शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
2
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
3
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
4
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
5
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
6
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
7
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
8
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
9
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
10
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
11
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
12
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
13
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
14
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
15
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
16
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
17
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
18
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
19
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
20
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी

कोल्हापुरात १९ तरूणांनी अनुभवला पुरात पोहण्याचा थरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 15:03 IST

कसबा बावडा/कोल्हापुर :येथील राजाराम बंधारा ग्रुपच्या १९ कार्यकर्त्यांनी शिवाजी पुलावरून पंचगंगा नदीच्या पुराच्या पाण्यात उड्या मारून पोहण्याचा थरार अनुभवला. ...

ठळक मुद्देशिवाजी पुलावरून मारल्या उड्या, कसबा बावड्यातील तरुणांची अशीही हौसअर्ध्या तासात पोचले राजाराम बंधाऱ्याजवळ

कसबा बावडा/कोल्हापुर :येथील राजाराम बंधारा ग्रुपच्या १९ कार्यकर्त्यांनी शिवाजी पुलावरून पंचगंगा नदीच्या पुराच्या पाण्यात उड्या मारून पोहण्याचा थरार अनुभवला. शिवाजी पुल ते राजाराम बंधारा हे चार किमीचे अंतर कापण्यासाठी त्यांना अवघ्या ३० मिनिटांचा अवधी लागला. गेली दहा वर्ष हे तरुण प्रत्येक वर्षी पुराच्या पाण्यात पोहण्याचा आनंद लुटत आले आहेत.सकाळी ६ वाजून ४५ मिनिटानी सर्व तरुणांनी शिवाजी महाराज की जय... म्हणत पुलावरून उड्या टाकल्या. नदीला प्रचंड पूर असल्याने व पाण्याच्या प्रवाहाला जोराची गती असल्याने पाण्यातच एकमेकाला सूचना देत सर्वांनी मुख्यप्रवाहातून पोहण्याचा निर्णय घेतला. पुरात एकदा उडी टाकल्यावर राजाराम बंधारा येथे पोहोचण्यासाठी ४५ मिनिटांचा कालावधी लागत असे.मात्र यंदा प्रचंड पुरामुळे पाण्याला आलेल्या प्रचंड गतीमुळे व मुख्य प्रवाहातून पोहल्यामुळे हे अंतर अवघ्या ३० मिनिटात कापले गेले.या मोहिमेत मधुकर राजदीप, संग्राम जाधव, शिवाजी ठाणेकर, सूर्यकांत सुतार, तानाजी चव्हाण, प्रतीक सुतार, प्रज्वल केंबळे, अवधूत चव्हाण, जितू केंबळे, कौशिक कदम, प्रवीण केंबळे,विनायक आळवेकर,धीरज मोरे, संतोष गायकवाड, गणेश उलपे, रावसाहेब शिंदे, कविराज राजदीप, सुरज पिसाळ आदी सहभागी झाले होते. त्यांना संजय जासूद ,अनिल जाधव, राजू पवार ,राजू राणे, प्रशांत पाटील, विजय रावण व कैलास मोरे यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले. 

टॅग्स :Rainपाऊसkolhapurकोल्हापूर