शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

कोल्हापूर : बालगृहातील ५४ विद्यार्थ्यांनी मिळविले दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2018 11:54 IST

कोल्हापूर जिल्ह्यातील बालगृह संस्थांमध्ये चालू वर्षी ५७ मुला-मुलींनी दहावीची बोर्ड परीक्षा दिली होती. यापैकी ५४ मुला-मुलींनी घवघवीतपणे यश संपादन केले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील या बालगृहांतील मुलांमध्ये सर्वाेच्च गुण ९१ टक्के आहेत.

ठळक मुद्देबालगृहातील ५४ विद्यार्थ्यांनी मिळविले दहावीच्या परीक्षेत यश मुलांमध्ये सर्वाेच्च गुण ९१ टक्के

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील बालगृह संस्थांमध्ये चालू वर्षी ५७ मुला-मुलींनी दहावीची बोर्ड परीक्षा दिली होती. यापैकी ५४ मुला-मुलींनी घवघवीतपणे यश संपादन केले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील या बालगृहांतील मुलांमध्ये सर्वाेच्च गुण ९१ टक्के आहेत.वाय.डी. माने बालगृहामधील एका विद्यार्थ्यांने ९१ टक्के, देवचंद शहा बालगृहामधील एका विद्यार्थ्यांने ८५ टक्के, मुलांचे निरीक्षणगृह, कागल आणि मुलींचे निरीक्षणगृह, कोल्हापूर येथील एकेक विद्यार्थ्यांना ८0 टक्के गुण मिळाले आहेत. इतर मुला-मुलींनीही चांगले गुण मिळवून यश संपादन केले आहे.काळजी आणि संरक्षणाची गरज असणाऱ्या या मुला-मुलींना बालगृहांमध्ये बालकल्याण समितीमार्फत प्रवेश दिला जातो. त्यामुळे बिकट परिस्थितीतून आल्यानंतर संस्थेत राहून असे यश संपादन करणे हे निश्चितच कौतुकास्पद आहे. समस्याग्रस्त कौटुंबिक वातावरणातून बालगृहांत दाखल झालेल्या या मुला-मुलींच्या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.देवचंद शहा बालगृहातील १३ पैकी १२, वाय.डी. माने बालगृहातील १२ पैकी १२, कागल येथील निरीक्षणगृहातील ८ पैकी ७, अनिकेत निकेतनमधील ४ पैकी ३, कोल्हापुरातील मुलींच्या निरीक्षणगृहातील २ पैकी २, मुलांच्या निरीक्षणगृहातील ६ पैकी ६, मुलींच्या बालगृहातील १0 पैकी १0 तसेच अवनि बालगृहातील २ पैकी २ विद्यार्थी या दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. आभास फाउंडेशनचे अध्यक्ष अतुल देसाई यांनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.बालकल्याण संकुल संचलित डॉ. सर्वपल्ली निरीक्षणगृह, कन्या बालगृह, कन्या निरीक्षणगृह आणि अनिकेत निकेतन बालगृहातील एकूण २२ विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावीची परीक्षा दिली होती.

या बालगृहातील हरीश गजानन पाटील (८१ टक्के), ऋतुजा संजय चव्हाण (८0), कोमल राजाराम शिंदे (७५), विद्या संजय लव्हटे (७२), अश्विनी दत्ता साळे (६८), आरती संजय शिंदे (६७), सुप्रिया सुभाष नाईक (६६), सुफियान मेहबूब शेख (६५), सुमित सर्जेराव इंगळे (६४), यश सचिन राणे (६४), दिव्या यशवंत कांबळे (५७), पूनम राजू सावंत (५५), शुभम परशुराम खोत (५५), भाग्यश्री सुरेश सुतार (५४) या विद्यार्थ्यांनी यश मिळविले.

या विद्यार्थ्यांना शाळेतील पदाधिकारी, अधिकारी, कर्मचाऱ्यांचे तसेच संबंधित शाळेतील शिक्षकांचेही सहकार्य लाभल्याची माहिती बालगृहाच्या मानद कार्यवाह पद्मजा तिवले यांनी दिली आहे.

 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSSC Results 2018दहावी निकाल २०१८