शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
2
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
3
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
4
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
5
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
6
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
7
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
8
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
9
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
10
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
11
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
12
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
13
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
14
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
15
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
16
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
17
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
18
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
19
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
20
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...

कोल्हापूर :स्वातंत्र्यानंतरसुद्धा भटक्या जमातींचा संघर्ष सुरूच : इदाते, विवेकानंद महाविद्यालयात राष्ट्रीय चर्चासत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 17:53 IST

स्वातंत्र्य प्राप्त होऊन आपल्या देशाला ७० वर्षे पूर्ण झाली तरीही भटक्या विमुक्त जमातीच्या लोकांच्या समस्या संपलेल्या नाहीत; त्यांच्या जीवनाचा संघर्ष अजूनही सुरूच आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय विमुक्त, भटक्या व अर्धभटक्या जनजाती आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष भिकू इदाते यांनी केले. ​​​​​​​

ठळक मुद्देस्वातंत्र्यानंतरसुद्धा भटक्या जमातींचा संघर्ष सुरूच : इदातेविवेकानंद महाविद्यालयात राष्ट्रीय चर्चासत्र

कोल्हापूर : स्वातंत्र्य प्राप्त होऊन आपल्या देशाला ७० वर्षे पूर्ण झाली तरीही भटक्या विमुक्त जमातीच्या लोकांच्या समस्या संपलेल्या नाहीत; त्यांच्या जीवनाचा संघर्ष अजूनही सुरूच आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय विमुक्त, भटक्या व अर्धभटक्या जनजाती आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष भिकू इदाते यांनी केले.विवेकानंद महाविद्यालयात समाजशास्त्र विभागाच्या वतीने ‘अर्धभटक्या, भटक्या आणि विमुक्त जमातींच्या सामाजिक, आर्थिक समस्या’ यावर एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे होते. साहित्यिक लक्ष्मण गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.इदाते म्हणाले, स्वातंत्र्यप्राप्तीसाठी काम करणाºया या समाजाला आज गुन्हेगार, भिकारी तसेच बेघर बनविले गेले आहे, ही सर्वांत मोठी समस्या आहे. माणसाला माणसाचा दर्जा दिला पाहिजे. यासाठी भटक्या-विमुक्तांना शिक्षण, नोकरी, व्यवसाय आणि मानवी हक्क ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे.गायकवाड म्हणाले, काबाडकष्ट करणाऱ्या माणसाचा चेहरा नेहमी काळा असतो. त्याच्या मनगटात जगण्याची ताकद असते. समाजाने जाती व धर्मव्यवस्था यांची तटबंदी करून भटक्या विमुक्तांना समाजबाह्य केले आहे, शिक्षणाच्या प्रगतीने त्यांच्यातील अज्ञान, अंधकार दूर होतील. समाज परिवर्तनासाठी साहित्य आणि चळवळ यांचे योगदान फार मोठे आहे. त्यामुळेच या भटक्या जमाती निश्चितच आपल्यात परिवर्तनाची क्रांती करतील व समाज विकास साधतील.समाजशास्त्र विभागप्रमुख डॉ. ए. पी.जाधव यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्य डॉ. एस. वाय. होनगेकर यांनी स्वागत केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. विकास मस्के यांनी करून दिला; तर प्रा. सुशील कोरटे यांनी आभार मानले.

समीर मुजावर व अमृता पाटील यांनी सूत्रसंचालन केले. या चर्चासत्रासाठी महाविद्यालयाचे रजिस्ट्रार सी. बी. दोडमणी, निबंधवाचक प्राचार्य डॉ. आनंद मेणसे, राम राठोड, डॉ. नारायण भोसले, डॉ. संजय कोळेकर, डॉ. धनराज पाटील, महाराष्ट्राच्या विविध विद्यापीठांतील प्राध्यापक, अभ्यासक, संशोधक उपस्थित होते. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcollegeमहाविद्यालय