शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

कोल्हापुरात कोरोना संसर्गामुळे १३ जणांचे मृत्यू तर ५६० नवे रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 13:33 IST

पुणे, मुंबई पाठोपाठ हॉटस्पॉट बनसलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात गुरुवारी कोरोना संसर्गामुळे १३ जणांचा मृत्यू झाला, तर नवीन ५६० रुग्ण आढळून आले. जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता १२ हजार ८३८ वर जाऊन पोहचली असून मृतांची संख्याही जवळपास ३६४ वर गेली आहे. त्यामुळे आता रुग्णांवर थेट त्यांच्या घरातच उपचार केले जात आहेत.

ठळक मुद्देकोल्हापुरात कोरोना संसर्गामुळे १३ जणांचे मृत्यू तर ५६० नवे रुग्णआता रुग्णांवर थेट त्यांच्या घरातच उपचार

कोल्हापूर : पुणे, मुंबई पाठोपाठ हॉटस्पॉट बनसलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात गुरुवारी कोरोना संसर्गामुळे १३ जणांचा मृत्यू झाला, तर नवीन ५६० रुग्ण आढळून आले. जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता १२ हजार ८३८ वर जाऊन पोहचली असून मृतांची संख्याही जवळपास ३६४ वर गेली आहे. त्यामुळे आता रुग्णांवर थेट त्यांच्या घरातच उपचार केले जात आहेत.कोल्हापूर जिल्ह्यात रुग्ण वाढीचा वेग अतिशय मोठा आहे. दि. १ जुलैपासून संसर्ग फैलावला आहे. रुग्ण वाढीचा वेग काही केल्या कमी होत नाही. रोज ४०० ते ५०० च्या पटीत रुग्ण नव्याने आढळून येत आहेत. त्याचा परिणाम मात्र आरोग्य यंत्रणेवर झाला असून उपचार प्रक्रियेत विस्कळितपण आला आहे. जिल्हा प्रशासन तसेच आरोग्य प्रशासन चांगले काम करत असतानाही रुग्ण वाढ थांबत नसल्याचे त्यांच्यावर मर्यादा येऊ लागल्या आहेत.आतापर्यंत कोल्हापूर जिल्ह्यात ३५४ रुग्ण दगावले असून त्यामध्ये कोल्हापूर, इचलकरंजी या शहरासह हातकणंगले तालुक्यातील रुग्णांचा त्यामध्ये सर्वाधिक समावेश आहे. निमोनिया, मधुमेह, श्वसनाचे विकास असलेले कोरोना बाधित रुग्ण मयत होण्याचे प्रमाण जादा आहे. आरोग्य प्रशासनाने मृत्यू दर कमी करण्याचे प्रयत्न चालविले असले तरी त्यात त्यांना फारसे यश आलेले नाही.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर