडे जाताना तामगाव ते उजळाईवाडी हे अंतर अवघे अडीच किलोमीटर आहे. परंतु हा रस्ता बंद झाल्याने कोल्हापूरकडे जाण्यासाठी एमआयडीसी गोकुळ शिरगावमार्गे तामगाव-उजळाईवाडी अंतर सात किलोमीटर भरते; त्यामुळे सर्व नागरिक, विद्यार्थी, कामगारवर्ग व शेतकरी वर्गाला जादा अंतर प्रवास करावा लागणार आहे; त्यामुळे वेळ वाया जावून जादा पैसे खर्च होणार आहे. तरी पर्यायी रस्ता करून ग्रामस्थांचा जादा अंतराचा प्रवास टाळण्यासह सहकार्य करावे, अशी मागणी तामगाव ग्रामपंचायतीने ठरावाद्वारे केली आहे.

विमानतळाच्या सुरक्षेसाठी सध्या संरक्षक भिंतीचे काम सुरू आहे. विमानतळ प्राधिकरणाच्या हद्दीत सध्याचा रस्ता येत असल्याने तो बंद होणारच आहे; त्यामुळे ग्रामस्थांनी पर्यायी रस्त्याचा विचार करणे आवश्यक आहे.- संजय शिंदे,निवासी उपजिल्हाधिकारी

तामगाव - उजळाईवाडी मार्ग विमानतळ प्राधिकरणाच्या नव्या विकास आराखड्यातून जात असल्याने येथील ग्रामस्थांची गैरसोय होणार आहे. दोन्ही गावांना जोडणारा रस्ता कायमस्वरूपी पाहिजे. ग्रामस्थांची गैरसोय टाळण्यासाठी कमी अंतराचा पर्यायी रस्ता उपलब्ध करून द्यावा. याबाबतचा ग्रामसभेचा ठराव पालकमंत्री, खासदार, आमदार, जिल्हाधिकारी यांना दिला आहे.- राजेंद्र पावंडे, सरपंच, तामगाव.

गावे जोडणारे नवे रस्ते राज्य सरकारकडून केले जात आहेत. अशा स्थितीत उजळाईवाडी आणि तामगाव यांना जोडणारा सध्याचा रस्ता बंद करणे अयोग्य आहे. त्याचा विचार करून जिल्हा प्रशासनाने पुढील कार्यवाही करावी.- सुवर्णा माने, सरपंच, उजळाईवाडी. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAirportविमानतळ