शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कोल्हापूर : रंकाळा सुशोभीकरणासाठी १५ कोटींचा आराखडा : पर्यटन समिती बैठकीत माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 11:02 IST

रंकाळा तलाव सुशोभीकरणाचा १५ कोटींचा आराखडा तयार करण्यात यावा, त्यास प्रादेशिक पर्यटन विकास कार्यक्रमातून मान्यता दिली जाईल, अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महाराणी ताराराणी सभागृहात मंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा पर्यटन समितीची बैठक झाली.

कोल्हापूर : रंकाळा तलाव सुशोभीकरणाचा १५ कोटींचा आराखडा तयार करण्यात यावा, त्यास प्रादेशिक पर्यटन विकास कार्यक्रमातून मान्यता दिली जाईल, अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महाराणी ताराराणी सभागृहात मंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा पर्यटन समितीची बैठक झाली.

यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार अमल महाडिक, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, महापालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमन मित्तल, जिल्हा नियोजन अधिकारी सरीता यादव, समाज कल्याणचे सहायक आयुक्त बाळासाहेब कामत, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संभाजी माने, कार्यकारी अभियंता एन. एम. वेदपाठक, उपवनसंरक्षक हणमंतराव धुमाळ, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव विजय पवार, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, आदी उपस्थित होते.मंत्री पाटील म्हणाले, रंकाळा तलावाच्या सुशोभीकरणासाठी लागेल तेवढा निधी दिला जाईल; त्यासाठी एकात्मिक आराखडा तयार करून तो प्रादेशिक पर्यटन कार्यक्रमातून प्राधान्याने मंजूर करून घेतला जाईल. प्रादेशिक पर्यटन कार्यक्रमामधून रंकाळ्याबरोबरच नंदवाळ, हुतात्मा पार्कमधील हुतात्मा स्मारक व गार्डन विकसित करण्यासाठी दीड कोटीचा प्रस्ताव महापालिकेने तयार केला असून, त्यास प्रादेशिक पर्यटन विभागाकडून मान्यता देण्यात येईल.राजर्षी शाहू जन्मस्थळाच्या संग्रहालयासाठी १३ कोटी रुपये मंजूर असून, त्यांपैकी २ कोटींचा निधी मिळाला आहे. हे काम सर्वांच्या सहमतीने व समन्वयाने होणे गरजेचे असून त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांची बैठक घेऊन शासन निर्णयानुसार कामे होण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी सूचना त्यांनी केली.

शाहू महाराज समाधीस्थळाचे कामही गतीने व्हावे यासाठी महापालिकेने ४ कोटींचा प्रस्ताव तयार केला असून, त्यास नावीन्यपूर्ण योजनेतून मान्यता घेतली जाईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर व राजर्षी शाहू महाराज यांच्या माणगाव येथील स्मारक उभारणीच्या कामासही प्राधान्य द्यावे.

जिल्ह्यातील वनपर्यटन वाढीस लागावे यासाठी वनविभागाने त्यांच्या अखत्यारीतील वनपर्यटन क्षेत्रासह अन्य नवनवीन वनपर्यटन क्षेत्रे विकसित करावीत व इको टुरीझमवर भर द्यावा. त्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना व पाठपुरावा करावा, अशा सूचना त्यांनी केल्या. जिल्हा नियोजन अधिकारी सरीता यादव यांनी जिल्ह्यातील पर्यटन विकासकामाबाबत माहिती दिली.

अंबाबाई मंदिर दर्शन मंडपाचे आदेशमंत्री पाटील म्हणाले, श्री अंबाबाई मंदिर परिसर विकास आराखड्यास मान्यता मिळाली असून, दर्शनी मंडपाच्या कामाचे आदेश झाले आहेत. उर्वरित कार्यवाही प्राधान्याने करण्यात यावे. श्री क्षेत्र जोतिबा परिसर विकासासाठी २५ कोटींचा आराखडा अर्थसंकल्पित झाला असून, त्यातील ५ कोटींचा निधी मिळाला आहे. यातून दर्शन मंडप बांधण्यात येणार असून टेंडर प्रक्रिया सुरू झाली आहे.

 

 

टॅग्स :tourismपर्यटनMahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूरChandrakant Dada Bachu Patilचंद्रकांतदादा बच्चू पाटीलkolhapurकोल्हापूर